शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
2
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
3
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
4
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
5
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
6
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
7
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
8
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
9
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
10
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
11
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
12
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
13
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
14
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
15
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
16
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
17
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
19
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
20
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती

दक्षता पाळली तरच पुन्हा कडक निर्बंध लावण्याची वेळ येणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:18 IST

अमरावती : नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे हेच सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यामुळे गणेशोत्सव आदी उत्सवकाळातही दक्षतेचा विसर पडता कामा नये. ...

अमरावती : नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे हेच सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यामुळे गणेशोत्सव आदी उत्सवकाळातही दक्षतेचा विसर पडता कामा नये. केरळमध्ये रोज हजारो नवे रुग्ण आढळत असून, हा धोक्याचा इशारा आहे. त्यामुळे दक्षता पाळली गेली तरच पुन्हा कडक निर्बंध लावण्याची वेळ येणार नाही, असा इशारा राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी बुधवारी दिला. कोरोनाची तिसरी लाट टाळण्यासाठी दक्षता नियमांचे काटेकोर पालन करण्याचे कळकळीचे आवाहनही त्यांनी केले.

अमेरिका, चीन आदी देशांत तिसरी लाट उदभवली असून, केरळमध्येही रोज नवे हजारो रुग्ण समोर येत आहेत. हा धोक्याचा इशारा आहे व तो आपण सगळ्यांनी गांभीर्याने घेतला नाही, तर आपल्याला जनजीवनाची फार मोठी किंमत चुकवावी लागेल. तिसऱ्या लाटेच्या सामन्यासाठी आरोग्य यंत्रणा सुसज्ज आहे; पण त्याचा वापर करण्याची वेळ येऊ नये यासाठी उत्सवकाळातही दक्षतेचा विसर पडता कामा नये.

आरोग्याची सुरक्षितता हे सर्वोच्च प्राधान्य आहे. कोरोनाचे रुग्ण वाढले तर पुन्हा कडक निर्बंध लावण्याची वेळ येऊ शकते. प्रत्येकाने नियम आणि मर्यादा पाळल्या तरच पुन्हा निर्बंध लावण्याची वेळ येणार नाही. आपण सर्वांनी मिळून सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करायला हवे. लोकांच्या जिवावरील विघ्न टाळायचे असेल तर, शासनाने वेळोवेळी आखून दिलेल्या आरोग्याच्या नियमांचे पालन व्हावे. गर्दी व सार्वजनिक कार्यक्रम टाळावे असेही पालकमंत्री म्हणाल्या.

दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा मोठा तुटवडा होऊन बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशाला देखील यातून जावे लागले होते.महाराष्ट्रासह संपूर्ण देश कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर आहे. आता तो रोखण्यासाठी मास्क, सोशल डिस्टन्स, स्वच्छता आदी दक्षता नियम पालनाची व स्वयंशिस्तिची गरज आहे. त्यामुळे सर्वानी स्वयंशिस्त पाळण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.