शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
2
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
3
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
4
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
5
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
6
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
7
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
8
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
9
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
10
Ameesha Patel : "९० टक्के सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
11
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
12
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
13
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
14
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
15
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
16
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
17
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
18
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
19
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
20
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण

मिनीमंत्रालयातील समाजकल्याण प्रभारींवरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:18 IST

अमरावती : ग्रामीण भागाशी संबंधित असलेल्या जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाला गत सहा वर्षांपासून नियमित अधिकारी नसल्यामुळे या विभागाचा कारभार ...

अमरावती : ग्रामीण भागाशी संबंधित असलेल्या जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाला गत सहा वर्षांपासून नियमित अधिकारी नसल्यामुळे या विभागाचा कारभार अद्यापही प्रभारी अधिकाऱ्यांवर सुरू आहे. विशेष म्हणजे, गत सहा वर्षात सहा अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यामुळे या विभागाला वाली नसल्याचे चित्र असून या ठिकाणी नियमित अधिकारी केव्हा मिळणार, हा खरा प्रश्न आहे.

समाजकल्याण विभागामार्फत विविध महत्त्वाच्या योजना राबविल्या जातात. या योजनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हा समाजकल्याण अधिकाऱ्यावर आहे. मात्र, दोन वर्षांपासून या विभागाला नियमित अधिकारी मिळालेला नाही. आतापर्यंत सहा प्रभारी अधिकारी या ठिकाणी नियुक्त करण्यात आले होते. त्यांनाही आता अन्यत्र नियुक्ती देण्यात आल्याने समाजकल्याण विभागाचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांवरच चालू आहे. जिल्हा समाजकल्याण विभागाचे पद भरण्यासाठी सीईओ,पदाधिकारी यांनी सतत पाठपुरावा केल्यावरही याची दखल अद्यापही घेण्यात आली नाही.

कोट

समाजकल्याण विभागाला नियमित अधिकारी नियुक्त करावा, याकरिता अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सभापती म्हणून शासनाकडे पद भरण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे आणि करीत आहोत.

- दयाराम काळे, सभापती, समाजकल्याण समिती, जिल्हा परिषद

यांनी सांभाळली धुरा

n मीना अंबाडेकर - २१ जून २०१७ ते २८ जून २०१८

n चेतन जाधव - २८ जून ते २६ नोव्हेंबर २०१८

n प्रशांत थोरात - २६ नोव्हेंबर २०१८ ते २३ जानेवारी २०१९

n अमोल यावलीकर - २३ जानेवारी ते १७ जून २०१९

n दीपा हेरोडे - १० जून २०२० ते ३ फेब्रुवारी २०२१

n राजेंद्र जाधवर - ६ मे पासून अद्याप