शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

४० वर्षांत केवळ ८ पट कापसाची भाववाढ

By admin | Updated: November 23, 2015 00:19 IST

महागाई दरदिवशी वाढतच चालली असून कापसाचे भाव गेल्या ४० वर्षांत आठपटच वाढले आहे. अधिकाऱ्यांचे पगार १५० पटीने वाढले आहे.

सुमित हरकुट चांदूरबाजारमहागाई दरदिवशी वाढतच चालली असून कापसाचे भाव गेल्या ४० वर्षांत आठपटच वाढले आहे. अधिकाऱ्यांचे पगार १५० पटीने वाढले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची दररोज दिवाळी तर शेतकऱ्यांचे वर्षभर हाल होत आहे. काही वर्षांपूर्वी जिल्ह्यात सर्वात जास्त उत्पादन करणारा चांदूरबाजार तालुका कापसाचे उत्पादन खर्च जास्त येत असल्यामुळे व भाव कमी मिळत असल्यामुळे कापसाचा पेरा घटला आहे. अनेकांनी प्रचंड हालअपेष्टा सहन करून जगविलेले कापसाचे पीक आता घरी कसे आणावे, हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. कारण कापूस वेचणी करणाऱ्या मजुरांना देण्यासाठी त्यांच्याकडे पैसेच नसल्याने ऐन वेळेवर उसनवारी करावी लागत आहे. नगदी पीक म्हणून मोठ्या प्रमाणात पेरल्या जाणाऱ्या कापसासाठीही उसनवारी करण्याचा प्रसंग शेतकऱ्यावर दरवर्षी येतो. या वर्षीच्या दुष्काळामुळे ही परिस्थिती अधिकच बिकट होत आहे. ४० वर्षांपूर्वी कापसाला एक क्विंटलचा दर व प्राध्यापकाच्या वेतनात फक्त १०० ते १५० रुपयांची तफावत होती. कापसाचे भाव ५०० रुपये प्रतिक्विंटल तर प्राध्यापकाला ६०० ते ६५० रुपये प्रतिमाह वेतन होते. मात्र आता कापसाला ४१०० रुपये प्रति क्विंटल आहे, तर प्राध्यापकाला पगार मात्र एक लाखाच्या घरात गेला आहे. गेल्या ४० वर्षांत कापसावर फक्त आठपटच वाढ झाली तर प्राध्यापकांचे पगार मात्र १५० पटीने वाढले. ४० वर्षांपूर्वी पेट्रोल ३ रुपये तर डिझल २ रुपये प्रति लिटर होते. त्याचप्रमाणे सोने हे ४०० रूपये प्रतितोळा होते. आज पेट्रोल व डिझलचे २० ते २५ पट किमती वाढल्या तर सोने हे ७० पटीने वाढले आहे. तसेच त्या काळात मजुराला दिवसाकाठी ५ रूपये मजुरी मिळत होती. मात्र आता त्याच मजुराला १५० ते २०० रुपये मजुरी झाली आहे म्हणजेच ४० पटीने वाढ झाली आहे. मात्र गेल्या ४० वर्षांत कापसाच्या भावात ८ पटीने वाढ करून ४१०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे. महागाई दररोज उंची गाठत असून पांढरे सोने मात्र शेतकऱ्यांना पडक्या भावात विकावे लागत आहे. शासनाचे आडमुठे धोरण व व्यापारीची अरेरावी या सर्व प्रकारामुळे कापूस उत्पादक शेतकरी कमालीचा हतबल झाला आहे. शेती हा एकमेव उत्पन्नाचे साधन असलेल्या शेतकऱ्याला पांढरे सोने म्हणून प्रसिद्ध असलेल्या कपाशीची पेरणी करणे महागाचे झाले आहे. पेरणी, फवारणी, नांगरणी तसेच वेचणीचा खर्च सुद्धा या पांढऱ्या सोन्यापासून निघणे अशक्य झाले आहे. मात्र तरीही शेतकरी हा आपली पारंपरिक पद्धतीने शेती व्यवसाय करीत असून उधारपाधार करूनही शेतकऱ्याने कपाशी पिकाला लहानाचे मोठे केले. मात्र ऐन कापूस वेचणीच्या वेळीच शेतकऱ्याला उसनवारी घ्यावयाची वेळ आली आहे. त्यामुळे शासन एकीकडे प्राध्यापकांच्या वेतनात १५० पटीने वाढ करीत आहे. शेतकऱ्यांचा वर्षभर मेहनत करून पिकविलेल्या पिकाला फक्त ८ टक्के वाढ करून दिले जात आहे. ही एक तऱ्हेने शेतकऱ्यावर होत असलेला अन्यायच आहे. शेतकऱ्यांसाठी स्वामिनाथन आयोग लागू नाहीदेशात शेतीवर उपजिविका करणाऱ्या शेतकऱ्यांकडे शासन हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत आहे. शासनाने आधी दुष्काळात होरपळून गेलेल्या शेतकऱ्याला मदत करणे आवश्यक असताना सातवा वेतन लागू करण्याची घाई करणे आवश्यक नव्हते. शासनाने शिक्षक, कर्मचारी, अधिकाऱ्यांकरिता सातवा वेतन आयोग लागू केला. मात्र शेतकऱ्यांकरिता बनविलेल्या एकमेव स्वामिनाथन आयोग अद्यापपर्यंत लागू करण्यात आलेले नाही, हे दुर्दैवच म्हणावे लागेल, असे आमदार बच्चू कडू यांनी सांगितले.