शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
3
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
4
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
5
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
6
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
7
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
8
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
9
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
10
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
11
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
12
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
13
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
14
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
15
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
16
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
17
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
18
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
19
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
20
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."

अप्पर वर्धात केवळ २६ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 22:10 IST

शहरासह अमरावतीला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वर्धा प्रकल्पात केवळ २६.३१ टक्के जलसाठा शिल्लक आहे. गेल्या दोन महिन्यांत या साठ्यात झपाट्याने घट झाली आहे. त्यामुळे अमरावतीकरांवर पाणीकपातीचे काळे ढग आहेत. गतवर्षी १५ जानेवारीस या धरणात तब्बल ६७.०६ टक्के इतका जलसाठा शिल्लक होता. त्यात यंदा निम्म्यापेक्षाही अधिक घट झाली आहे.

ठळक मुद्देपाणीटंचाईचे संकेत : दैनंदिन पुरवठ्याचे नियोजन कोलमडले

लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : शहरासह अमरावतीला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वर्धा प्रकल्पात केवळ २६.३१ टक्के जलसाठा शिल्लक आहे. गेल्या दोन महिन्यांत या साठ्यात झपाट्याने घट झाली आहे. त्यामुळे अमरावतीकरांवर पाणीकपातीचे काळे ढग आहेत. गतवर्षी १५ जानेवारीस या धरणात तब्बल ६७.०६ टक्के इतका जलसाठा शिल्लक होता. त्यात यंदा निम्म्यापेक्षाही अधिक घट झाली आहे.मराठवाडा व पूर्व विदर्भावर भीषण पाणीटंचाईचे संकट आहे. अप्पर वर्धा प्रकल्पाची पाणीपातळी खालावल्याने अमरावती शहरावरदेखील पाणीटंचाईचे सावट आहे. शहराला मोर्शीच्या अप्पर वर्धा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. अमरावतीकरांची तृष्णा भागविण्यासाठी अप्पर वर्धा जलाशय हे उपयुक्त आहे. इतरत्र पाणीटंचाई असताना, या धरणाने आजवर अमरावतीकरांना कधीही धोका दिला नाही, असा इतिहास आहे. परंतु, यावर्षी धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.अप्पर वर्धा धरणाची क्षमता ५६४.०५ दशलक्ष घनमीटर आहे. यात ११४.२२ दलघमी मृत साठा धरल्यास एकूण क्षमता ६२८.२७ दलघमीपर्यंत पोहोचतो. तथापि, सध्या धरणात १४८.३९ दशलक्ष घनमीटर म्हणजेच २६.३१ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. गेल्या दोन महिन्यांत पाणीसाठा झपाट्याने कमी झाला आहे.औष्णिक विद्युत प्रकल्पाला देखील पाणीअप्पर वर्धा धरणातून अमरावतीला पाणीपुरवठ्यासोबतच उजव्या व डाव्या कालव्यातून सिंचनाची सोय करण्यात येते. रब्बी हंगामामध्ये सिंचनासाठी धरणातून पाणी सोडले जाते. नांदगाव पेठ येथील कोळशावर आधारित रतन इंडिया कंपनीच्या सोफिया या औष्णिक विद्युत प्रकल्पालादेखील पाणी सोडण्यात येते. वीज प्रकल्प गतवर्षीपासून सुरू झाला व त्यानंतर धरणातील पाणी मोठ्या प्रमाणात घटत गेल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.