शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
3
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
4
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
5
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
6
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
7
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
8
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
9
"त्याला उचकी आली आणि...", 'अशी ही बनवा बनवी'मधील शंतनूचं असं झालं निधन, पत्नीचा खुलासा
10
Prithvi Shaw: सपना गिल विनयभंग प्रकरणात न्यायालयाने पृथ्वी शॉला ठोठावला १०० रुपयांचा दंड!
11
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
12
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
13
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
14
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
15
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
16
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
17
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
18
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
19
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
20
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर

केवळ १५ रुपये प्रतिकिलो : ९० टक्के शेतकऱ्यांनी विकली संत्री

By admin | Updated: January 13, 2016 00:19 IST

यावर्षी संत्रा पिकाचे भाव पडल्याने शेतकऱ्याने आपल्या बागेतील संत्रा पडक्या भावात विकावा लागला.

सुमित हरकुट चांदूरबाजारयावर्षी संत्रा पिकाचे भाव पडल्याने शेतकऱ्याने आपल्या बागेतील संत्रा पडक्या भावात विकावा लागला. आता शेतकऱ्यांचा संत्रा ९० टक्के विक्री झाला असताना संत्र्याचे भाव दुप्पट झाले असल्याने संत्र्याला सुलतानी संकटाने घेरले आहे. विदर्भातील सुप्रसिद्ध असलेला संत्रा हे या भागातील शेतकऱ्यांचे अती महत्त्वाचे पीक आहे. विदर्भातील संत्र्याची गोडी जगप्रसिद्ध आहे. विदर्भातून हा संत्रा बंगळुरू, चेन्नई, केरळ, दिल्ली, कोलकाता, नेपाळ, श्रीलंकासारख्या परदेशातही पोहोचला आहे. तालुक्यातील संत्रा व्यवसायामुळे दरवर्षी हजारो मजुरांना काम मिळते. तसेच या व्यवसायात कोट्यवधींची उलाढाल होत असल्याने देशभरातील व्यापारी संत्रा खरेदी करण्याकरिता तालुक्यात येतात. दररोज शेकडो ट्रक संत्रा देशाच्या कानाकोपऱ्यात विक्रीकरिता जातो.यावर्षीसुद्धा तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात संत्रा पिकाचे उत्पन्न झाले. मात्र यावर्षी संत्र्याला ४ ते ५ रूपये प्रतिकिलोचेच भाव मिळाले. मात्र काही दिवसातच हे भाव ७ रूपये किलोपर्यंत वाढले. त्यावेळी अनेक शेतकऱ्यांनी आपले संत्रा ठेवण्यापेक्षा विकणे यालाच पसंती दिली. संत्रा हा झाडावर अधिक काळ ठेवणे शक्य नसल्याने शेतकऱ्यांना आपल्या बागेतील संत्रा विकणे आवश्यक होऊन जाते. तसेच शेतकरी हा संत्रा तोडून जास्त काळ साठवून सुद्धा ठेवू शकत नाही नेमके याच संधीचा फायदा घेऊन व्यापारी वर्ग शेतकऱ्यांचा फायदा घेत संत्र्याला पडक्या भावाने खरेदी करतात, असा आरोप शेतकरी वर्गातर्फे होत आहे. तसेच सुरुवातीला संत्राचे भाव अतिशय कमी असल्याने शेतकऱ्यांना नाईलाजाने आपला माल विक्री करावा लागला.अनेक शेतकऱ्यांना बागेतील संत्रा अल्पदरात विकून मिळेल त्या पैशावर समाधान मानावे लागले. मात्र अनेकांनी स्वत: हा संत्रा मोठ्या बाजारपेठांत विक्रीकरिता नेऊन नवीन व्यापारी पद्धत सुरू केली. गेल्या दोन महिन्यांपासून ९० टक्के शेतकऱ्यांनी आपला संत्रा विकला असून आता अचानक संत्राचे भाव दुप्पटीने वाढले आहे. त्यामुळे परिसरातील ९० टक्के शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. अनेक शेतकऱ्यांनी आपले बगीचे कमी दरात विकण्याचा सौदा केला आहे. मात्र अद्यापही त्यांच्या बगिच्यातील संत्राची तोड झाली नाही. त्यामुळे अनेक व्यापारी कमी दरात घेतलेले बगिचे तोड करण्यास घाई करीत असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. शेतकऱ्यांनी विकली बेभाव संत्रीकाही दिवसांपूर्वी व्यापाऱ्यांतर्फे शेतकऱ्यांचा संत्रा खरेदी करताना देण्यात आलेला इसार सातत्याने भाव पडत असल्याने अनेक व्यापारींनी मालाची उचल न करता इसार सोडून दिले होते. त्यामुळे शेतकरी पार खचून गेला होता. अखेर कमी-जास्त भाव करून शेतकरी आपला संत्रा शेतातच सडू देण्यापेक्षा पडक्या भावाने विकण्यास तयार झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यंदा स्वत: शेतमालकांनी रस्त्याच्या कडेला दुकान थाटून संत्री विकली. काही शेतकऱ्यांनी संत्री ट्रकमध्ये भरून परप्रांतात विकण्यासाठी नेली होती.