शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
3
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
4
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
5
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
6
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
7
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
8
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
9
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
10
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
11
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
12
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
13
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
14
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
15
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
16
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
17
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
18
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
19
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
20
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!

१५ आॅगस्टपासून मिंळणार आॅनलाईन सातबारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 23:34 IST

जिल्ह्यात १,९८५ गावांतील ८९ महसूल मंडळांत व ५२५ तलाठी साझ्यांमध्ये असणारे ६ लाख ८४ हजार २५४ सातबारे आता १५ आॅगस्टपासून आॅनलाईन मिळणार आहेत.

ठळक मुद्देपत्रपरिषद : विभागीय आयुक्तांसह जिल्हाधिकाºयांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात १,९८५ गावांतील ८९ महसूल मंडळांत व ५२५ तलाठी साझ्यांमध्ये असणारे ६ लाख ८४ हजार २५४ सातबारे आता १५ आॅगस्टपासून आॅनलाईन मिळणार आहेत. कोणीही व्यक्ती कोठूनही केआॅक्स मशिनव्दारे डिजिटल सातबारा काढू शकतो. स्वतंत्र भारतात प्रथमच सातबाºयावरची तलाठ्याची स्वाक्षरी गायब झाली त्याऐवजी आता डिजिटल स्वाक्षरीने सारबारा मिळणार असल्याची माहिती, विभागीय आयुक्त पीयूष सिंग आणि जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत दिली.१ आॅगस्ट रोजी महसूल दिननिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. सर्व तालुक्यांतील गावांमधील संगणकीकृत अधिकार अभिलेख पुनर्लिखित करण्यात आले. सातबारा व गाव नमुना ८ (अ) अचूक करण्यासाठी चावडी वाचनाची मोहीम राबविण्यात आली. या सर्व नोंदीचे संगणकीकरण करताना काही त्र्युट्या राहिल्या होत्या. त्यासाठी शासनाने जमाबंदी आयुक्त व राष्ट्रीय सूचना केंद्र यांच्या माध्यमातून वेळोवेळी आज्ञावली (सॉफ्टवेअर) उपलब्ध करून दिल्या. महा- ई-सेवा केंद्र, आपले सरकार पोर्टल, जिल्हा व तालुका सेतू या ठिकाणावरून प्राप्त करून आक्षेप संबंधित तहसीलदार व तलाढ्यांकडे लेखी स्वरूपात नोंदिवले. विहीत कालावधीत ही कार्यवाही करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. चुका दुरूस्त करण्यात आल्यानंतर गावागावांत चावडी वाचन करण्यात आले. यामध्ये प्राप्त झालेल्या आक्षेपांची तपासणी करून त्रृटी दूर करण्यात आल्यात. तसेच अचूक सात-बारा संचाची मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार व जिल्हाधिकाºयांनी तपासनी केली व हे अभिलेख खातेदारांसाठी उपलब्ध करण्यात आले.‘झिरो टॉलरन्स टू ऐरर’ असे कामकाजाचे स्वरूप राहिल्याने येत्या १५ आॅगस्टपासून सर्व नागरिकांना घरबसल्या किंवा महा-ई-सेवा केंद्र, सेतू केंद्राव्दारे अचूक व डिजिटल स्वक्षरीचा सातबारा मिळू शकणार असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेला अप्पर जिल्हाधिकारी के. पी. परदेशी आदी उपस्थित होते.गुणवंत कर्मचाºयांचा सत्कार१ आॅगस्ट या महसूल दिननिमित्याने उत्कृष्ट महसुली कामकाज करणाºया कर्मचाºयांचा गौरव करण्यात येणार आहे. डिजिटल इंडियाअंर्तगत सर्व लॅण्ड रेकॉर्ड, सँगणकीकरण करण्यात येत आहे. विभागातील सर्व रेकॉर्डचे स्कॅनिंग अंतिम टप्प्यात आहेत. २३ रूपयांचा भरना करून ही कागदपत्रे नागरिकांना मिळणार अहे. पीक कर्जासंदर्भात एसएलबीसीचे निर्देश सर्व बँकांना प्राप्त आहेत. ज्या बँका सहकार्य करणार नाहीत त्यांच्यावर गुन्हे दाखल करू, असे जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी सांगितले.