शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचा राज ठाकरेंना मोठा धक्का; मनसे स्थापनेपासून सोबत असलेला नेता पक्षाची साथ सोडणार?
2
'ऑपरेशन सिंदूर' नंतर भारताची पहिल्यांदाच पाकिस्तानला मदत! दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांशी संपर्क साधला
3
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
4
'तुमच्या यूट्यूब चॅनेल्सवर माफी मागा', दिव्यांगांची खिल्ली उडवल्याप्रकरणी SC चे समय रैनासह ५ जणांना आदेश
5
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
6
जाऊ डबलसीट रे लांब लांब... पण हे असं?; 'लव्ह बर्ड्स'चा आणखी एक Video तुफान व्हायरल
7
आता फक्त ३ मिनिटांत भरा ITR! 'या' कंपनीने लॉन्च देशातील पहिला AI प्लॅटफॉर्म; अंतिम मुदतही वाढली
8
Nikki Murder Case : "दोन्ही जावई मुलींच्या पार्लरमधून पैसे चोरायचे, काहीच काम करत नव्हते"; ढसाढसा रडले वडील
9
AI ची कमाल, आता म्हातारपणही रोखणार, राहाल "चिरतरुण"! काय आहे चॅटबॉट रिव्हर्स एजिंग? जाणून घ्या
10
Ola Electric Share Price: ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
11
गणेश चतुर्थी २०२५: राहु काळ कधी? ‘या’ शुभ मुहूर्तावर स्थापन करा गणपती; पाहा, चंद्रास्त वेळ
12
Pune: सिंहगडावरून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड पाच दिवसांनी सापडला; कुठे होता, पोलिसांनी काय सांगितलं?
13
"मी कुणाच्या वाट्याला जात नाही आणि..." अजित पवारांनी घेतली संकर्षण कऱ्हाडेची फिरकी
14
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
15
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
16
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
17
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य
18
Viral: रीलचा नाद जीवावर बेतला; २२ वर्षीय युट्यूबर धबधब्यामध्ये बुडाला, घटनाकॅमेऱ्यात कैद
19
गुडन्यूज! परिणीती चोप्रा होणार आई, लग्नाच्या दोन वर्षांनंतर कुणीतरी येणार येणार गं...
20
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!

जिल्ह्यातील ५०० शिक्षकांच्या होणार ऑनलाईन बदल्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:13 IST

सर्वसाधारण क्षेत्रात दहा वर्षे, एका शाळेत पाच वर्षे वयाची अट अमरावती : गतवर्षी कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या शिक्षकांच्या बदल्यांना ...

सर्वसाधारण क्षेत्रात दहा वर्षे, एका शाळेत पाच वर्षे वयाची अट

अमरावती : गतवर्षी कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या शिक्षकांच्या बदल्यांना ग्रामविकास विभागाने हिरवी झेंडी दिली आहे. याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. एकूण शिक्षकांच्या १० टक्के बदल्या करण्यात येणार असल्याने जिल्हा परिषदेच्या सेवेत असलेल्या जवळपास ५०० शिक्षक यंदा स्थानांतरित होणार आहेत. वर्षानुवर्षे अतिदुर्गम भागात सेवा बजावत असलेल्या शिक्षकांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

शिक्षकांच्या दरवर्षीच बदल्या करण्याचे शासनाचे धोरण आहे. यंदा मे महिन्यातच या बदल्या करण्यात याव्यात, अशी सूचना देण्यात आली. या बदल्या पारदर्शी व्हाव्यात, यासाठी शासनस्तरावर ऑनलाइन प्रक्रिया केली जात असली तरी गाव, तालुका, जिल्हापातळीवर शिक्षकांची मंजूर पदे व रिक्त पदांचा मेळ घालूनच त्या करण्यात येणार आहेत. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता, शाळा कधी सुरू होतील, याविषयी अनिश्चितता असली तरी शिक्षकाविना एकही शाळा राहणार नाही व प्रक्रिया वेळेत व्हावी, अशाही सूचना आहेत.

बॉक्स

दिव्यांग, आजारी, विधवांना प्राधान्य

शासनाच्या बदल्यांच्या धोरणात दिव्यांग, गंभीर आजारी, विधवा, परित्यक्ता, हृदयरोगी, कॅन्सर, किडनीच्या आजाराने ग्रस्त शिक्षकांना या बदल्यांमध्ये प्राधान्य देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी अशा शिक्षकांना आपल्या आजाराविषयी प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.

बॉक्स

बदलीस पात्र शिक्षकांचे निकष निश्चित

शिक्षकांच्या बदल्या करताना त्यासाठी शासनाने निकष ठरवून दिले आहेत. एका ठिकाणी पाच वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वर्ष कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या बदल्या केल्या जाणार असून, त्यातही त्या-त्या शाळेतील शिक्षकांची सेवाज्येष्ठता गृहीत धरली जाणार आहे, जेणेकरून साेईच्या ठिकाणी वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्यांना अन्यत्र नेमणूक दिली जाणार आहे.

बॉक्स

आंतरजिल्हा बदलीसाठी पर्याय

अन्य जिल्ह्यात बदली करून जाणाऱ्या शिक्षकांनाही आंतरजिल्हा बदलीसाठी चार जिल्ह्यांचा पर्याय सुचवावा लागणार आहे. त्यातही त्यांनी प्राधान्यक्रम देणे क्रमप्राप्त आहे. त्या-त्या जिल्ह्यातील रिक्त पदे व तिथून बदलून येण्यास इच्छुक शिक्षकांच्या संख्येत या बदल्या केल्या जातील.

कोट

शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या बदली धोरणानुसार अजूनही काही शुद्धीपत्रकांची आवश्यकता आहे. बदली प्रक्रिया असंभव वाटते. शासननिर्णयानुसार सर्वप्रथम अवघड क्षेत्र घोषित होणे आवश्यक आहे. त्याशिवाय बदलीस पात्र शिक्षकांची संख्या निश्चित होणे कठीण आहे. त्यामुळे संघटनेने दिलेल्या सूचनाप्रमाणे शुद्धीपत्रक तातडीने काढणे गरजेचे आहे. बदली प्रक्रियेत राज्यस्तरावर नोडल अधिकारी व तांत्रिक अधिकारी यांची नेमणूक होणे आवश्यक आहे. परंतु, त्या दृष्टीने अद्याप कुठलीही कारवाई झाली नाही.

- किरण पाटील, राज्य उपाध्यक्ष, अ.भा. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ