शहरं
Join us  
Trending Stories
1
“दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही, एअर स्ट्राइक करणे पर्याय असू शकत नाही”: राज ठाकरे
2
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'नंतर काय काय घडलं? जगभरातून समर्थन...
3
'अभी पिक्चर बाकी है...', ऑपरेशन सिंदूरनंतर माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची सूचक पोस्ट!
4
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
5
Operation Sindoor: कुख्यात दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबाचा खात्मा; १४ लोकांना यमसदनी धाडलं
6
आजोबा, वडील एक्स आर्मी, पतीही...! कोण आहेत 'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देणाऱ्या लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी
7
Operation Sindoor: नऊ ठिकाणं... ९० दहशतवाद्यांचा खात्मा; भारतीय लष्कराने दहशतवाद्यांचे कंबरडेच मोडले!
8
Operation Sindoor Live Updates: "यापुढेही भारतावर हल्ल्याची शक्यता, म्हणून उत्तर देणे गरजेचे होते"
9
Operation Sindoor: २५ मिनिटांत ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त; कर्नल सोफिया कुरैशी यांनी सांगितला थरार
10
Operation Sindoor : पाकिस्तानमध्ये हल्ल्याच्या २३ मिनिटे आधीच लष्कराने ट्विट केले? समोर आली माहिती
11
‘ऑपरेशन सिंदूर’चे श्रेय तुम्ही घेऊ नका, ते फक्त भारतीय सेनेचेच; संजय राऊतांची सरकारवर टीका
12
'ऑपरेशन सिंदूर'चा परिणाम! 'या' डिफेन्स स्टॉक्सने घेतली मोठी झेप; ३ महिन्यात नफा दुप्पट
13
Operation Sindoor: पाकिस्तान पिसाळला, शस्त्रसंधीचं उल्लंघन करत उखळी तोफा डागल्या, ७ भारतीयांचा मृत्यू
14
गृह मंत्रालय अलर्ट! निमलष्करी दलांच्या सुट्ट्या रद्द; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत-पाकमधील तणाव वाढला
15
पाकिस्तानी स्टॉक मार्केटचे काय हाल ऐकाल...; रात्री भारताची मिसाईल कोसळली, दिवसा भीतीने शेअर बाजार...
16
"आता ज्यांच्या पोटात दुखेल त्यांनी थेट माझा देश सोडून जावं", मराठी अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल
17
“भारताला स्वसंरक्षणाचा अधिकार, दहशतवाद्यांना...”; ‘ऑपरेशन सिंदूर’चे इस्रायलकडून खुले समर्थन
18
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'च नव्हे, भारताने आधीही पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 'या' मोठ्या कारवाया!
19
Operation Sindoor: 'सिंधू ते सिंदूर'पर्यंत...! भारताच्या 'या' १५ पावलांनी पाकिस्तानच्या नाकीनऊ आणले
20
FD/RD/PPF सगळं विसराल, SIP मध्ये लपलाय खरा खजिना; ₹५००० ची गुंतवणूक कशी बनवेल तुम्हाला कोट्यधीश

जिल्ह्यातील ५०० शिक्षकांच्या होणार ऑनलाईन बदल्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:13 IST

सर्वसाधारण क्षेत्रात दहा वर्षे, एका शाळेत पाच वर्षे वयाची अट अमरावती : गतवर्षी कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या शिक्षकांच्या बदल्यांना ...

सर्वसाधारण क्षेत्रात दहा वर्षे, एका शाळेत पाच वर्षे वयाची अट

अमरावती : गतवर्षी कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या शिक्षकांच्या बदल्यांना ग्रामविकास विभागाने हिरवी झेंडी दिली आहे. याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. एकूण शिक्षकांच्या १० टक्के बदल्या करण्यात येणार असल्याने जिल्हा परिषदेच्या सेवेत असलेल्या जवळपास ५०० शिक्षक यंदा स्थानांतरित होणार आहेत. वर्षानुवर्षे अतिदुर्गम भागात सेवा बजावत असलेल्या शिक्षकांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

शिक्षकांच्या दरवर्षीच बदल्या करण्याचे शासनाचे धोरण आहे. यंदा मे महिन्यातच या बदल्या करण्यात याव्यात, अशी सूचना देण्यात आली. या बदल्या पारदर्शी व्हाव्यात, यासाठी शासनस्तरावर ऑनलाइन प्रक्रिया केली जात असली तरी गाव, तालुका, जिल्हापातळीवर शिक्षकांची मंजूर पदे व रिक्त पदांचा मेळ घालूनच त्या करण्यात येणार आहेत. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता, शाळा कधी सुरू होतील, याविषयी अनिश्चितता असली तरी शिक्षकाविना एकही शाळा राहणार नाही व प्रक्रिया वेळेत व्हावी, अशाही सूचना आहेत.

बॉक्स

दिव्यांग, आजारी, विधवांना प्राधान्य

शासनाच्या बदल्यांच्या धोरणात दिव्यांग, गंभीर आजारी, विधवा, परित्यक्ता, हृदयरोगी, कॅन्सर, किडनीच्या आजाराने ग्रस्त शिक्षकांना या बदल्यांमध्ये प्राधान्य देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी अशा शिक्षकांना आपल्या आजाराविषयी प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.

बॉक्स

बदलीस पात्र शिक्षकांचे निकष निश्चित

शिक्षकांच्या बदल्या करताना त्यासाठी शासनाने निकष ठरवून दिले आहेत. एका ठिकाणी पाच वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वर्ष कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या बदल्या केल्या जाणार असून, त्यातही त्या-त्या शाळेतील शिक्षकांची सेवाज्येष्ठता गृहीत धरली जाणार आहे, जेणेकरून साेईच्या ठिकाणी वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्यांना अन्यत्र नेमणूक दिली जाणार आहे.

बॉक्स

आंतरजिल्हा बदलीसाठी पर्याय

अन्य जिल्ह्यात बदली करून जाणाऱ्या शिक्षकांनाही आंतरजिल्हा बदलीसाठी चार जिल्ह्यांचा पर्याय सुचवावा लागणार आहे. त्यातही त्यांनी प्राधान्यक्रम देणे क्रमप्राप्त आहे. त्या-त्या जिल्ह्यातील रिक्त पदे व तिथून बदलून येण्यास इच्छुक शिक्षकांच्या संख्येत या बदल्या केल्या जातील.

कोट

शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या बदली धोरणानुसार अजूनही काही शुद्धीपत्रकांची आवश्यकता आहे. बदली प्रक्रिया असंभव वाटते. शासननिर्णयानुसार सर्वप्रथम अवघड क्षेत्र घोषित होणे आवश्यक आहे. त्याशिवाय बदलीस पात्र शिक्षकांची संख्या निश्चित होणे कठीण आहे. त्यामुळे संघटनेने दिलेल्या सूचनाप्रमाणे शुद्धीपत्रक तातडीने काढणे गरजेचे आहे. बदली प्रक्रियेत राज्यस्तरावर नोडल अधिकारी व तांत्रिक अधिकारी यांची नेमणूक होणे आवश्यक आहे. परंतु, त्या दृष्टीने अद्याप कुठलीही कारवाई झाली नाही.

- किरण पाटील, राज्य उपाध्यक्ष, अ.भा. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ