शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
4
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
5
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
6
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
7
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
8
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
9
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
10
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
11
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
12
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
13
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
14
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
15
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
16
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
17
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
18
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
19
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
20
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...

पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांना ऑनलाईन प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 05:00 IST

केंद्राच्या सूचनेनुसार, राज्य शासनाकडून आता कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी रुग्णालयांची वर्गवारी करण्यात येत आहे. लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी कोरोना केअर रुग्णालये असून, सौम्य लक्षणे असलेल्यांसाठी कोरोना हेल्थ, तर तीव्र लक्षणे असलेल्यांकरिता कोरोना हॉस्पिटल, अशी त्रिस्तरीय वर्गवारी शासनाकडून करण्यात येत आहे. कोरोना चाचण्यांमध्ये एकही संशयित सुटता कामा नये, तसेच आवश्यक तिथे पुन:तपासणीची कार्यवाही होत असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

ठळक मुद्देपालकमंत्री : शासन निर्देशानुसार कोरोना हॉस्पिटलची त्रिस्तरीय वर्गवारी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी रुग्णालयांची वर्गवारी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. टेलिमेडिसीनच्या माध्यमातून रुग्णांना तज्ज्ञांच्या मदतीने आरोग्य सल्ला व उपचाराची सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांना वेबपोर्टलद्वारे ऑनलाईन प्रशिक्षण दिले जात आहे. तपासणीची कार्यवाही अधिक काटेकोर व व्यापक करण्यात येत आहे. आवश्यक तेथे पुन:तपासणी करण्याचे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी रविवारी दिले.केंद्राच्या सूचनेनुसार, राज्य शासनाकडून आता कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी रुग्णालयांची वर्गवारी करण्यात येत आहे. लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी कोरोना केअर रुग्णालये असून, सौम्य लक्षणे असलेल्यांसाठी कोरोना हेल्थ, तर तीव्र लक्षणे असलेल्यांकरिता कोरोना हॉस्पिटल, अशी त्रिस्तरीय वर्गवारी शासनाकडून करण्यात येत आहे. कोरोना चाचण्यांमध्ये एकही संशयित सुटता कामा नये, तसेच आवश्यक तिथे पुन:तपासणीची कार्यवाही होत असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अहवालानुसार, ४ हजार ४४६ नागरिकांची तपासणी करण्यात आली. गेल्या काही दिवसांत चाचणी वाढविण्यात आल्या आहेत. थ्रोट स्वॅब तपासणीसाठी ३८८ नमुने घेण्यात आले. त्यापैकी २६४ नमुने निगेटिव्ह आहेत. ९९ अहवाल प्रलंबित आहेत. २० अहवाल रिजेक्टेड असले तरी त्यातील १३ नमुने पुन:तपासणीसाठी पाठविण्यात येत आहेत. सर्व तपासण्या काटेकोर व्हाव्यात. कुठेही शंकेला वाव राहता कामा नये व सर्वांची सुरक्षितता जपली जावी, यासाठी सर्व प्रकारची खबरदारी घेण्यात येत आहे व आवश्यक तिथे पुन:तपासणी करण्यात येत आहे. बाधित क्षेत्रासाठी तात्काळ तपासणी, अलगीकरण, विलगीकरण धोरणाची परिणामकारक अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.रेशन वितरणात सोशल डिस्टन्सिंग महत्त्वाचेलॉकडाऊनचा कालावधी वाढ झाल्याने अन्नधान्य वितरणासाठी नियोजनपूर्वक व प्रभावीपणे काम करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्ह्यातील सर्व एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना गहू ८ रुपये प्रतीकिलो व तांदूळ १२ रुपये प्रतीकिलो या दराने प्रतिव्यक्ती तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ याप्रमाणे पाच किलो अन्नधान्य वितरित करण्यात येणार आहे. हे काम गतीने पूर्ण करण्याचे निर्देश पुरवठा यंत्रणेला दिले आहेत. धान्यवाटप करताना सोशल डिस्टन्सिंग पाळले जाईल, याची खबरदारी घेण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले.

टॅग्स :Yashomati Thakurयशोमती ठाकूर