शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांना ऑनलाईन प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 05:00 IST

केंद्राच्या सूचनेनुसार, राज्य शासनाकडून आता कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी रुग्णालयांची वर्गवारी करण्यात येत आहे. लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी कोरोना केअर रुग्णालये असून, सौम्य लक्षणे असलेल्यांसाठी कोरोना हेल्थ, तर तीव्र लक्षणे असलेल्यांकरिता कोरोना हॉस्पिटल, अशी त्रिस्तरीय वर्गवारी शासनाकडून करण्यात येत आहे. कोरोना चाचण्यांमध्ये एकही संशयित सुटता कामा नये, तसेच आवश्यक तिथे पुन:तपासणीची कार्यवाही होत असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

ठळक मुद्देपालकमंत्री : शासन निर्देशानुसार कोरोना हॉस्पिटलची त्रिस्तरीय वर्गवारी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी रुग्णालयांची वर्गवारी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. टेलिमेडिसीनच्या माध्यमातून रुग्णांना तज्ज्ञांच्या मदतीने आरोग्य सल्ला व उपचाराची सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांना वेबपोर्टलद्वारे ऑनलाईन प्रशिक्षण दिले जात आहे. तपासणीची कार्यवाही अधिक काटेकोर व व्यापक करण्यात येत आहे. आवश्यक तेथे पुन:तपासणी करण्याचे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी रविवारी दिले.केंद्राच्या सूचनेनुसार, राज्य शासनाकडून आता कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी रुग्णालयांची वर्गवारी करण्यात येत आहे. लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी कोरोना केअर रुग्णालये असून, सौम्य लक्षणे असलेल्यांसाठी कोरोना हेल्थ, तर तीव्र लक्षणे असलेल्यांकरिता कोरोना हॉस्पिटल, अशी त्रिस्तरीय वर्गवारी शासनाकडून करण्यात येत आहे. कोरोना चाचण्यांमध्ये एकही संशयित सुटता कामा नये, तसेच आवश्यक तिथे पुन:तपासणीची कार्यवाही होत असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अहवालानुसार, ४ हजार ४४६ नागरिकांची तपासणी करण्यात आली. गेल्या काही दिवसांत चाचणी वाढविण्यात आल्या आहेत. थ्रोट स्वॅब तपासणीसाठी ३८८ नमुने घेण्यात आले. त्यापैकी २६४ नमुने निगेटिव्ह आहेत. ९९ अहवाल प्रलंबित आहेत. २० अहवाल रिजेक्टेड असले तरी त्यातील १३ नमुने पुन:तपासणीसाठी पाठविण्यात येत आहेत. सर्व तपासण्या काटेकोर व्हाव्यात. कुठेही शंकेला वाव राहता कामा नये व सर्वांची सुरक्षितता जपली जावी, यासाठी सर्व प्रकारची खबरदारी घेण्यात येत आहे व आवश्यक तिथे पुन:तपासणी करण्यात येत आहे. बाधित क्षेत्रासाठी तात्काळ तपासणी, अलगीकरण, विलगीकरण धोरणाची परिणामकारक अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.रेशन वितरणात सोशल डिस्टन्सिंग महत्त्वाचेलॉकडाऊनचा कालावधी वाढ झाल्याने अन्नधान्य वितरणासाठी नियोजनपूर्वक व प्रभावीपणे काम करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्ह्यातील सर्व एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना गहू ८ रुपये प्रतीकिलो व तांदूळ १२ रुपये प्रतीकिलो या दराने प्रतिव्यक्ती तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ याप्रमाणे पाच किलो अन्नधान्य वितरित करण्यात येणार आहे. हे काम गतीने पूर्ण करण्याचे निर्देश पुरवठा यंत्रणेला दिले आहेत. धान्यवाटप करताना सोशल डिस्टन्सिंग पाळले जाईल, याची खबरदारी घेण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले.

टॅग्स :Yashomati Thakurयशोमती ठाकूर