शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

कांद्याचे भाव वधारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 23:41 IST

हल्ली बाजारपेठेत ४० ते ४५ रुपये प्रतिकिलो दराने कांदे विकले जात आहेत. गत आठवड्यात झालेल्या पावसाने कांदा उत्पादनाला फटका बसला आहे.

ठळक मुद्देप्रतिकिलो ४५ रुपये : अवकाळी पावसाने नव्या उत्पादनाला फटका

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : हल्ली बाजारपेठेत ४० ते ४५ रुपये प्रतिकिलो दराने कांदे विकले जात आहेत. गत आठवड्यात झालेल्या पावसाने कांदा उत्पादनाला फटका बसला आहे. जुन्या कांद्याची आवक सप्टेंबरअखेर मंदावली, तर नव्या उत्पादनाचे कांदे खराब झाले आहेत. त्यामुळे २० दिवसातच दर दुप्पट झाला आहे.शेतकºयांनी उन्हाळ्यात कांद्याचे उत्पादन घेतले तेव्हा मे २०१७ मध्ये शेतकºयांच्या कांद्याला बाजारात ५ ते ६ रुपये प्रतिकिलो भाव मिळाला. आता पाच महिन्यांनंतर शेतकºयांचा कांदा बंद होताच आॅक्टोबरमध्ये ४० ते ४५ रुपये प्रतिकिलो दर आहे. आॅगस्टपर्यंत १० ते १५ रुपये तर सप्टेंबर महिन्यात २० रुपये किलो दराने कांदा विकला गेला, अशी माहिती कांदा विक्रेते किशोर खारकर यांनी दिली. जिल्ह्यात परतवाडा, अचलपूर, मोर्शी, दर्यापूर, अंजनगाव बारी, चांदूरबाजार या भागात प्रामुख्याने कांद्याचे उत्पादन घेतले जाते. पावसाळी कांदा ऐन कापणीवर आला असताना परतीच्या पावसाने तो सडला. परिणामी बाजारपेठत त्याला भाव मिळत नाहीे. पावसाने फटका बसलेला कांदा बाजारपेठेत आणल्यानंतर वाहतुकीचा खर्च निघत नाही, अशी विदारक स्थिती आहे.उन्हाळी कांद्याचे उत्पादन सप्टेंबरमध्येच संपुष्टात आले. आॅक्टोबर महिन्यात नवा कांदा आल्यानंतर थोडाफार भावात दिलासा मिळेल, असे अपेक्षित होते. परंतु परतीच्या पावसाने कांदा उत्पादकांचे मोठे नुकसान केले आहे. बाजार समितीत लासलगाव, कोल्हापूर, नाशिकसह गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेशातून कांदा विक्रीसाठी मागविला जात आहे. लालसगावचा लाल रंगाचा कांदा असून, ठोक भाव ३८०० ते ४००० रुपये प्रतिक्विंटल आहे. कांद्याची आवक कमी झाल्यास पुढील दोन महिन्यात कांदा ८० ते १०० रुपये प्रतिकिलो दरावर पोहोचेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.२गुजरात, कर्नाटकातील कांद्यावर भिस्तपरतीच्या पावसाने राज्यात कांद्याचे उत्पादन कमालीचे घटले आहे. बाजारपेठेत मागणीनुसार कांदा येत नसल्याने भाववाढ झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे येत्या काळात राज्याला कर्नाटक, गुजरात येथून कांदा मागवावा लागेल. काही प्रमाणात उत्तरप्रदेशातूनही कांदा विक्रीसाठी आणला जाईल, अशी माहिती आहे.पावसाळी कांदा उत्पादनातून अधिक आर्थिक लाभ मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु, परतीच्या अवकाळी पावसाने कांद्याचे नुकसान केले आहे. कांदा खराब झाला असून, त्याला बाजारपेठेत भाव नाहीे. कांदा काढणीचा खर्चदेखील निघणे कठीण आहे.- सुनील शेरेवार,कांदा उत्पादक, बङनेराजुना कांदा बाजारेपेठेत येणे जवळपास बंद झाला आहे. पावसाळी कांद्याचे उत्पादन घटले असून, अवकाळी पावसाने यात भर घातली आहे. हीच परिस्थिती कायम असल्यास येत्या दोन महिन्यांत ६० ते ८० रुपये प्रतिकिलो दराने कांदा विकला जाईल.- सतीश कावरे,कांदा व्यापारी, बाजार समिती