शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याचे भाव वधारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 23:41 IST

हल्ली बाजारपेठेत ४० ते ४५ रुपये प्रतिकिलो दराने कांदे विकले जात आहेत. गत आठवड्यात झालेल्या पावसाने कांदा उत्पादनाला फटका बसला आहे.

ठळक मुद्देप्रतिकिलो ४५ रुपये : अवकाळी पावसाने नव्या उत्पादनाला फटका

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : हल्ली बाजारपेठेत ४० ते ४५ रुपये प्रतिकिलो दराने कांदे विकले जात आहेत. गत आठवड्यात झालेल्या पावसाने कांदा उत्पादनाला फटका बसला आहे. जुन्या कांद्याची आवक सप्टेंबरअखेर मंदावली, तर नव्या उत्पादनाचे कांदे खराब झाले आहेत. त्यामुळे २० दिवसातच दर दुप्पट झाला आहे.शेतकºयांनी उन्हाळ्यात कांद्याचे उत्पादन घेतले तेव्हा मे २०१७ मध्ये शेतकºयांच्या कांद्याला बाजारात ५ ते ६ रुपये प्रतिकिलो भाव मिळाला. आता पाच महिन्यांनंतर शेतकºयांचा कांदा बंद होताच आॅक्टोबरमध्ये ४० ते ४५ रुपये प्रतिकिलो दर आहे. आॅगस्टपर्यंत १० ते १५ रुपये तर सप्टेंबर महिन्यात २० रुपये किलो दराने कांदा विकला गेला, अशी माहिती कांदा विक्रेते किशोर खारकर यांनी दिली. जिल्ह्यात परतवाडा, अचलपूर, मोर्शी, दर्यापूर, अंजनगाव बारी, चांदूरबाजार या भागात प्रामुख्याने कांद्याचे उत्पादन घेतले जाते. पावसाळी कांदा ऐन कापणीवर आला असताना परतीच्या पावसाने तो सडला. परिणामी बाजारपेठत त्याला भाव मिळत नाहीे. पावसाने फटका बसलेला कांदा बाजारपेठेत आणल्यानंतर वाहतुकीचा खर्च निघत नाही, अशी विदारक स्थिती आहे.उन्हाळी कांद्याचे उत्पादन सप्टेंबरमध्येच संपुष्टात आले. आॅक्टोबर महिन्यात नवा कांदा आल्यानंतर थोडाफार भावात दिलासा मिळेल, असे अपेक्षित होते. परंतु परतीच्या पावसाने कांदा उत्पादकांचे मोठे नुकसान केले आहे. बाजार समितीत लासलगाव, कोल्हापूर, नाशिकसह गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेशातून कांदा विक्रीसाठी मागविला जात आहे. लालसगावचा लाल रंगाचा कांदा असून, ठोक भाव ३८०० ते ४००० रुपये प्रतिक्विंटल आहे. कांद्याची आवक कमी झाल्यास पुढील दोन महिन्यात कांदा ८० ते १०० रुपये प्रतिकिलो दरावर पोहोचेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.२गुजरात, कर्नाटकातील कांद्यावर भिस्तपरतीच्या पावसाने राज्यात कांद्याचे उत्पादन कमालीचे घटले आहे. बाजारपेठेत मागणीनुसार कांदा येत नसल्याने भाववाढ झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे येत्या काळात राज्याला कर्नाटक, गुजरात येथून कांदा मागवावा लागेल. काही प्रमाणात उत्तरप्रदेशातूनही कांदा विक्रीसाठी आणला जाईल, अशी माहिती आहे.पावसाळी कांदा उत्पादनातून अधिक आर्थिक लाभ मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु, परतीच्या अवकाळी पावसाने कांद्याचे नुकसान केले आहे. कांदा खराब झाला असून, त्याला बाजारपेठेत भाव नाहीे. कांदा काढणीचा खर्चदेखील निघणे कठीण आहे.- सुनील शेरेवार,कांदा उत्पादक, बङनेराजुना कांदा बाजारेपेठेत येणे जवळपास बंद झाला आहे. पावसाळी कांद्याचे उत्पादन घटले असून, अवकाळी पावसाने यात भर घातली आहे. हीच परिस्थिती कायम असल्यास येत्या दोन महिन्यांत ६० ते ८० रुपये प्रतिकिलो दराने कांदा विकला जाईल.- सतीश कावरे,कांदा व्यापारी, बाजार समिती