शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
2
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
3
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
4
ट्रम्प यांना आणखी एक धक्का! फ्रान्स पॅलेस्टिनी राष्ट्राला मान्यता देणार, मॅक्रॉन यांची मोठी घोषणा
5
₹५००० च्या SIP नं कसा बनेल ₹५ कोटींचा फंड? कमालीची आहे पद्धत, एकदा समजलात तर पैशांचं टेन्शन होईल दूर
6
१२८ किलोची वजनदार पत्नी अंगावर पडून पतीचा मृत्यू; सोशल मीडियावर पुन्हा घटना व्हायरल 
7
Stock Markets Today: वीकली एक्स्पायरीच्या दिवशी शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, निफ्टी ३० अंकांनी वाढून उघडला; ऑटो स्टॉक्समध्ये गुंतवणूकदारांची खरेदी
8
कंपनी मालकीन कर्मचाऱ्याच्या प्रेमात पडली, घटस्फोटासाठी कोट्यवधि रुपये मोजले; प्रकरण न्यायालयात पोहोचले
9
VIRAL : धडकी भरवणारी 'सफर'! अफगाणिस्तानातून विमानाच्या चाकात लपून भारतात पोहोचला १३ वर्षांचा मुलगा
10
अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श करणे म्हणजे बलात्कार नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
11
अपुऱ्या झोपेमुळे स्मृतिभ्रंशाचा मोठा धोका; ५ वर्षाच्या अभ्यासानंतर समोर आला धक्कादायक रिपोर्ट
12
इस प्यार को क्या नाम दूं? भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं?
13
स्क्रीनवर सोज्वळ, खऱ्या आयुष्यात बिकिनी? सीतेच्या भूमिकेत दिसणाऱ्या साई पल्लवीवर होतेय टीका
14
ट्रम्प यांच्या एच-1 बी शुल्क आदेशानंतर भारतीय प्रवासी एमिरेट्सच्या विमानातून उतरले, विमान ३ तास उशीरा
15
Mumbai Robbery: मोबाईल आणि ब्रँडेड घड्याळांच्या दुकानात दरोडा; चार सराईत गुन्हेगारांना अटक!
16
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
17
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
18
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
19
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
20
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर

कांद्याचे भाव वधारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 23:41 IST

हल्ली बाजारपेठेत ४० ते ४५ रुपये प्रतिकिलो दराने कांदे विकले जात आहेत. गत आठवड्यात झालेल्या पावसाने कांदा उत्पादनाला फटका बसला आहे.

ठळक मुद्देप्रतिकिलो ४५ रुपये : अवकाळी पावसाने नव्या उत्पादनाला फटका

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : हल्ली बाजारपेठेत ४० ते ४५ रुपये प्रतिकिलो दराने कांदे विकले जात आहेत. गत आठवड्यात झालेल्या पावसाने कांदा उत्पादनाला फटका बसला आहे. जुन्या कांद्याची आवक सप्टेंबरअखेर मंदावली, तर नव्या उत्पादनाचे कांदे खराब झाले आहेत. त्यामुळे २० दिवसातच दर दुप्पट झाला आहे.शेतकºयांनी उन्हाळ्यात कांद्याचे उत्पादन घेतले तेव्हा मे २०१७ मध्ये शेतकºयांच्या कांद्याला बाजारात ५ ते ६ रुपये प्रतिकिलो भाव मिळाला. आता पाच महिन्यांनंतर शेतकºयांचा कांदा बंद होताच आॅक्टोबरमध्ये ४० ते ४५ रुपये प्रतिकिलो दर आहे. आॅगस्टपर्यंत १० ते १५ रुपये तर सप्टेंबर महिन्यात २० रुपये किलो दराने कांदा विकला गेला, अशी माहिती कांदा विक्रेते किशोर खारकर यांनी दिली. जिल्ह्यात परतवाडा, अचलपूर, मोर्शी, दर्यापूर, अंजनगाव बारी, चांदूरबाजार या भागात प्रामुख्याने कांद्याचे उत्पादन घेतले जाते. पावसाळी कांदा ऐन कापणीवर आला असताना परतीच्या पावसाने तो सडला. परिणामी बाजारपेठत त्याला भाव मिळत नाहीे. पावसाने फटका बसलेला कांदा बाजारपेठेत आणल्यानंतर वाहतुकीचा खर्च निघत नाही, अशी विदारक स्थिती आहे.उन्हाळी कांद्याचे उत्पादन सप्टेंबरमध्येच संपुष्टात आले. आॅक्टोबर महिन्यात नवा कांदा आल्यानंतर थोडाफार भावात दिलासा मिळेल, असे अपेक्षित होते. परंतु परतीच्या पावसाने कांदा उत्पादकांचे मोठे नुकसान केले आहे. बाजार समितीत लासलगाव, कोल्हापूर, नाशिकसह गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेशातून कांदा विक्रीसाठी मागविला जात आहे. लालसगावचा लाल रंगाचा कांदा असून, ठोक भाव ३८०० ते ४००० रुपये प्रतिक्विंटल आहे. कांद्याची आवक कमी झाल्यास पुढील दोन महिन्यात कांदा ८० ते १०० रुपये प्रतिकिलो दरावर पोहोचेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.२गुजरात, कर्नाटकातील कांद्यावर भिस्तपरतीच्या पावसाने राज्यात कांद्याचे उत्पादन कमालीचे घटले आहे. बाजारपेठेत मागणीनुसार कांदा येत नसल्याने भाववाढ झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे येत्या काळात राज्याला कर्नाटक, गुजरात येथून कांदा मागवावा लागेल. काही प्रमाणात उत्तरप्रदेशातूनही कांदा विक्रीसाठी आणला जाईल, अशी माहिती आहे.पावसाळी कांदा उत्पादनातून अधिक आर्थिक लाभ मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु, परतीच्या अवकाळी पावसाने कांद्याचे नुकसान केले आहे. कांदा खराब झाला असून, त्याला बाजारपेठेत भाव नाहीे. कांदा काढणीचा खर्चदेखील निघणे कठीण आहे.- सुनील शेरेवार,कांदा उत्पादक, बङनेराजुना कांदा बाजारेपेठेत येणे जवळपास बंद झाला आहे. पावसाळी कांद्याचे उत्पादन घटले असून, अवकाळी पावसाने यात भर घातली आहे. हीच परिस्थिती कायम असल्यास येत्या दोन महिन्यांत ६० ते ८० रुपये प्रतिकिलो दराने कांदा विकला जाईल.- सतीश कावरे,कांदा व्यापारी, बाजार समिती