शहरं
Join us  
Trending Stories
1
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
2
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
3
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
4
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
5
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
6
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
7
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
8
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
9
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
10
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
11
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
12
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
13
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
14
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
15
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
16
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
17
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
18
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
19
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
20
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?

कांद्याने केला शेतकऱ्यांचा वांदा; भाव नीचांकीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 22:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : येथील फळ व भाजी बाजारात शेतकऱ्यांकडून आलेला कांद्याला उत्पादनापेक्षाही कमी भाव मिळत आहे. उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. तोच कांदा खासगी किरकोळ व्यापाऱ्यांनी विकत घेतल्यानंतर कृत्रिम भाववाढ करण्यात आल्याची चिन्हे आहेत. पांढºया कांद्याला क्विंटलमागे कमीत कमी २००, तर जास्तीत जास्त ६०० रुपये भाव शनिवारी मिळाला.शेतकऱ्यांच्या ...

ठळक मुद्देकिमान २०० रुपये क्विंटल : बाजारात किरकोळ भाव मात्र १५ रुपये, ग्राहकांना दिलासा नाही

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : येथील फळ व भाजी बाजारात शेतकऱ्यांकडून आलेला कांद्याला उत्पादनापेक्षाही कमी भाव मिळत आहे. उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. तोच कांदा खासगी किरकोळ व्यापाऱ्यांनी विकत घेतल्यानंतर कृत्रिम भाववाढ करण्यात आल्याची चिन्हे आहेत. पांढºया कांद्याला क्विंटलमागे कमीत कमी २००, तर जास्तीत जास्त ६०० रुपये भाव शनिवारी मिळाला.शेतकऱ्यांच्या लाल व पांढºया कांद्याला चार ते सहा रुपये भाव मिळत आहेत. तर हाच कांदा किरकोळ व्यापाऱ्यांनी विकत घेतल्यानंतर तो जेव्हा ग्राहकांना विकला जातो, तो पंधरा ते वीस रुपये जातो. फळ व भाजी बाजारातून माहिती घेतली असता, पांढऱ्या कांद्याची आवक ४६५ क्विंटल होती. कमीत कमी २०० रुपये क्विंटलमागे भाव मिळाला, तर जास्तात जास्त ६०० रुपये भाव मिळाला, तर लाल कांद्याची आवक २४५ क्विंटल झाली. या कांद्यालाही भाव नसून कमीत कमी ३०० रूपये क्विंटल ते जास्तीत जास्त ५०० रुपये क्विंटल एवढा भाव मिळला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चसुद्धा काढणे अवगळ झाल्याचे अनेक शेतकऱ्यांनी सांगितले.सकाळी हर्रास झाल्यानंतर खासगी किरकोळ भाजीपाला विक्रेत्यांनी कृत्रिम भाववाढ केली आहे. मात्र, जो शेतकरी शेतात राबराब राबून शेती उत्पादन काढतो, त्याला भाजीपाल्याला उत्तम भाव मिळविण्यात अपयश येत आहे. पिकाला व्यापाऱ्यांकडून भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत कांद्याने पाणी आणले आहे. कांद्याच्या उत्पादन खर्चामध्ये क्विंटलमागे खर्च जास्त होत असल्याने कांद्याचे पिक घ्यावे की नाही, असा प्रश्न त्यांच्या समोर उभा ठाकला आहे.