शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

कांद्याने केला शेतकऱ्यांचा वांदा; भाव नीचांकीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 22:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : येथील फळ व भाजी बाजारात शेतकऱ्यांकडून आलेला कांद्याला उत्पादनापेक्षाही कमी भाव मिळत आहे. उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. तोच कांदा खासगी किरकोळ व्यापाऱ्यांनी विकत घेतल्यानंतर कृत्रिम भाववाढ करण्यात आल्याची चिन्हे आहेत. पांढºया कांद्याला क्विंटलमागे कमीत कमी २००, तर जास्तीत जास्त ६०० रुपये भाव शनिवारी मिळाला.शेतकऱ्यांच्या ...

ठळक मुद्देकिमान २०० रुपये क्विंटल : बाजारात किरकोळ भाव मात्र १५ रुपये, ग्राहकांना दिलासा नाही

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : येथील फळ व भाजी बाजारात शेतकऱ्यांकडून आलेला कांद्याला उत्पादनापेक्षाही कमी भाव मिळत आहे. उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. तोच कांदा खासगी किरकोळ व्यापाऱ्यांनी विकत घेतल्यानंतर कृत्रिम भाववाढ करण्यात आल्याची चिन्हे आहेत. पांढºया कांद्याला क्विंटलमागे कमीत कमी २००, तर जास्तीत जास्त ६०० रुपये भाव शनिवारी मिळाला.शेतकऱ्यांच्या लाल व पांढºया कांद्याला चार ते सहा रुपये भाव मिळत आहेत. तर हाच कांदा किरकोळ व्यापाऱ्यांनी विकत घेतल्यानंतर तो जेव्हा ग्राहकांना विकला जातो, तो पंधरा ते वीस रुपये जातो. फळ व भाजी बाजारातून माहिती घेतली असता, पांढऱ्या कांद्याची आवक ४६५ क्विंटल होती. कमीत कमी २०० रुपये क्विंटलमागे भाव मिळाला, तर जास्तात जास्त ६०० रुपये भाव मिळाला, तर लाल कांद्याची आवक २४५ क्विंटल झाली. या कांद्यालाही भाव नसून कमीत कमी ३०० रूपये क्विंटल ते जास्तीत जास्त ५०० रुपये क्विंटल एवढा भाव मिळला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चसुद्धा काढणे अवगळ झाल्याचे अनेक शेतकऱ्यांनी सांगितले.सकाळी हर्रास झाल्यानंतर खासगी किरकोळ भाजीपाला विक्रेत्यांनी कृत्रिम भाववाढ केली आहे. मात्र, जो शेतकरी शेतात राबराब राबून शेती उत्पादन काढतो, त्याला भाजीपाल्याला उत्तम भाव मिळविण्यात अपयश येत आहे. पिकाला व्यापाऱ्यांकडून भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत कांद्याने पाणी आणले आहे. कांद्याच्या उत्पादन खर्चामध्ये क्विंटलमागे खर्च जास्त होत असल्याने कांद्याचे पिक घ्यावे की नाही, असा प्रश्न त्यांच्या समोर उभा ठाकला आहे.