शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

शिवारात कांदा, लसूण पीक काढण्याची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:11 IST

पान २ ची बॉटम सरासरी पावसामुळे विहिरींना पाणी : पहूर, वेणी गणेशपूर शिवारात पेरणी नांदगाव खंडेश्वर : तालुक्यात ...

पान २ ची बॉटम

सरासरी पावसामुळे विहिरींना पाणी : पहूर, वेणी गणेशपूर शिवारात पेरणी

नांदगाव खंडेश्वर : तालुक्यात उन्हाळ्यातील कांदा व लसूण पीक काढण्याची लगबग सुरू झाली आहे. तालुक्यात १२३ हेक्टर कांद्याची लागवड झाली होती. शेतकऱ्यांनी आता कांदा व लसूण पीक काढणे सुरू केले आहे.

तालुक्यात यावर्षी ९८४ मिमी पाऊस पडल्याने शेतीतील विहिरीला सिंचनासाठी पाणी होते. त्याच्या बळावर रबी हंगामात ६ हजार २०० हेक्टर क्षेत्रात गहू व ८ हजार हेक्टर क्षेत्रात हरभरा पिकाचा पेरा झाला. बऱ्याच शेतकऱ्यांनी उन्हाळी भुईमूग, कांदा, लसूण पिकांचीही यावर्षी लागवड केली.

लसूण पीक हे पाच महिन्यांचे असून, ऑक्टोबर महिन्यात या पिकाची लागवड करण्यात आली मार्चअखेर लसूण पीक काढण्याचे काम सुरू झाले आहे. पहूर, वेणी गणेशपूर, जावरा, रोहना, मोखड, शिवनी, गौरखेडा, कोव्हळा जटेश्वर, धानोरा गुरव परिसरात लसूण पिकाची यावर्षी शेतकऱ्यांनी लागवड केली.

पिकाच्या लागवडीसाठी एकरी साडेतीन क्विंटल लसूण कळीचे बेणे लागते. या पिकास कीटकनाशक व बुरशीनाशकची पाच ते सहा वेळा फवारणी करावी लागते. लागवड, निंदण व काढणीचा सुमारे एकरी १५ हजार रुपयांचा खर्च होतो तसेच तीन वेळा रासायनिक खते व एकरी चार ट्रॅक्टर शेणखत द्यावे लागते. अशाप्रकारे ८० हजार रुपये एकरी खर्च या पिकासाठी होतो. एकरी ५० ते १०० क्विंटल पिकाचे उत्पादन अपेक्षित असते. जैविक पद्धतीचा वापर केल्यास पिकाचे हमखास उत्पादन मिळते, असे पहूरचे शेतकरी अजय बेले यांनी सांगितले.

असे काढा उत्पादन

सपाट मैदानी भागात लसणासाठी उपयुक्त हवामान नोव्हेंबर ते एप्रिल महिन्यांदरम्यान उपलब्ध असते. त्यामुळे ९० टक्के लागवड ही ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात होते. तापमानास संवेदनशील असे पीक असल्याने भरपूर व दर्जेदार उत्पादनासाठी लागवडीचा योग्य हंगाम साधणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात लसणाची लागवड ऑक्टोबर महिन्यात करणे योग्य आहे. हे पीक थंड हवेस प्रतिसाद देते. पण, गडुा पक्व होत असताना व काढणीच्या काळात कोरडे हवामान आवश्यक असते. लसणाच्या पाकळ्या लावल्यानंतर पानांची वाढ होते व त्यांची संख्या वाढते. हा काळ साधारणपणे ४५ ते ५० दिवसांचा असतो. या काळात रात्रीचे तापमान १० ते १५ अंश व दिवसाचे तापमान २५ ते २८ अंश सेंटिग्रेड दरम्यान लागते.

११ ते १२ तास सूर्यप्रकाश आवश्यक

हवेत ७० ते ८० टके आर्द्रता व ११ ते १२ तास सूर्यप्रकाश हवा. यानंतर पाकळ्या पोसू लागतात व गडुा आकाराने वाढू लागतो. हा कालावधी ३० ते ४० दिवसांचा असतो. या काळात हवेतील आर्द्रता कमी व तापमान वाढलेले पाहिजे. त्यामुळे पात वाळणे, गडुा सुकणे या क्रिया सुलभ होतात. महाराष्ट्रात लसणाची लागवड ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात केली जाते. उशिरा लागवड झाली, तर गड्यांचा आकार कमी होतो. वजन कमी भरते व उत्पादनदेखील कमी येते. थंड व पहाडी क्षेत्रात लावल्या जाणाऱ्या जाती वेगळ्या असतात. या जातीमध्ये १० ते १२ पाकळ्या असतात. परंतु, प्रत्येक पाकळ्याचे वजन चार ते पाच ग्रॅम असल्यामुळे गडुा आकाराने मोठा असतो. या जाती महाराष्ट्रातील हवामानात येत नाहीत. केवळ पाने वाढतात व पाकळ्या तयार होत नाहीत.