शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
2
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
3
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
4
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
5
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
6
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
7
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
8
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
9
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
10
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
11
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
12
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
13
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
14
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
15
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
16
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
17
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
18
मनाविरुद्ध काही झालं की संताप होतो, चिडचिड होते? रागावर नियंत्रण मिळवण्याच्या ६ टिप्स
19
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
20
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?

शिवारात कांदा, लसूण पीक काढण्याची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:11 IST

पान २ ची बॉटम सरासरी पावसामुळे विहिरींना पाणी : पहूर, वेणी गणेशपूर शिवारात पेरणी नांदगाव खंडेश्वर : तालुक्यात ...

पान २ ची बॉटम

सरासरी पावसामुळे विहिरींना पाणी : पहूर, वेणी गणेशपूर शिवारात पेरणी

नांदगाव खंडेश्वर : तालुक्यात उन्हाळ्यातील कांदा व लसूण पीक काढण्याची लगबग सुरू झाली आहे. तालुक्यात १२३ हेक्टर कांद्याची लागवड झाली होती. शेतकऱ्यांनी आता कांदा व लसूण पीक काढणे सुरू केले आहे.

तालुक्यात यावर्षी ९८४ मिमी पाऊस पडल्याने शेतीतील विहिरीला सिंचनासाठी पाणी होते. त्याच्या बळावर रबी हंगामात ६ हजार २०० हेक्टर क्षेत्रात गहू व ८ हजार हेक्टर क्षेत्रात हरभरा पिकाचा पेरा झाला. बऱ्याच शेतकऱ्यांनी उन्हाळी भुईमूग, कांदा, लसूण पिकांचीही यावर्षी लागवड केली.

लसूण पीक हे पाच महिन्यांचे असून, ऑक्टोबर महिन्यात या पिकाची लागवड करण्यात आली मार्चअखेर लसूण पीक काढण्याचे काम सुरू झाले आहे. पहूर, वेणी गणेशपूर, जावरा, रोहना, मोखड, शिवनी, गौरखेडा, कोव्हळा जटेश्वर, धानोरा गुरव परिसरात लसूण पिकाची यावर्षी शेतकऱ्यांनी लागवड केली.

पिकाच्या लागवडीसाठी एकरी साडेतीन क्विंटल लसूण कळीचे बेणे लागते. या पिकास कीटकनाशक व बुरशीनाशकची पाच ते सहा वेळा फवारणी करावी लागते. लागवड, निंदण व काढणीचा सुमारे एकरी १५ हजार रुपयांचा खर्च होतो तसेच तीन वेळा रासायनिक खते व एकरी चार ट्रॅक्टर शेणखत द्यावे लागते. अशाप्रकारे ८० हजार रुपये एकरी खर्च या पिकासाठी होतो. एकरी ५० ते १०० क्विंटल पिकाचे उत्पादन अपेक्षित असते. जैविक पद्धतीचा वापर केल्यास पिकाचे हमखास उत्पादन मिळते, असे पहूरचे शेतकरी अजय बेले यांनी सांगितले.

असे काढा उत्पादन

सपाट मैदानी भागात लसणासाठी उपयुक्त हवामान नोव्हेंबर ते एप्रिल महिन्यांदरम्यान उपलब्ध असते. त्यामुळे ९० टक्के लागवड ही ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात होते. तापमानास संवेदनशील असे पीक असल्याने भरपूर व दर्जेदार उत्पादनासाठी लागवडीचा योग्य हंगाम साधणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात लसणाची लागवड ऑक्टोबर महिन्यात करणे योग्य आहे. हे पीक थंड हवेस प्रतिसाद देते. पण, गडुा पक्व होत असताना व काढणीच्या काळात कोरडे हवामान आवश्यक असते. लसणाच्या पाकळ्या लावल्यानंतर पानांची वाढ होते व त्यांची संख्या वाढते. हा काळ साधारणपणे ४५ ते ५० दिवसांचा असतो. या काळात रात्रीचे तापमान १० ते १५ अंश व दिवसाचे तापमान २५ ते २८ अंश सेंटिग्रेड दरम्यान लागते.

११ ते १२ तास सूर्यप्रकाश आवश्यक

हवेत ७० ते ८० टके आर्द्रता व ११ ते १२ तास सूर्यप्रकाश हवा. यानंतर पाकळ्या पोसू लागतात व गडुा आकाराने वाढू लागतो. हा कालावधी ३० ते ४० दिवसांचा असतो. या काळात हवेतील आर्द्रता कमी व तापमान वाढलेले पाहिजे. त्यामुळे पात वाळणे, गडुा सुकणे या क्रिया सुलभ होतात. महाराष्ट्रात लसणाची लागवड ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात केली जाते. उशिरा लागवड झाली, तर गड्यांचा आकार कमी होतो. वजन कमी भरते व उत्पादनदेखील कमी येते. थंड व पहाडी क्षेत्रात लावल्या जाणाऱ्या जाती वेगळ्या असतात. या जातीमध्ये १० ते १२ पाकळ्या असतात. परंतु, प्रत्येक पाकळ्याचे वजन चार ते पाच ग्रॅम असल्यामुळे गडुा आकाराने मोठा असतो. या जाती महाराष्ट्रातील हवामानात येत नाहीत. केवळ पाने वाढतात व पाकळ्या तयार होत नाहीत.