शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
2
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
3
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
4
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
5
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
6
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
7
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
8
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
9
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
10
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
11
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
12
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
13
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
14
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
15
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
16
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
17
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
18
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
19
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
20
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन

१० दिवसांत एक टक्काच कर्जवाटप

By admin | Updated: July 6, 2017 00:11 IST

शासनाने कर्जमाफी केली असली तरी शेतकऱ्यांच्या मागचे संकट संपता संपत नाही.

अंकुश कुणाचा ? : १३०० कोटींचे पीककर्ज वाटप बाकीलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शासनाने कर्जमाफी केली असली तरी शेतकऱ्यांच्या मागचे संकट संपता संपत नाही.खरिपात अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना तातडीचे १० हजाराचे कर्ज देखील बँकांनी दिलेले नाही. याउलट खरिपाच्या पीककर्ज वाटपासाठी हात वर केले आहेत. मागील १० दिवसांत केवळ एक टक्काच पीककर्ज वाटप केल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.यंदाच्या हंगामासाठी जिल्ह्यातील बँकाना १,५९२ कोटी ५४ लाख ८० हजारांच्या पीककर्ज वाटपाचा लक्ष्यांक असताना बँकांनी सद्यस्थितीत २८ हजार ६७६ शेतकऱ्यांना २९१ कोटी ५५ लाखांचे कर्जवाटप केले आहे. ही टक्केवारी १८ टक्के इतकी आहे. यामध्ये जिल्हा सहकारी बँकेने १८ हजार २१६ शेतकऱ्यांना १६९ कोटी ७१ लाखांचे कर्जवाटप केले आहे. ही टक्केवारी ३३ टक्के इतकी आहे.राष्ट्रीयीकृत बँकांनी १० हजार २१८ शेतकऱ्यांना ११९ कोटी ९३ लाखांचे वाटप केले. ही टक्केवारी ११ टक्के इतकी असून ग्रामीण बँकांनी फक्त २४२ शेतकऱ्यांना एक कोटी ९१ लाख रूपयांचे कर्जवाटप केले असून ही टक्केवारी १४ टक्के इतकी आहे.यापूर्वी २३ जूनला बँकांनी २७ हजार १४८ शेतकऱ्यांना २७० कोटी १७ लाखांचे कर्जवाटप केले होते. म्हणजेच बँकांनी १० दिवसांत केवळ एक हजार ५२८ शेतकऱ्यांना २१ कोटी ३८ लाखांचे कर्जवाटप केले आहे. शासनाने एक एप्रिल २०१२ ते ३० जून २०१६ या कालावधीत पीककर्ज व मध्यममुदती पीककर्ज घेतलेल्या व अशा कर्जाचे ३० जूनपर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना काही अटींच्या अधीन राहून दीड लाखांपर्यत कर्जमाफी दिली. मात्र, हे शेतकरी थकबाकीदार असल्याने बँका याशेतकऱ्यांना कर्ज देत नाही. किंबहुना शेतकऱ्यांना यंदाच्या खरिपासाठी कर्ज देण्यास बँकानी हात वर केल्याने शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे.१ जुलैला पालकमंत्र्यासह जिल्हाधिकाऱ्यांनी बँक अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शेतकऱ्यांना १० हजारांचे तातडीचे कर्ज देण्याच्या सूचना दिल्या होत्या. जिल्ह्यात किमान तीन लाख शेतकरी यासाठी पात्र आहेत. कर्जाची हमी शासनाने घेतली असताना एकाही बँकेने शेतकऱ्यांना कर्ज दिले नाही. जिल्हा बँकेने राज्य सहकारी बँकेला कर्ज मागीतले असता ८.७५ टक्के व्याज आकारणी असल्याने हा प्रस्ताव थंडबस्त्यात पडला आहे. तर व्यावसायिक बँकाना एसएलबीसी व आरबीआयच्या सूचना नसल्याने त्यांनी कर्जवाटप केले नाही. शासन व प्रशासनाला बँका कितपत जुमानतात, हे त्याचे उदाहरण म्हणता येईल. एसबीआय ११, बीओआयचे १० टक्केजिल्ह्यातील अग्रणी बँक आॅफ इंडियाने १० टक्के तर जिल्ह्यात शाखांचे जाळे असणाऱ्या स्टेट बँकेने केवळ लक्ष्यांकाच्या ११ टक्केच कर्जवाटप केले आहे. बँक आॅफ महाराष्ट्र ११ टक्के, पंजाब नॅशनल बँक ९ टक्के, देना बँक ९ टक्के, बँक आॅफ बडोदा २१ टक्के, इंडियन बँक, िसंडिकेट बँक, युको बँक यांचा एक टक्का तर स्टेट बँक आॅफ हैद्राबादचे वाटप निरंक आहे.शेतकऱ्यांनी मागणी करताच त्यांना पीककर्ज देण्यात येते. बँकानी कुणालाच माघारी पाठविले नाही. १० हजारांचे कर्जवाटप करण्याच्या सूचना दिल्या आहेत. लवकरच जिल्हा बँकेव्दारा कर्जवाटप करण्यात येईल - गौतम वालदे, जिल्हा उपनिबंधक