शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

शंभर टक्के नुकसान झाले तरी पीक विमा अप्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:12 IST

अंजनगाव सुर्जी : गतवर्षीचा सोयाबीन, कपाशी व संत्रा पिकाचा विमा मिळण्याबाबत अंजनगाव तालुका शेतकरी संघटनेने संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार निवेदने ...

अंजनगाव सुर्जी : गतवर्षीचा सोयाबीन, कपाशी व संत्रा पिकाचा विमा मिळण्याबाबत अंजनगाव तालुका शेतकरी संघटनेने संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार निवेदने दिली. परंतु दखल न घेतल्यामुळे संघटनेने नाईलाजास्तव रास्ता रोको आंदोलन केले. त्यालाही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर कृषी कार्यालयाला घेराव व टाळे ठोको आंदोलन करण्यात आले. दरम्यान सभास्थळी कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना माहिती देताना, विमा देण्यासंदर्भात सरकारी निकष आडवे येत असल्याने अपली असमर्थता व्यक्त केली. शेतकरी संघटनेने याच विषयासंबंधात ६ सप्टेंबर रोजी तहसीलदारांना निवेदन दिले होते. पण, अद्याप सकारात्मक कारवाई केलेली नाही.

शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान होऊनसुद्धा पीक विमा मिळाला नाही. याबाबतीत पालकमंत्री, जिल्हाधिकारी व कृषी आयुक्तांसोबत चर्चा घडवून आणावी, अशा आशयाचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले होते. २३ सप्टेंबर रोजी याचसंदर्भात तहसीलदारांना स्मरणपत्र देण्यात आले. सनदशीर मार्गाने न्याय्य मागणीसाठी आंदोलन करूनही न्याय मिळत नाही. शेतीची कामे लक्षात घेता न्याय्य हक्कासाठी शेतकऱ्यांवर वारंवार आंदोलनाची वेळ येत असल्याने शासकीय यंत्रणेचा हलगर्जीपणा यातून स्पष्ट होते. विमा कंपन्यांशी साटेलोटे करून कंपनीचा गल्ला भरण्यास सरकारी व शासकीय यंत्रणा काम करते की, काय असा संशय शेतकऱ्यांना येत आहे.

संबंधित अधिकारी, पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घडवून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई त्वरित देण्यात यावी, अन्यथा शेतकरी संघटना बेमुदत आंदोलन करेल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे तहसीलदारांना स्मरणपत्रात म्हटले आहे. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माधव गावंडे, तालुकाध्यक्ष संजय हाडोळे, स्वभाप तालुकाध्यक्ष गजानन दुधाट, माणिकराव मोरे, सुनील पाटील साबळे, अशोक गीते, देवीदास ढोक, मनोहर रेचे, सुरेश महाराज मानकर शास्त्री, संजय हिंगे, अरुण गोंडचोर, ओम प्रकाश मुरतकर, ज्ञानेश्वर वानखडे, गणेशराव चिंचोळकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.