शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
7
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
8
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
9
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
10
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
11
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
12
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
13
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
15
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
16
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
17
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
18
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
19
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
20
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली

ग्रामविकासासाठी शंभर टक्के निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:30 IST

अमरावती : राज्याच्या अर्थचक्राला गती देण्यासाठी राज्य शासनाने राजकोषीय उपाययोजना जाहीर केल्या आहेत. त्यानुसार जिल्हा नियोजन समितीने २०२०-२१ या ...

अमरावती : राज्याच्या अर्थचक्राला गती देण्यासाठी राज्य शासनाने राजकोषीय उपाययोजना जाहीर केल्या आहेत. त्यानुसार जिल्हा नियोजन समितीने २०२०-२१ या वर्षासाठी मंजूर केलेल्या नियत व्ययासाठी १०० टक्के निधी वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेला आता नवीन कामांचे नियोजन करता येणार असून, गतवर्षाच्या दायित्वालाही निधी मिळणार आहे. यामुळे जिल्हा परिषद सदस्य, पदाधिकाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

राज्य शासनाने राजकोषीय उपाययोजना जाहीर करताना सर्व विभागांना ७५ टक्के निधी मंजूर करण्याचा निर्णय १० नोव्हेंबरच्या शासननिर्णयाद्वारे घेतला होता. त्यामध्ये मोठी संदिग्धता होती. जिल्हा परिषदेला नेमका किती टक्के निधी मिळेल, याचा बोध त्या निर्णयात होत नव्हता. यासाठी जिल्हा परिषदेकडे जिल्हा नियोजन अधिकार्‍यांकडे वारंवार विचारणा होत होती. त्यांनाही याबाबत स्पष्टता होत नव्हती. यामुळे नियोजन विभागाकडून मार्गदर्शन मागवले होते. यामुळे वित्त विभागाच्या लक्षात ही बाब आल्याने त्यांनी शुद्धीपत्रक आधारे आता जिल्हा नियोजन समितीने मंजूर केलेला १०० टक्के निधी वितरित करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निधीतून दायित्वाची रक्कम वजा जाता उर्वरित निधीतून नियोजन करता येणार आहे. सरकारने जिल्हा नियोजन समितीबरोबरच आमदारांच्या स्थानिक विकास निधीसाठीही शंभर टक्के निधी वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता विधानसभा मतदारसंघांमध्ये ही कामे करता येणार आहेत. कोरोना संकटामुळे शासनाने निधीमध्ये ६७ टक्के कपात केल्यामुळे सर्व शासकीय योजनांची कामे बंद होती. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी ही कामे पुन्हा सुरू होणार आहे. ही कामे करताना रोजगार निर्मिती व मत्ता निर्मितीला प्राधान्य देण्याचे शासनाने निर्देश दिले आहेत.

कोट

सरकारने जिल्हा परिषदेला १०० टक्के निधी देण्याचा निर्णय घेतल्याने ग्रामीण भागातील विकासकामांना चालना मिळणार आहे. सर्वसाधारण सभा झाल्यानंतर नवीन कामांच्या नियोजनाला प्राधान्य दिले जाणार असून, प्रशासनाला तसे निर्देश दिले आहेत. पालकमंत्र्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी मिळविण्याचा प्रयत्न आहे.

- बबलू देशमुख, अध्यक्ष, जिल्हा परिषद