शहरं
Join us  
Trending Stories
1
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
2
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
3
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
4
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
5
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
6
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री
7
रिंकू राजगुरूचा सिंपल पण स्टायलिश लूक, फोटो नाही तर कॅप्शनने वेधलं सर्वांच लक्ष
8
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
9
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
10
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
11
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)
12
पिवळी साडी... शेत... मादक अदा... पाहा, भारतीय क्रिकेटरच्या बहिणीचे ग्लॅमरस PHOTOS
13
वडिलांनीच घेतला मुलाची जीव, हॉटेलमध्ये नेले, बेदम मारहाण केली आणि...  
14
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
15
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
16
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
17
'लग्न टिकवायचं असेल तर स्त्रीने नेहमीच..." शर्मिला टागोर यांनी लेक सोहाला दिला होता 'हा' सल्ला
18
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
19
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
20
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची हे गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!

दर ३० तासांत एक शेतकरी आत्महत्या

By admin | Updated: August 29, 2015 23:56 IST

दुष्काळ, नापिकीचे सत्र, दरवर्षी वाढत असलेले बँकांचे व सावकारांचे कर्ज यामुळे जिल्ह्यात दर ३० तासांत एक कर्जबाजारी शेतकरी मृत्यूला कवटाळत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

धक्कादायक : विशेष पॅकेजमध्ये जिल्ह्याचा समावेश नाहीगजानन मोहोड अमरावतीदुष्काळ, नापिकीचे सत्र, दरवर्षी वाढत असलेले बँकांचे व सावकारांचे कर्ज यामुळे जिल्ह्यात दर ३० तासांत एक कर्जबाजारी शेतकरी मृत्यूला कवटाळत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. १ ते २० आॅगस्ट या २० दिवसांत १० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. जानेवारी ते २० आॅगस्ट या २३२ दिवसांत १७१ शेतकऱ्यांनी मृत्यूचा फास जवळ केला आहे. राज्यात कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या अमरावती विभागात होत असून त्यामध्ये यवतमाळ जिल्हा सर्वात पुढे आहे. दुसऱ्या क्रमांकावर औरंगाबाद विभागातील उस्मानाबाद तर अमरावती जिल्ह्याचा तिसरा क्रमांक लागतोे. शासनाने २४ जुलै २०१५ रोजी यवतमाळ व उस्मानाबाद जिल्ह्यासाठी विशेष मदतीचा कार्यक्रम घोषित केला मात्र, अमरावती जिल्ह्याला डावलले गेले. या दोन जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांबाबतचे कामकाज करण्याकरिता विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. सद्यस्थितीत या अंतर्गत १०० कोटींवर रूपयांची कामे करण्यात येणार आहेत. सन २०१४ च्या तुलनेत २०१५ मध्ये अमरावती जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले असल्याने या जिल्ह्याचा समावेश विशेष पॅकेजमध्ये करणे महत्वाचे आहे.जिल्ह्यात १ जानेवारी २००१ ते २० आॅगस्ट २०१५ दरम्यान २ हजार ३९७ कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. २०१४ मध्ये १५६ शेतकऱ्यांनी मृत्यूचा फास आवळला आहे.जुलै २०१५ मध्ये दर दिवशी शेतकरी आत्महत्याजानेवारी ते २० आॅगस्ट २०१५ दरम्यान १७१ शेतकऱ्यांनी कर्जापायी मृत्यूला कवटाळले आहे. यंदा सर्वाधिक ३२ शेतकऱ्यांच्या आत्महत्या जुलै महिन्यात झाल्या आहेत. यापैकी ९ प्रकरणे पात्र, ५ अपात्र तर २१ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत.मिशनचे पुनर्गठनआत्महत्याप्रवण जिल्ह्यात विशेष पॅकेजची अंमलबजावणी करण्यासाठी यापूर्वी शासनाने कै. वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशनची स्थापना केली. मात्र, काही वर्षांपासून मिशनचा कारभार ठप्प पडला होता. २४ आॅगस्टच्या शासन निर्णयानुसार मिशनचे पुनर्गठन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना अन्नसुरक्षा, आरोग्य सेवा, शेतीविकास कार्यक्रम, मुलांचे शिक्षण आदी उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.