शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
3
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
4
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
5
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
6
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
7
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
8
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
9
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
10
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
11
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
12
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
13
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
14
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
15
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
16
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
17
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
18
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
19
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
20
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'

दर ३० तासांत एक शेतकरी आत्महत्या

By admin | Updated: August 29, 2015 23:56 IST

दुष्काळ, नापिकीचे सत्र, दरवर्षी वाढत असलेले बँकांचे व सावकारांचे कर्ज यामुळे जिल्ह्यात दर ३० तासांत एक कर्जबाजारी शेतकरी मृत्यूला कवटाळत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

धक्कादायक : विशेष पॅकेजमध्ये जिल्ह्याचा समावेश नाहीगजानन मोहोड अमरावतीदुष्काळ, नापिकीचे सत्र, दरवर्षी वाढत असलेले बँकांचे व सावकारांचे कर्ज यामुळे जिल्ह्यात दर ३० तासांत एक कर्जबाजारी शेतकरी मृत्यूला कवटाळत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. १ ते २० आॅगस्ट या २० दिवसांत १० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. जानेवारी ते २० आॅगस्ट या २३२ दिवसांत १७१ शेतकऱ्यांनी मृत्यूचा फास जवळ केला आहे. राज्यात कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या अमरावती विभागात होत असून त्यामध्ये यवतमाळ जिल्हा सर्वात पुढे आहे. दुसऱ्या क्रमांकावर औरंगाबाद विभागातील उस्मानाबाद तर अमरावती जिल्ह्याचा तिसरा क्रमांक लागतोे. शासनाने २४ जुलै २०१५ रोजी यवतमाळ व उस्मानाबाद जिल्ह्यासाठी विशेष मदतीचा कार्यक्रम घोषित केला मात्र, अमरावती जिल्ह्याला डावलले गेले. या दोन जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांबाबतचे कामकाज करण्याकरिता विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. सद्यस्थितीत या अंतर्गत १०० कोटींवर रूपयांची कामे करण्यात येणार आहेत. सन २०१४ च्या तुलनेत २०१५ मध्ये अमरावती जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले असल्याने या जिल्ह्याचा समावेश विशेष पॅकेजमध्ये करणे महत्वाचे आहे.जिल्ह्यात १ जानेवारी २००१ ते २० आॅगस्ट २०१५ दरम्यान २ हजार ३९७ कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. २०१४ मध्ये १५६ शेतकऱ्यांनी मृत्यूचा फास आवळला आहे.जुलै २०१५ मध्ये दर दिवशी शेतकरी आत्महत्याजानेवारी ते २० आॅगस्ट २०१५ दरम्यान १७१ शेतकऱ्यांनी कर्जापायी मृत्यूला कवटाळले आहे. यंदा सर्वाधिक ३२ शेतकऱ्यांच्या आत्महत्या जुलै महिन्यात झाल्या आहेत. यापैकी ९ प्रकरणे पात्र, ५ अपात्र तर २१ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत.मिशनचे पुनर्गठनआत्महत्याप्रवण जिल्ह्यात विशेष पॅकेजची अंमलबजावणी करण्यासाठी यापूर्वी शासनाने कै. वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशनची स्थापना केली. मात्र, काही वर्षांपासून मिशनचा कारभार ठप्प पडला होता. २४ आॅगस्टच्या शासन निर्णयानुसार मिशनचे पुनर्गठन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना अन्नसुरक्षा, आरोग्य सेवा, शेतीविकास कार्यक्रम, मुलांचे शिक्षण आदी उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.