शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

पश्चिम विदर्भात दर नऊ तासांत एक शेतकरी आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 10:11 IST

Amravati News अस्मानी व सुल्तानी संकटामुळे पश्चिम विदर्भात यंदा जूनअखेर ४६१ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. मागील वर्षी याच कालावधीत ५०० शेतकरी आत्महत्या झाल्या होत्या.

ठळक मुद्देसहा महिन्यांत ४६१ शेतकऱ्यांनी कवटाळला मृत्यू

गजानन मोहोड

लोकमत न्यूज नेटवर्क

अमरावती : कोरोनाकाळातही शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. अस्मानी व सुल्तानी संकटामुळे पश्चिम विदर्भात यंदा जूनअखेर ४६१ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. मागील वर्षी याच कालावधीत ५०० शेतकरी आत्महत्या झाल्या होत्या. यंदा प्रमाण थोडे घटले असले तरी दर दोन दिवसांत पाच व दर नऊ तासांत एक शेतकरी आत्महत्या होत आहे.

कर्ज, नापिकी, नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ यामध्ये वऱ्हाडातील शेतकरी अडकला आहे. मुला-मुलींचे शिक्षण, लग्न व घर संसार कसा करावा, या चिंतेने शेतकऱ्यांना नैराश्य येत आहे. खासगी सावकारांचे कर्ज वाढत आहे. शेतीमध्ये उत्पादन खर्चही पदरी पडत नाही. जिल्हा समितीची सहा-सहा महिने बैठक होत नसल्याने प्रशासनाचीही अनास्था दिसून येत आहे.

राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या अमरावती विभागात होत आहेत. शेतकरी आत्महत्याप्रवण जिल्ह्यांमध्ये शासनाद्वारे अनेक योजना प्राधान्याने राबविण्यात येतात. मात्र, खऱ्या व गरजू शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहोचत नाही. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत.

 

२००१ पासून १६,८४८ आत्महत्या

विभागात १ जानेवारी २००१ पासून शेतकरी आत्महत्यांची नोंद महसूल विभागाद्वारे घेण्यात येते. त्यानुसार आतापर्यंत १६ हजार ८४८ शेतकरी आत्महत्या झाल्या. यामध्ये ७,५६५ प्रकरणात वारसांना शासन मदत देण्यात आली. ८,९७३ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली, तर ३९० प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत.

 

 

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या