शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

कुटुंबातील एकाला हवी नोकरी अन् मोबदला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:13 IST

प्रताप अडसड यांची शासनाकडे मागणी : नवनगर निर्मितीतील शेतकऱ्यांची घेतली भेट धामणगाव रेल्वे : कृषी समृद्धी महामार्गालगत उभारण्यात येत ...

प्रताप अडसड यांची शासनाकडे मागणी : नवनगर निर्मितीतील शेतकऱ्यांची घेतली भेट

धामणगाव रेल्वे : कृषी समृद्धी महामार्गालगत उभारण्यात येत असलेल्या नवनगराची निर्मिती करताना चार गावांतील शेतकऱ्यांना जमिनीचे एकमुस्त रक्कम व कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्यात यावी, अशी मागणी आ. प्रताप अडसड यांनी शासनाकडे केली आहे.

नागपूर-मुंबई या ७०१ किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गालगत नवनगराची निर्मिती करण्यात येणार आहे. यात तालुक्यातील धामणगाव शहराजवळील दत्तापूर, आसेगाव, नारगावंडी, जळगाव आर्वी या गावांच्या परिसरातील तब्बल दोन हजार हेक्टर शेतजमीन भूसंचय पद्धतीने घेतली जाणार आहे. भूसंचय पद्धत म्हणजे शेतकऱ्यांना जिरायती जमिनीला प्रतिहेक्टर ७५ हजार रुपये प्रतिवर्ष व यात बागायती जमिनीला १ लाख १२ हजार ५०० रुपये आणि हंगामी बागायती जमिनीला प्रतिहेक्टर १.५० लाख रुपये मोबदला दिला जाणार आहे. हा मोबदला म्हणजे शेतकऱ्यांवर अन्याय करणारा आहे. कृषी समृद्धी प्रकल्पात ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना एकमुस्त रक्कम देण्यात आली, त्याप्रमाणे नवनगरात जमीन जाणाऱ्या या शेतकऱ्यांना संपूर्ण रक्कम एकाच वेळी मोबदला म्हणून देण्यात यावी तसेच प्रकल्पग्रस्त होणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याच्या कुटुंबातील एका मुलाला शासकीय नोकरी देण्यात यावी, अशी मागणी आमदार प्रताप अडसड यांनी राज्य शासनाकडे केली. त्यांनी आसेगाव येथील शेतकऱ्यांच्या त्यांनी भेटी घेतल्या. मी शेतकरीपुत्र असल्यामुळे सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहणार आहे, असे आमदार प्रताप अडसड यांनी सांगितले. यावेळी आसेगावसह नवनगर निर्मितीत ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत, त्या गावातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.