शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

कुटुंबातील एकाला हवी नोकरी अन् मोबदला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:13 IST

प्रताप अडसड यांची शासनाकडे मागणी : नवनगर निर्मितीतील शेतकऱ्यांची घेतली भेट धामणगाव रेल्वे : कृषी समृद्धी महामार्गालगत उभारण्यात येत ...

प्रताप अडसड यांची शासनाकडे मागणी : नवनगर निर्मितीतील शेतकऱ्यांची घेतली भेट

धामणगाव रेल्वे : कृषी समृद्धी महामार्गालगत उभारण्यात येत असलेल्या नवनगराची निर्मिती करताना चार गावांतील शेतकऱ्यांना जमिनीचे एकमुस्त रक्कम व कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्यात यावी, अशी मागणी आ. प्रताप अडसड यांनी शासनाकडे केली आहे.

नागपूर-मुंबई या ७०१ किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गालगत नवनगराची निर्मिती करण्यात येणार आहे. यात तालुक्यातील धामणगाव शहराजवळील दत्तापूर, आसेगाव, नारगावंडी, जळगाव आर्वी या गावांच्या परिसरातील तब्बल दोन हजार हेक्टर शेतजमीन भूसंचय पद्धतीने घेतली जाणार आहे. भूसंचय पद्धत म्हणजे शेतकऱ्यांना जिरायती जमिनीला प्रतिहेक्टर ७५ हजार रुपये प्रतिवर्ष व यात बागायती जमिनीला १ लाख १२ हजार ५०० रुपये आणि हंगामी बागायती जमिनीला प्रतिहेक्टर १.५० लाख रुपये मोबदला दिला जाणार आहे. हा मोबदला म्हणजे शेतकऱ्यांवर अन्याय करणारा आहे. कृषी समृद्धी प्रकल्पात ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना एकमुस्त रक्कम देण्यात आली, त्याप्रमाणे नवनगरात जमीन जाणाऱ्या या शेतकऱ्यांना संपूर्ण रक्कम एकाच वेळी मोबदला म्हणून देण्यात यावी तसेच प्रकल्पग्रस्त होणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याच्या कुटुंबातील एका मुलाला शासकीय नोकरी देण्यात यावी, अशी मागणी आमदार प्रताप अडसड यांनी राज्य शासनाकडे केली. त्यांनी आसेगाव येथील शेतकऱ्यांच्या त्यांनी भेटी घेतल्या. मी शेतकरीपुत्र असल्यामुळे सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहणार आहे, असे आमदार प्रताप अडसड यांनी सांगितले. यावेळी आसेगावसह नवनगर निर्मितीत ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत, त्या गावातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.