शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
3
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
4
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
5
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
6
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
7
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
8
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
9
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
10
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
11
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
12
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
13
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
14
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
15
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
16
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
17
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
18
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
19
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
20
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश

मतदानासाठी १७ पैकी एक पुरावा ग्राह्य

By admin | Updated: October 20, 2015 00:16 IST

नगरपंचायत व ग्रामपंचायत निवडणुकीत बोगस मतदानाला आळा बसावा, यासाठी मतदार ओळखपत्र दाखविणे बंधनकारक आहे.

नगरपंचायत निवडणूक : मतदार ओळखपत्र नसल्यास चिंता नको अमरावती : नगरपंचायत व ग्रामपंचायत निवडणुकीत बोगस मतदानाला आळा बसावा, यासाठी मतदार ओळखपत्र दाखविणे बंधनकारक आहे. मात्र, हे ओळखपत्र जवळ नसल्यास मतदाराला घाबरण्याचे कारण नाही. आयोगाने जाहीर केलेल्या १७ पुराव्यांपैकी एक पुरावा असल्यास तो मतदानासाठी ग्राह्य धरला जाणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याच्या आधीच्या तारखेपर्यंत दिलेले राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे छायाचित्रांकित ओळखपत्र, निवृत्त कर्मचाऱ्यांचा फोटो असलेले पासबुक, निवृत्त कर्मचाऱ्यांच्या विधवा, अवलंबित व्यक्ती यांची छायाचित्रासह असलेले प्रमाणपत्र, वयस्क वेतनधारक अथवा त्यांच्या विधवा यांचे फोटो असलेले प्रमाणपत्र, केंद्र शासनाच्या श्रम मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा योजनेचे फोटोसहित कार्ड, राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याच्या आधीच्या तारखेपर्यंत दिलेली शिधापत्रिका (कुटुंबातील सर्व मतदारांनी मतदान करण्यासाठी एकत्र येणे आवश्यक असेल) तसेच आधार ओळखपत्राचा समावेश आहे. यामुळे मतदान केंद्रावरील अधिकारी आणि मतदारांची डोकेदुखी कमी होईल. हे पुरावे धरणार ग्राह्य पासपोर्ट, वाहन चालविण्याचा परवाना, पॅनकार्ड, शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कर्मचाऱ्यांचे फोटोसहित ओळखपत्र, राष्ट्रीयीकृत बँका व डाक कार्यालयातील खातेदारांचे फोटो असणारे पासबुक, स्वातंत्र्य सैनिकांचे फोटो असणारे ओळखपत्र, निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याच्या आधीच्या दिनांकापर्यंत सक्षम प्राधिकाऱ्याने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग इत्यादींना फोटोसहित दिलेले प्रमाणपत्र, अपंगत्वाचा दाखला, नोंदणी खत आदी पुरावे ग्राह्य धरण्यात येणार आहेत.