शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
4
'त्या प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
5
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
6
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
7
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
8
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
9
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
10
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
11
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
12
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
13
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
14
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
15
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
16
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
17
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
18
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
19
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
20
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

मुक्कामाला येणारी बस आगारातच थांबली; प्रवाशांची गैरसोय वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:13 IST

बहुतांश बस बंद ; तातडीने बस सुरू करण्याची मागणी अमरावती : राज्यात सध्या कोरोनाची रुग्णसंख्या घटल्याने सर्व व्यवहार सुरू ...

बहुतांश बस बंद ; तातडीने बस सुरू करण्याची मागणी

अमरावती : राज्यात सध्या कोरोनाची रुग्णसंख्या घटल्याने सर्व व्यवहार सुरू झाले आहेत. एसटी बसही सुरू झाल्या आहेत. परंतु, ग्रामीण भागात मुक्कामाला जाणारी बस अद्यापही बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.

जिल्ह्यात आठ आगार आहेत. यात अमरावती, बडनेरा, परतवाडा, चांदूर बाजार, दर्यापूर, मोर्शी, वरूड, चांदूर रेल्वे या बस स्थानकांचा समावेश आहे. जिल्ह्यात ३७१ पैकी २५० बस सुरू आहेत. विविध मार्गांवर या बस धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर झाली आहे. परंतु, अद्यापही ग्रामीण भागात मुक्कामाला जाणाऱ्या ३५ बस बंद आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांची गैरसोय होत आहे. ग्रामीण भागातील बहुतांश नागरिक कामासाठी शहराच्या ठिकाणी येत असतात. त्यांच्या येण्या-जाण्याची सोय व्हावी, यासाठी एसटी महामंडळाकडून मुक्कामी बस पाठविली जाते. परंतु, सध्या बहुतांश मुक्कामी बस आगारात उभ्या असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.

बॉक्स

५० टक्के बस आगारातच

१) जिल्ह्यात २५० बस सुरू आहेत. यात परतवाडा, वरूड, दर्यापूर, नागपूर, यवतमाळ, अकोला व इतर ठिकाणी या बस धावतात.

२) शहरी भागात बस धावत असल्या तरी ग्रामीण भागात जाणारे अनेक बस बंद आहेत.

३) ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. महामंडळाने तातडीने बस सुरू कराव्यात, अशी मागणी होत आहे.

बॉक्स

प्रवासी संख्येत घट

कोट

सध्या कोरोना रुग्णसंख्या घटली असली तरी ग्रामीण भागात प्रवाशांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे सध्या लांब पल्ल्याच्या बस सुरू आहेत. काही ठिकाणी मुक्कामी परत जात आहेत. नागरिकांनी मागणी केल्यानुसार बस सुरू केल्या जातील. सध्या रुग्णसंख्या कमी असली तरी प्रवाशांची कमी आहे.

- श्रीकांत गभने, विभाग नियंत्रक

बॉक्स

रुग्ण घटले, एसटी संख्या कधी वाढणार?

कोट

सध्या कोराेना रुग्णसंख्या कमी झाली असून सर्व व्यवहार सुरू झाले आहेत. परंतु, अद्यापही ग्रामीण भागातील मुक्कामी बस सुरू करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून याकडे महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन तातडीने बस सुरू कराव्यात.

- प्रशांत काडगाळे, प्रवासी

कोट

आमच्या गावाला सुरुवातीला मुक्कामी बस येत होती. परंतु आता मुक्कामी बस येत नाही. सध्या कोरोनाचे रुग्ण संख्या घटले असून महामंडळाने तातडीने मुक्कामी बस सुरू करावी. अनेक जण सकाळी तालुक्याच्या ठिकाणी कामानिमित्त जातात. मात्र बस नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

- साहेबराव रोकडे, प्रवासी

बॉक्स

आगार आणि मुक्कामी गावी थांबणाऱ्या बस

अमरावती २-०

बडनेरा-७-०

दर्यापूर-१३-०६

परतवाडा ११-५

चांदूर बाजार-१८-०६

मोशी ०९-०७

वरूड १०-०६