शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
3
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
4
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
5
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
6
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
7
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
8
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
9
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
10
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
11
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
12
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
13
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
14
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
15
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
16
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
17
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
18
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
19
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार

१७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता एक मिनिटांसाठी थांबणार राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2022 18:50 IST

Amravati News देशाच्या स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी पर्वाचा समारोप १७ ऑगस्टला होणार असून, यानिमित्त सकाळी ११ वाजता महाराष्ट्र एक मिनिटांसाठी स्तब्ध होणार आहे.

ठळक मुद्देस्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचा आगळावेगळा समारोप

अमरावती : देशाच्या स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी पर्वाचा समारोप १७ ऑगस्टला होणार असून, यानिमित्त सकाळी ११ वाजता महाराष्ट्र एक मिनिटांसाठी स्तब्ध होणार आहे. नागरिक एक मिनिटांसाठी जेथे असतील तेथेच थांबतील आणि सामूहिक राष्ट्रगीत गायनात सहभागी होतील.

राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने ‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’निमित्त ‘स्वराज्य सप्ताह’अंतर्गत समूह राष्ट्रगीत गायनाबाबतचा निर्णय घेतला आहे. ९ ते १७ ऑगस्ट या कालावधीत राज्यभरात ‘स्वराज्य सप्ताह’अंतर्गत विविध कार्यक्रम, उपक्रम राबविले जात आहे. समूह राष्ट्रगीत गायन हा उपक्रम शासनाच्या ३९ विभागांना बंधनकारक करण्यात आला आहे. या राष्ट्रगीत गायनासाठी खासगी, शासकीय तसेच सर्व प्रकारच्या शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, विद्यापीठातील विद्यार्थी, शिक्षकांचा सहभाग अनिवार्य असणार आहे. सकाळी ११ वाजता सुरू होऊन ११ वाजून १ मिनिटांत राष्ट्रगान गायन करणे अपेक्षित आहे. समूह राष्ट्रगीत गायनाच्या वेळी जाणते-अजाणतेपणे राष्ट्रगीताचा अवमान होणार नाही, याची दक्षता नागरिकांना घ्यावी लागणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचे असेल नियंत्रण

राज्यात एकाच वेळी समूह राष्ट्रगीत गायन होत असल्याने विद्यार्थी, नागरिक वा अधिकारी, कर्मचाऱ्यांना खुल्या जागा वा हॉल किंवा पटांगणात एकत्रित उपस्थित राहावे लागेल. सर्व प्रकारच्या स्थानिक स्वराज्य संस्थांना या उपक्रमात सहभागी व्हावे लागणार आहे. या उपक्रमाचे नियंत्रण जिल्हाधिकऱ्यांकडे सोपविण्यात आले आहे. जाणीव जागृती, प्रचार व प्रसिद्धीसाठी यंत्रणांना पुढाकार घेण्याचे निर्देश दिले आहेत.

महाराष्ट्राचा लोगो ठरला लक्षवेधी

गत वर्षीपासूनच स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. राज्य शासनाने ३९ विभागांना कृतिशील कार्यक्रम आखून दिला आहे. ७५ वर्षपूर्तीनिमित्त राज्य शासनाने स्वतंत्र लाेगो तयार केला असून, वर्षभर या लोगोचा वापर करण्यात आला आहे. शासकीय इमारतींवरही स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवाचा लोगो लक्ष वेधून घेणारा ठरला. अन्य राज्याच्या तुलनेत महाराष्ट्राचा लोगो हटके राहिला, हे विशेष.

टॅग्स :National Anthemराष्ट्रगीत