शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

१७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता एक मिनिटांसाठी थांबणार राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2022 18:50 IST

Amravati News देशाच्या स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी पर्वाचा समारोप १७ ऑगस्टला होणार असून, यानिमित्त सकाळी ११ वाजता महाराष्ट्र एक मिनिटांसाठी स्तब्ध होणार आहे.

ठळक मुद्देस्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचा आगळावेगळा समारोप

अमरावती : देशाच्या स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी पर्वाचा समारोप १७ ऑगस्टला होणार असून, यानिमित्त सकाळी ११ वाजता महाराष्ट्र एक मिनिटांसाठी स्तब्ध होणार आहे. नागरिक एक मिनिटांसाठी जेथे असतील तेथेच थांबतील आणि सामूहिक राष्ट्रगीत गायनात सहभागी होतील.

राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने ‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’निमित्त ‘स्वराज्य सप्ताह’अंतर्गत समूह राष्ट्रगीत गायनाबाबतचा निर्णय घेतला आहे. ९ ते १७ ऑगस्ट या कालावधीत राज्यभरात ‘स्वराज्य सप्ताह’अंतर्गत विविध कार्यक्रम, उपक्रम राबविले जात आहे. समूह राष्ट्रगीत गायन हा उपक्रम शासनाच्या ३९ विभागांना बंधनकारक करण्यात आला आहे. या राष्ट्रगीत गायनासाठी खासगी, शासकीय तसेच सर्व प्रकारच्या शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, विद्यापीठातील विद्यार्थी, शिक्षकांचा सहभाग अनिवार्य असणार आहे. सकाळी ११ वाजता सुरू होऊन ११ वाजून १ मिनिटांत राष्ट्रगान गायन करणे अपेक्षित आहे. समूह राष्ट्रगीत गायनाच्या वेळी जाणते-अजाणतेपणे राष्ट्रगीताचा अवमान होणार नाही, याची दक्षता नागरिकांना घ्यावी लागणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचे असेल नियंत्रण

राज्यात एकाच वेळी समूह राष्ट्रगीत गायन होत असल्याने विद्यार्थी, नागरिक वा अधिकारी, कर्मचाऱ्यांना खुल्या जागा वा हॉल किंवा पटांगणात एकत्रित उपस्थित राहावे लागेल. सर्व प्रकारच्या स्थानिक स्वराज्य संस्थांना या उपक्रमात सहभागी व्हावे लागणार आहे. या उपक्रमाचे नियंत्रण जिल्हाधिकऱ्यांकडे सोपविण्यात आले आहे. जाणीव जागृती, प्रचार व प्रसिद्धीसाठी यंत्रणांना पुढाकार घेण्याचे निर्देश दिले आहेत.

महाराष्ट्राचा लोगो ठरला लक्षवेधी

गत वर्षीपासूनच स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. राज्य शासनाने ३९ विभागांना कृतिशील कार्यक्रम आखून दिला आहे. ७५ वर्षपूर्तीनिमित्त राज्य शासनाने स्वतंत्र लाेगो तयार केला असून, वर्षभर या लोगोचा वापर करण्यात आला आहे. शासकीय इमारतींवरही स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवाचा लोगो लक्ष वेधून घेणारा ठरला. अन्य राज्याच्या तुलनेत महाराष्ट्राचा लोगो हटके राहिला, हे विशेष.

टॅग्स :National Anthemराष्ट्रगीत