शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
2
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्या पकडले अन्...
3
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
4
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
5
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
6
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
7
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
8
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
9
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
10
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
11
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
12
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
Daily Top 2Weekly Top 5

१७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता एक मिनिटांसाठी थांबणार राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2022 18:50 IST

Amravati News देशाच्या स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी पर्वाचा समारोप १७ ऑगस्टला होणार असून, यानिमित्त सकाळी ११ वाजता महाराष्ट्र एक मिनिटांसाठी स्तब्ध होणार आहे.

ठळक मुद्देस्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचा आगळावेगळा समारोप

अमरावती : देशाच्या स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी पर्वाचा समारोप १७ ऑगस्टला होणार असून, यानिमित्त सकाळी ११ वाजता महाराष्ट्र एक मिनिटांसाठी स्तब्ध होणार आहे. नागरिक एक मिनिटांसाठी जेथे असतील तेथेच थांबतील आणि सामूहिक राष्ट्रगीत गायनात सहभागी होतील.

राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने ‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’निमित्त ‘स्वराज्य सप्ताह’अंतर्गत समूह राष्ट्रगीत गायनाबाबतचा निर्णय घेतला आहे. ९ ते १७ ऑगस्ट या कालावधीत राज्यभरात ‘स्वराज्य सप्ताह’अंतर्गत विविध कार्यक्रम, उपक्रम राबविले जात आहे. समूह राष्ट्रगीत गायन हा उपक्रम शासनाच्या ३९ विभागांना बंधनकारक करण्यात आला आहे. या राष्ट्रगीत गायनासाठी खासगी, शासकीय तसेच सर्व प्रकारच्या शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, विद्यापीठातील विद्यार्थी, शिक्षकांचा सहभाग अनिवार्य असणार आहे. सकाळी ११ वाजता सुरू होऊन ११ वाजून १ मिनिटांत राष्ट्रगान गायन करणे अपेक्षित आहे. समूह राष्ट्रगीत गायनाच्या वेळी जाणते-अजाणतेपणे राष्ट्रगीताचा अवमान होणार नाही, याची दक्षता नागरिकांना घ्यावी लागणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचे असेल नियंत्रण

राज्यात एकाच वेळी समूह राष्ट्रगीत गायन होत असल्याने विद्यार्थी, नागरिक वा अधिकारी, कर्मचाऱ्यांना खुल्या जागा वा हॉल किंवा पटांगणात एकत्रित उपस्थित राहावे लागेल. सर्व प्रकारच्या स्थानिक स्वराज्य संस्थांना या उपक्रमात सहभागी व्हावे लागणार आहे. या उपक्रमाचे नियंत्रण जिल्हाधिकऱ्यांकडे सोपविण्यात आले आहे. जाणीव जागृती, प्रचार व प्रसिद्धीसाठी यंत्रणांना पुढाकार घेण्याचे निर्देश दिले आहेत.

महाराष्ट्राचा लोगो ठरला लक्षवेधी

गत वर्षीपासूनच स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. राज्य शासनाने ३९ विभागांना कृतिशील कार्यक्रम आखून दिला आहे. ७५ वर्षपूर्तीनिमित्त राज्य शासनाने स्वतंत्र लाेगो तयार केला असून, वर्षभर या लोगोचा वापर करण्यात आला आहे. शासकीय इमारतींवरही स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवाचा लोगो लक्ष वेधून घेणारा ठरला. अन्य राज्याच्या तुलनेत महाराष्ट्राचा लोगो हटके राहिला, हे विशेष.

टॅग्स :National Anthemराष्ट्रगीत