शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
2
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
3
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
4
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
5
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
6
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
7
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
8
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
9
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
10
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
11
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
12
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
13
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
14
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
15
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
16
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
17
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
18
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
19
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
20
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू

जुनी पुस्तके शाळेने परत घेतली; नवी कधी देणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:13 IST

अमरावती : सर्वच विभागातील शाळामधून ऑनलाईन अध्यापनाला सुरुवात झाली आहे. याशिवाय कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षणात विद्यार्थी मागे राहू नये, यासाठी ...

अमरावती : सर्वच विभागातील शाळामधून ऑनलाईन अध्यापनाला सुरुवात झाली आहे. याशिवाय कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षणात विद्यार्थी मागे राहू नये, यासाठी सेतु अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा पाया मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, यापूर्वी शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार विद्यार्थ्यांकडे असलेली गतवर्षीची पुस्तके शाळेत जमा करण्यात आली असल्याने सेतु अभ्यासक्रम कसा पूर्ण करावा, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

विद्यार्थ्याकडून पाठ्यपुस्तके परत घेऊ नये, अशी घोषणा शिक्षणमंत्र्यांनी केली होती. त्यामुळे कालपर्यंत शाळेत जमा केलेली पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना परत मिळतील का, या संभ्रमात पालक व विद्यार्थी आहेत. शाळा सुरू करून एक महिना झाला आहे. समग्र शिक्षा अभियानमधून वर्ग पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वितरित करण्यात येतात. जवळपास १० ते २० टक्के विद्यार्थ्यांनी जुनी पाठ्यपुस्तके शाळेत जमा केली. तेवढी संख्या वजा करून मुख्याध्यापकांनी चालू शैक्षणिक सत्रासाठी नवीन पाठ्यपुस्तकांची मागणी केली आणि आता सेतु वर्गाचे कारण देत पुस्तके परत न घेण्याची घोषणा शिक्षणमंत्र्यांकडून करण्यात आली होती. मात्र, ही बाब त्रासदायक असून, यामुळे शाळा व शिक्षकांवर ताण वाढणार आहे. ऑनलाईन शिक्षणासाठीदेखील पुस्तक महत्त्वाचे असून, जोपर्यंत विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तके उपलब्ध होत नाही, तोपर्यंत विद्यार्थ्यांनाही ऑनलाईन अभ्यास किती पचनी पडेल, हा खरा प्रश्न निर्माण झाला आहे.

बॉक्स

आणखी काही दिवस प्रतीक्षा सेतु वर्गातील अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके साहाय्यभूत ठरणार आहे. त्यासाठी शिक्षण विभागाने लवकरात लवकर पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिली पाहिजे. असे मत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष गोकुलदास राऊत यांनी व्यक्त केले. शिक्षण विभागाने ३० जूनला बालभारतीला पुस्तकांची मागणी केली आहे. ही पुस्तके जिल्हास्तरावरून तालुका स्तरावर व तेथून शाळेत व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहेत. यामुळे शाळेतून नवीन पुस्तके विद्यार्थ्यांच्या हाती पोहोचण्यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.