शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

तेल, साखर, कापड व्यावसायिक रडारवर

By admin | Updated: April 18, 2015 00:03 IST

स्थानिक संस्था कर (एलबीटी) सक्तीने वसूल न करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असला तरी याबाबत अधिकृत शासन निर्णय..

एलबीटी वसुली : २१ महिने फरकाची रक्कम वसूल करण्याचे निर्देशअमरावती : स्थानिक संस्था कर (एलबीटी) सक्तीने वसूल न करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असला तरी याबाबत अधिकृत शासन निर्णय महापालिकेत पोहोचला नाही. परिणामी एलबीटी वसुलीसाठी तेल, साखर, कापड, कृषी आणि एमआयडीसीत कच्चा माल मागविणारे व्यावसायिक आयुक्तांच्या रडावर आहेत. एलबीटी भरा अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा निर्णय घेत एलबीटी विभागाला सक्तीने वसुली करण्याचे निर्देश त्यांनी दिले.महापालिकेत उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत असलेल्या एलबीटीच्या वसुलीसाठी आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी कंबर कसली आहे. रिकामी तिजोरी कशी भरावी, या विंवचनेत प्रशासन असताना ज्या व्यवसायीकांनी एलबीटीचे विवरणपत्र सादर केले नाही, अशा प्रतिष्ठानांवर एकतर्फी कारवाई करण्याच्या सूचना आयुक्त गुडेवार यांनी गुरुवारी पार पडलेल्या बैठकीत संबंधित विभागाला दिल्यात. त्यामुळे एलबीटी वसुली न करण्याच्या मानसिकतेत असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना गुडेवार यांच्या नव्या आदेशाने जणू संजीवनी मिळाली आहे. एलबीटीसंदर्भात शासनाचे जे काही आदेश येतील, त्यानुसार पुढे कार्यवाही होईल. मात्र, जे एलबीटी भरणार नाही त्याला कायद्याचा बडगा दाखविलाच पाहिजे, असे निर्देश त्यांनी दिले. एलबीटी विभागाने शुक्रवारी ज्या व्यावसायिकांचे असिसमेंट झाले अशांना पुन्हा कर भरण्यासाठी नोटीस बजावली. गुडेवार यांची येथील चेंबर्स आॅफ कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट घेतली असता त्यांना नियमितपणे एलबीटी भरण्याच्या सूचना त्यांनी केल्या. उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने कोणतीही तडजोड मान्य नसून व्यावसायिकांना एलबीटी भरावाच लागेल, असे संकेत त्यांनी दिले आहेत. एमआयडीसीत थकीत मालमत्ता कर, एलबीटी फरकाची रक्कम वसूल करण्यासाठी लवकरच निर्णय होईल. त्याक रीता एमआयडीसीच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन तोडगा काढण्याची तयारी प्रशासनाची आहे. तर दुसरीकडे ज्या व्यावसायीकांंनी एलबीटीचे असिसमेंट केले नाहीत, अशांवर एकतर्फी कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कापड व्यावसायीकांवर प्रशासनाची बारीक नजर असून लवकरच काही कापड व्यावसायीकांवर फौजदारी दाखल होईल, अशी माहिती आहे.२१ महिन्यांच्या फरकाची रक्कम होणार वसूलमहापालिकेत एलबीटी १ जुलै २०१२ पासून लागू करण्यात आला आहे. मात्र साखर, तेल, कापड, एमआयडीसीत येणारा कच्चा माल, कृषी अवजारे आदी वस्तूंवर एलबीटी दरानुसार नव्हे तर जकातनुसार कर भरण्याचा निर्णय व्यावसायिकांनी घेतला होता. येथील व्यावसायिकांची मागणी लक्षात घेता आमसभेत त्यानुसार ठराव मंजूर करुन तो ३१ जुलै २०१२ रोजी शासनाच्या निर्णयार्थ पाठविण्यात आला होता. मात्र, शासनाने या ठरावानुसार १ एप्रिल २०१४ पासून वस्तूवर कर आकारणी करावी, असे ठरविले आहे. परिणामी १ जुलै २०१२ ते ३१ मार्च २०१४ या दरम्यान २१ महिन्यांच्या फरकाची एलबीटी रक्कम वसूल करण्यासाठी सदर व्यावसायिकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. या नोटीशींनी व्यावसायिक हतबल झाले आहेत.