शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

अधिकार काढल्याने पदाधिकारी अस्वस्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 22:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : जिल्हा नियोजन समितीकडून निधी मिळणाऱ्या इतर जिल्हा मार्ग ग्रामीण रस्त्यांच्या कामांना मंजुरी देण्याच्या जिल्हा ...

ठळक मुद्देरस्ते मंजुरी, निर्मिती : पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे गठण

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा नियोजन समितीकडून निधी मिळणाऱ्या इतर जिल्हा मार्ग ग्रामीण रस्त्यांच्या कामांना मंजुरी देण्याच्या जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या अधिकारावर शासनाने टाच आणली आहे. विशेष म्हणजे, रस्त्यांचे काम कोणत्या यंत्रणेला द्यावे, याचा निर्णय पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्य समिती घेणार आहे. यामुळे जिल्हा परिषदेचे पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. शासनाच्या डिसेंबर २०१४ सप्टेंबर २०१६ मधील निर्णयानुसार जिल्हा परिषदेच्या अखत्यारित असलेले इतर जिल्हा मार्ग मागार्ची यादी जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या संमतीने मंजूर होऊन ती जिल्हा नियोजन समिती कडे सादर केली जात होती. नियोजन समितीच्या मंजुरीनंतर ती कामे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून पूर्ण केली जात होती. त्यानंतर प्रधानमंत्री ग्राम सडक योजना मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्त्याची कामे केली जात आहेत. यासाठी जिल्हा परिषदेच्या सभागृहाची मंजुरी आवश्यक होती. मात्र, अनेक ठिकाणी राजकारण आड आल्याने राज्य शासन, जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांमध्ये मतभेद असल्याचे प्रकार निदर्शनास आले. त्यामुळे जिल्हा परिषदेची मंजुरी आणि बांधकाम करणारी यंत्रणाच बाद करण्याचा प्रयत्न शासनाच्या ६ आॅक्टोबरच्या निर्णयातून घेतला आहे. या निर्णयानुसार जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेले इतर जिल्हा मार्ग रस्त्यांच्या कामासाठी जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या मंजुरीची गरज नाही तसेच ती कामे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने करावी, असेही बंधन उठविण्यात आले. त्यामुळे जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग आता रस्ते विकासासंदर्भात नावापुरताच राहणार आहे. ३०-५४ आणि ५०-५४ या लेखाशीर्षांतर्गत ग्रामीण भागातील रस्ते विकासाची कामे झेडपीचा बांधकाम विभागाकडून केली जात होती. परंतु, आता ही कामे नेमकी जिल्हा परिषद बांधकाम विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, रस्ते विकास संस्था यापैकी कुणाला द्यायची, याचा अधिकार पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समितीकडे दिल्याने जिल्हा परिषद पदाधिकारी व सदस्य अस्वस्थ झाले असून, या निर्णयाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत.सीईओ तयार करतील प्रस्ताव!जिल्हा परिषदेचे सीईओ इतर जिल्हा मार्ग, ग्रामीण मार्गाच्या कामाची यादी तयार करतील. ती यादी समितीपुढे सादर करतील. त्यापैकी रस्त्यांची निवड करणे प्राधान्यक्रम ठरविण्याचा अधिकार समितीला देण्यात आला आहे. रस्त्याचे काम महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था, जिल्हा परिषद बांधकाम, सार्वजनिक बांधकाम विभाग यापैकी कोणाकडे द्यावे, याचा निर्णय समिती घेणार आहे.चार सदस्यीय समिती घेणार निर्णयजिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून रस्ते कामांना मंजुरी देण्याचे काम करण्यासाठी यंत्रणा निवडण्याचा निर्णय जिल्हास्तरीय समिती घेणार आहे. समितीच्या अध्यक्ष म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री, तर सचिव म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांनी निवडलेले दोन आमदार समितीमध्ये सदस्य राहणार आहेत.