शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

अधिकार काढल्याने पदाधिकारी अस्वस्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 22:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : जिल्हा नियोजन समितीकडून निधी मिळणाऱ्या इतर जिल्हा मार्ग ग्रामीण रस्त्यांच्या कामांना मंजुरी देण्याच्या जिल्हा ...

ठळक मुद्देरस्ते मंजुरी, निर्मिती : पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे गठण

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा नियोजन समितीकडून निधी मिळणाऱ्या इतर जिल्हा मार्ग ग्रामीण रस्त्यांच्या कामांना मंजुरी देण्याच्या जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या अधिकारावर शासनाने टाच आणली आहे. विशेष म्हणजे, रस्त्यांचे काम कोणत्या यंत्रणेला द्यावे, याचा निर्णय पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्य समिती घेणार आहे. यामुळे जिल्हा परिषदेचे पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. शासनाच्या डिसेंबर २०१४ सप्टेंबर २०१६ मधील निर्णयानुसार जिल्हा परिषदेच्या अखत्यारित असलेले इतर जिल्हा मार्ग मागार्ची यादी जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या संमतीने मंजूर होऊन ती जिल्हा नियोजन समिती कडे सादर केली जात होती. नियोजन समितीच्या मंजुरीनंतर ती कामे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून पूर्ण केली जात होती. त्यानंतर प्रधानमंत्री ग्राम सडक योजना मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्त्याची कामे केली जात आहेत. यासाठी जिल्हा परिषदेच्या सभागृहाची मंजुरी आवश्यक होती. मात्र, अनेक ठिकाणी राजकारण आड आल्याने राज्य शासन, जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांमध्ये मतभेद असल्याचे प्रकार निदर्शनास आले. त्यामुळे जिल्हा परिषदेची मंजुरी आणि बांधकाम करणारी यंत्रणाच बाद करण्याचा प्रयत्न शासनाच्या ६ आॅक्टोबरच्या निर्णयातून घेतला आहे. या निर्णयानुसार जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेले इतर जिल्हा मार्ग रस्त्यांच्या कामासाठी जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या मंजुरीची गरज नाही तसेच ती कामे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने करावी, असेही बंधन उठविण्यात आले. त्यामुळे जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग आता रस्ते विकासासंदर्भात नावापुरताच राहणार आहे. ३०-५४ आणि ५०-५४ या लेखाशीर्षांतर्गत ग्रामीण भागातील रस्ते विकासाची कामे झेडपीचा बांधकाम विभागाकडून केली जात होती. परंतु, आता ही कामे नेमकी जिल्हा परिषद बांधकाम विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, रस्ते विकास संस्था यापैकी कुणाला द्यायची, याचा अधिकार पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समितीकडे दिल्याने जिल्हा परिषद पदाधिकारी व सदस्य अस्वस्थ झाले असून, या निर्णयाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत.सीईओ तयार करतील प्रस्ताव!जिल्हा परिषदेचे सीईओ इतर जिल्हा मार्ग, ग्रामीण मार्गाच्या कामाची यादी तयार करतील. ती यादी समितीपुढे सादर करतील. त्यापैकी रस्त्यांची निवड करणे प्राधान्यक्रम ठरविण्याचा अधिकार समितीला देण्यात आला आहे. रस्त्याचे काम महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था, जिल्हा परिषद बांधकाम, सार्वजनिक बांधकाम विभाग यापैकी कोणाकडे द्यावे, याचा निर्णय समिती घेणार आहे.चार सदस्यीय समिती घेणार निर्णयजिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून रस्ते कामांना मंजुरी देण्याचे काम करण्यासाठी यंत्रणा निवडण्याचा निर्णय जिल्हास्तरीय समिती घेणार आहे. समितीच्या अध्यक्ष म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री, तर सचिव म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांनी निवडलेले दोन आमदार समितीमध्ये सदस्य राहणार आहेत.