शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

पदाधिकाऱ्यांना दिसेना मतदारसंघाबाहेरचा दुष्काळ

By admin | Updated: April 30, 2016 00:22 IST

जिल्ह्यात दुष्काळाबाबत सरकारकडून होणाऱ्या उपाय योजनांबाबत सतत नकारघंटा वाजवली जाते.

जिल्हा परिषद : दुष्काळी भागातील मर्यादित भागांकडेच लक्षजितेंद्र दखने अमरावतीजिल्ह्यात दुष्काळाबाबत सरकारकडून होणाऱ्या उपाय योजनांबाबत सतत नकारघंटा वाजवली जाते. मात्र अधिकारातील निर्णय घेऊन दुष्काळी भागातील लोकांना मदत करण्यासाठी लोकप्रतिनिधी-पदाधिकाऱ्यांकडून प्रयत्न होत नसल्याचे दिसून येत आहे. मिनी मंत्रालयातील अध्यक्ष, उपाध्यक्ष व चार सभापती दुष्काळी भागाचे प्रतिनिधीत्व करतात. मात्र त्यांच्याकडून जिल्ह्यातील समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे. पुढील वेळी बदलत्या आरक्षणात आपणाला संधी मिळणार नाही अशीच खुणगाठ बांधूनच गावच्या मर्यादित विकासाकडे लक्ष दिल्याचे चित्र आहे. जिल्हा परिषदेत नेहमीचे कामकाजही संथगतीने सुरू आहेत. जिल्ह्यात दुष्काळी उपाययोजनाबाबत राज्यातील सरकारचे विरोधक म्हणून असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी किमान सत्ताधाऱ्यांविरोधात काम करत आहेत हे दाखविण्यासाठी आटापीटा सुरू आहे. किमान वातावरण निर्मिती केली जात आहे. अनेक वर्षे सत्तेत असलेल्यांकडून किमान विरोधातील भाषा लोकांच्या कानावर पडू लागली आहे. जिल्ह्यातील शेतकरी व जनता दुष्काळाचे चटके सहन करीत असताना राज्य शासनाविरोधात एकत्रित आंदोलन किंवा मोर्चाने सरकारचे लक्ष वेधून घेण्यात आल्याचे समाधान असले तरी ज्या गतीने यात उपाययोजना होणे अपेक्षित आहे. मात्र त्या होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश उईके, उपाध्यक्ष सतीश हाडोळे, सभापती गिरीश कराळे, वृषाली विघे, अरुणा गोरले, सरिता मकेश्वर ही सर्व पदाधिकारी मंडळी दुष्काळी तालुक्याचे नेतृत्व करतात त्यांच्याकडून जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या माध्यमातून सरकारच्या अनेक योजना एकत्रित राबवून दुष्काळी भागातील लोकांना दिलासा देण्याचे काम यापूर्वीच सुरू करणे अपेक्षित होते. अधिकाऱ्यांना कामाला लावून योजना तयार केलेले दिसून येत नाही.