शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
एअर सायरन वाजणार, ब्लॅकआऊट होणार; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात 'वॉर मॉक ड्रिल'
3
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
4
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
5
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
6
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
7
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
8
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...
9
'मी शाहरुख...', MET GALA मध्ये परदेशी मीडियाने बॉलिवूडच्या बादशहाला ओळखलंच नाही?
10
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
11
संपूर्ण दिवस बेशुद्ध अन् ICU मध्ये उपचार, 'इंडियन आयडॉल' फेम पवनदीपची हेल्थ अपडेट समोर
12
"हा माझ्या होणाऱ्या मुलाचा बाप..."; साखरपुड्यात गर्लफ्रेंडची एन्ट्री, उघड केली नवरदेवाची गुपितं
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? भारताच्या धाकाने मोठमोठ्या विमान कंपन्यांनी मार्ग बदलले
14
बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार! पोलिसांकडून अभिनेत्याचा शोध सुरू
15
इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका! सरकारने चार्जिंगचे नियम बदलले
16
बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे
17
भारत- पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगांची भाकीत काय सांगतात? वाचा सविस्तर
18
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
19
हसतं घर उद्ध्वस्त! हळदीच्या दिवशी नाचताना नवरी बेशुद्ध अन्...; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
20
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा

पदाधिकाऱ्यांना दिसेना मतदारसंघाबाहेरचा दुष्काळ

By admin | Updated: April 30, 2016 00:22 IST

जिल्ह्यात दुष्काळाबाबत सरकारकडून होणाऱ्या उपाय योजनांबाबत सतत नकारघंटा वाजवली जाते.

जिल्हा परिषद : दुष्काळी भागातील मर्यादित भागांकडेच लक्षजितेंद्र दखने अमरावतीजिल्ह्यात दुष्काळाबाबत सरकारकडून होणाऱ्या उपाय योजनांबाबत सतत नकारघंटा वाजवली जाते. मात्र अधिकारातील निर्णय घेऊन दुष्काळी भागातील लोकांना मदत करण्यासाठी लोकप्रतिनिधी-पदाधिकाऱ्यांकडून प्रयत्न होत नसल्याचे दिसून येत आहे. मिनी मंत्रालयातील अध्यक्ष, उपाध्यक्ष व चार सभापती दुष्काळी भागाचे प्रतिनिधीत्व करतात. मात्र त्यांच्याकडून जिल्ह्यातील समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे. पुढील वेळी बदलत्या आरक्षणात आपणाला संधी मिळणार नाही अशीच खुणगाठ बांधूनच गावच्या मर्यादित विकासाकडे लक्ष दिल्याचे चित्र आहे. जिल्हा परिषदेत नेहमीचे कामकाजही संथगतीने सुरू आहेत. जिल्ह्यात दुष्काळी उपाययोजनाबाबत राज्यातील सरकारचे विरोधक म्हणून असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी किमान सत्ताधाऱ्यांविरोधात काम करत आहेत हे दाखविण्यासाठी आटापीटा सुरू आहे. किमान वातावरण निर्मिती केली जात आहे. अनेक वर्षे सत्तेत असलेल्यांकडून किमान विरोधातील भाषा लोकांच्या कानावर पडू लागली आहे. जिल्ह्यातील शेतकरी व जनता दुष्काळाचे चटके सहन करीत असताना राज्य शासनाविरोधात एकत्रित आंदोलन किंवा मोर्चाने सरकारचे लक्ष वेधून घेण्यात आल्याचे समाधान असले तरी ज्या गतीने यात उपाययोजना होणे अपेक्षित आहे. मात्र त्या होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश उईके, उपाध्यक्ष सतीश हाडोळे, सभापती गिरीश कराळे, वृषाली विघे, अरुणा गोरले, सरिता मकेश्वर ही सर्व पदाधिकारी मंडळी दुष्काळी तालुक्याचे नेतृत्व करतात त्यांच्याकडून जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या माध्यमातून सरकारच्या अनेक योजना एकत्रित राबवून दुष्काळी भागातील लोकांना दिलासा देण्याचे काम यापूर्वीच सुरू करणे अपेक्षित होते. अधिकाऱ्यांना कामाला लावून योजना तयार केलेले दिसून येत नाही.