शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

पदाधिकाऱ्यांचे शासनाला आव्हान!

By admin | Updated: June 18, 2016 00:01 IST

महापालिकेंतर्गत खासदार, आमदारांनी प्रस्तावित केलेल्या विकासकामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला ‘एनओसी’ नाकारण्यावर स्थायी समिती ठाम आहे.

‘एनओसी’चा मुद्दा आमसभेत : राजकारण पुन्हा शिगेलाप्रदीप भाकरे अमरावतीमहापालिकेंतर्गत खासदार, आमदारांनी प्रस्तावित केलेल्या विकासकामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला ‘एनओसी’ नाकारण्यावर स्थायी समिती ठाम आहे. बांधकाम विभागाला नाहरकत प्रमाणपत्र न देता ही कामे मनपा यंत्रणेमार्फत करण्यास मान्यता प्रदान करण्यासंदर्भात प्रस्ताव स्थायी समितीकडून आमसभेत आला आहे. या प्रस्तावामुळे महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी शासनालाच आव्हान देण्याची भूमिका घेतली आहे. आ. सुनील देशमुख आणि आ. रवि राणा यांच्याद्वारे प्रस्तावित कामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग ही कार्यान्वयन यंत्रणा आहे. ९.३६ कोटींचा रस्ते अनुदान निधी आणि मूलभूत निधीवरून उभय आमदार आणि स्थायी समिती परस्परांसमोर उभे ठाकले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाला नाहरकत प्रमाणपत्र न देण्याचा प्रस्तावच स्थायी समितीने ठेवला आहे. तो मान्यतेसाठी शनिवारच्या आमसभेसमोर ठेवला जाणार आहे. विशेष म्हणजे नगरविकास विभागाकडून ज्या विकासकामांसाठी १०० टक्के निधी वितरित केला जातो. जिल्हास्तरीय समितीचे शिक्कामोर्तबअमरावती : अशा विकासकामांना प्रशासकीय मंजुरी देण्याचे अधिकार विभागीय आयुक्त तथा जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यानुसार अमरावतीमधील मूलभूत सुविधा अनुदान आणि रस्ते अनुदानातील विकासकामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला कार्यान्वयन यंत्रणा करण्यात आले आहे. जिल्हास्तरीय समितीने त्यावर शिक्कामोर्तबही केले आहे. नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेची मानिव सहमती गृहित धरून विकासकामे वेळेवर पूर्ण करावीत, असे राज्य शासनाचा आदेश आहेत. त्यानंतरही स्थायी समितीने ‘एनओसी’ बाबत नकारघंटा ऐकवून ती कामे मनपा यंत्रणेमार्फत करण्यात यावी, असा हेका धरला असून तसा प्रस्तावच आमसभेसमोर ठेवण्यात आला आहे. या पार्श्वभूमिवर २८ एप्रिलला नगरविकास विभागाने काढलेल्या परिपत्रकालाच आव्हान देण्याची मानसिकता स्थायी समितीने बनविली आहे. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान, तेरावा आणि चौदावा वित्तआयोग, मूलभूत सुविधा व इतर यामधून मोठी व महत्त्वपूर्ण विकासकामे महापालिकेच्या बांधकाम विभागाने गुणवत्तापूर्ण केली आहे. त्यामुळे आमदार-खासदारांद्वारे प्रस्तावित कामे मनपा यंत्रणेमार्फतच व्हावी, असा अविनाश मार्डीकर यांच्यासह स्थायी समितीचा आग्रह आहे तर दुसरीकडे आ. राणा व आ. देशमुख यांनी ही कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडूनच करण्यात यावी, असे पत्र सक्षम प्राधिकाऱ्यांना दिले आहे. विशेष म्हणजे एनओसीच्या मुद्यावरून काही पदाधिकारी न्यायालयातही जाणार होते. तथापी तोंडावर आलेली आचारसंहिता पाहता हे पाऊल योग्य होणार नाही, अशी भूमिका काहींनी मांडली. महापालिकांचा खोडाअन्य यंत्रणेला ‘एनओसी’ देण्यास महापालिका आणि अन्य नागरी स्थानिक स्वराज्य संस्था कुचराई करतात, हे गृहित धरूनच विकासकामांना होणारा विलंब टाळण्यासाठी शासनाने ‘मानिव सहमती’चा रामबाण उपाय शोधला आहे. पीडब्ल्यूडी किंवा अन्य कार्यान्वयन यंत्रणेला नगरविकास विभागाकडून आलेल्या अनुदानातून काम करण्यासाठी महापालिकेच्या ‘एनओसी’ची फारशी गरज नाही. १५ दिवसांच्या कालावधीत महापालिका व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थेने एनओसी न दिल्यास त्यांची काहीही हरकत नाही, असे समजावे, असा शासनादेश आहे. अतिरिक्त शहर अभियंत्यांचेही पत्रमहानगरपालिका अधिनियम कलम ७४ व प्रकरण १२ चे कलम १८८ नुसार आमदार, खासदार व अन्य विधानसभा सदस्यांद्वारे प्रस्तावित विकासकामांना सार्वजनिक बांधकाम विभागाला नाहरकत प्रमाणपत्र देऊ नये व सदर कामे महापालिकेच्या बांधकाम विभागामार्फतच करण्याबाबत स्थायी समितीने मान्यता प्रदान करावी, अशी टिप्पणी अतिरिक्त शहर अभियंत्यांनी दिली आहे. महापालिकेची सहमती गृहितराज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडून ज्या विकासकामांकरिता १०० टक्के निधी वितरित केला जातो, अशा कामांसाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेव्यतिरिक्त अन्य कार्यान्वयन यंत्रणा नेमली जाते. त्यावेळी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे नाहरकत प्रमाणपत्र त्या कार्यान्वयन यंत्रणेला (उदा. पीडब्ल्यूडीला) आवश्यक असते. अशा प्रकरणी संबंधित सक्षम प्राधिकाऱ्यांनी प्रशासकीय मंजुरी देताना नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेकडे पत्रव्यवहार करावा. नाहरकत किंवा सहमती मिळविण्यासाठी पत्र पाठविल्यानंतर अनुमती प्राप्त न झाल्यास अशा प्रकरणांमध्ये नागरी स्वराज्य संस्थेची मानिव सहमती मिळाल्याचे गृहित धरावे, अशा शासनाच्या स्पष्ट सूचना आहेत तथा शासन निर्णय काढण्यात आला आहे.