शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

लक्ष्मीचे दातृत्व तारामायला अर्पण

By admin | Updated: October 4, 2016 00:19 IST

नवरात्र म्हणजे नऊ दिवस आदिशक्तीची आराधना करण्याची परंपरा.

समाजापुढे आदर्श : तेरवीची रक्कम दिली मंदिर उभारणीला धामणगाव रेल्वे : नवरात्र म्हणजे नऊ दिवस आदिशक्तीची आराधना करण्याची परंपरा. आयुष्यभर गावातील तारामायची सेवा व नवरात्रीत अखंड उपवास करणाऱ्या आईचे निधन झाल्यानंतर तिने दिलेला शब्द पाळण्यासाठी निस्ताने कुटुंबियांनी रूढींना फाटा देत आईची तेरवी न करता गावातील मंदिराच्या उभारणीसाठी तेरवीची रक्कम प्रदान करून अनोखा आदर्श निर्माण केला. शिदोडी येथील रहिवासी व माजी जि़प़सभापती रामदास निस्ताने यांचे वडिल व्यंकटराव निस्ताने व आई लक्ष्मीबाई यांनी सन १९७३ मध्ये गावावर आलेले दुष्काळाचे संकट परतवून लावले होते़ गावातील शेतकऱ्यांनी त्यावेळी उत्पादीत केलेले धान्य त्यांनी गावाबाहेर जाऊ दिले नाही. सन १९७८ साली गावकऱ्यांना एक मूर्ती सापडली. ग्रामस्थांनी गावाच्या वेशीवरील शेतात तारादेवीच्या मूर्तीची स्थापना केली. तेव्हापासून हे गावाचे आराध्यदैवत झाले. दररोज तारामातेची पूजाअर्चा करण्याचे कार्य लक्ष्मीबाई निस्ताने यांनी केले. लक्ष्मीबाई निस्ताने यांचा मृत्यू मागील आठवड्यात झाला. सामाजीक कार्यकर्त्या व वात्सल्यसिंधू आई म्हणून ओळख असलेल्या लक्ष्मीबाई निस्ताने यांनी पतीच्या मृत्यू तारखेच्याच दिवशीच ३६ वर्षांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी मृत्युनंतर तेरवी न करता धार्मिक उपक्रमात तेरवीची रक्कम खर्च करावी, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे त्यांच्या शब्दाचा मान राखत आणि मृत्युनंतर त्यांच्या इच्छापूर्तीसाठी त्यांच्या कुटुंबियांनी तेरवीचा खर्च तारामायच्या मंदिर उभारणीसाठी दान दिली. त्यांच्या या कार्याचे परिसरात कौतुक होत आहे. आयुष्यभर समाजहितासाठी झटणाऱ्या लक्ष्मीचे दातृत्व मृत्युनंतरही समाजाच्या कामी आल्याची गावकरी चर्चा करीत आहेत. आदिशक्तीचा उत्सव सध्या सुरू आहे. अशा स्थितीत अखंड आयुष्य समाजासाठी झटणाऱ्या लक्ष्माबाई निस्ताने यांनी त्यांच्या शिदोडी गावासाठी केलेला त्याग खरोखरीच अतुलनीय आहे. आयुष्यभर लक्ष्मीबार्इंनी ज्या तारामायची आराधना केली त्याच तारामायच्या मंदिराचे पुनर्निर्माण तेरवीच्या पैशांमधून व्हावे, हा त्यांचा हेतू किती निरपेक्ष होता, हे गावकऱ्यांना उमगले. त्यांच्या कुटंबियांनीही त्यासाठी पुढाकार घेतला. आणि आता त्यांच्या तेरवीच्या पैशांमधून गावातील मंदिराचे काम मार्गी लागणार आहे. (तालुका प्रतिनिधी)आयुष्यभर केली समाजसेवा लक्ष्मीबाई निस्ताने यांनी आयुष्यभर जमेल त्या मार्गाने समाजसेवा केली. गोरगरिबांना मदत, शेतकऱ्यांच्या मुलींचे विवाह आदी मार्गांनी त्यांची समाजसेवा सुरूच होती. मृत्युनंतरही त्यांनी हा पायंडा कायम राखला.