शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
3
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
4
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
5
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
6
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
7
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
8
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
9
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
10
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
11
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
12
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
13
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
14
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
15
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
16
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
17
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
18
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
19
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
20
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
Daily Top 2Weekly Top 5

विकास आराखड्यात दुबार कामांचा अडसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:12 IST

अमरावती : १५ व्या वित्त आयोगाच्या जिल्हा परिषदेला प्राप्त झालेल्या निधीतून कामांसाठी सदस्यांनी पत्रे दिली आहेत. मात्र, याच निधीतून ...

अमरावती : १५ व्या वित्त आयोगाच्या जिल्हा परिषदेला प्राप्त झालेल्या निधीतून कामांसाठी सदस्यांनी पत्रे दिली आहेत. मात्र, याच निधीतून यापूर्वी ग्रामपंचायत, पंचायत समिती पातळीवर आराखडे तयार करून त्यात कामे सुचविली आहेत. त्यामुळे बहुतांश सदस्यांनी सुचविलेली कामे दुबार होत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या विकास आराखडा तयार करण्यास अडचणी येत असल्याचे चित्र आहे.

१५ व्या वित्त आयोगातून जिल्हा परिषदेला ३१ मार्चपर्यंत कोट्यवधी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. यातच विकास कामे करण्यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समित्यांनी विकास आराखडे तयार करून ग्रामपंचायतींनी तयार केलेल्या विकास आराखड्याव्यतिरिक्त कामांचा समावेश करावा अशा स्पष्ट सूचना सरकारने दिल्या आहेत. यामुळे ग्रामपंचायत विभागाने आराखड्यामध्ये समावेश असलेल्या कामांची यादी करून ती सदस्यांना उपलब्ध करून देणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात याकरिता आपल्या गटातील कामे सुचविण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार सदस्यांनी त्यांना कळलेल्या अर्थानुसार बंदित व अबंदित कामे सुचवणारी पत्रे जिल्हा परिषद प्रमुखांकडे सादर केली. त्यांनी पत्रात विभागातील ग्रामपंचायतकडून या कामांचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू असताना अनेक कामे चुकीची व काही दुबार असल्याचे लक्षात आले. सदस्यांनी सुचविलेली कामे यापूर्वीच ग्रामपंचायत, पंचायत समित्यांच्या आराखड्यात समाविष्ट केलेली आढळून आली आहेत. अनेक सदस्यांनी १५ वित्त आयोगाच्या निधीतून पाणी शुद्धीकरण प्रकल्प, पाणी एटीएमसारखे प्रकल्प सुचविले होते. ती कामे रद्द करीत ग्रामपंचायत विभागाने संबंधित सदस्यांकडून नवीन पत्रे मागविली आहेत.

बॉक्स

विकास आराखड्याचा उलटा प्रवास

कोणताही विकास आराखडा तयार करताना प्रशासनाने प्राधान्यानुसार व नियमानुसार कामांची यादी तयार करून आराखडा तयार करावा, उपलब्ध निधीतून सदस्यांनी त्या आराखड्यानुसार कामे सुचवावीत, असे सरकारला अपेक्षित आहे. मात्र, जिल्हा परिषदेच्या सर्वच आराखड्यांप्रमाणे १५ व्या वित्त आयोगाच्या विकास आराखड्याचाही उलटा प्रवास सुरू आहे. १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून जिल्हा स्तरावर विकास आराखडा तयार करताना जिल्हा परिषद अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली एक विकास आराखडा समिती स्थापन करून त्यानुसार आराखडा तयार व्हावा असे शासनाला अपेक्षित आहे.