शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
3
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
4
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
5
"माझी हत्या होऊ शकते..." हकालपट्टी झालेल्या सपाच्या आमदार पूजा पाल यांचा धक्कादायक दावा
6
नीरज चोप्रा डायमंड लीग २०२५च्या अंतिम फेरीत; अँडरसन पीटर्स, ज्युलियन वेबरशी लढत!
7
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
8
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
9
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
10
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
11
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
12
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
13
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
14
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
15
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
16
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
17
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
18
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 
19
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
20
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार

विकास आराखड्यात दुबार कामांचा अडसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:12 IST

अमरावती : १५ व्या वित्त आयोगाच्या जिल्हा परिषदेला प्राप्त झालेल्या निधीतून कामांसाठी सदस्यांनी पत्रे दिली आहेत. मात्र, याच निधीतून ...

अमरावती : १५ व्या वित्त आयोगाच्या जिल्हा परिषदेला प्राप्त झालेल्या निधीतून कामांसाठी सदस्यांनी पत्रे दिली आहेत. मात्र, याच निधीतून यापूर्वी ग्रामपंचायत, पंचायत समिती पातळीवर आराखडे तयार करून त्यात कामे सुचविली आहेत. त्यामुळे बहुतांश सदस्यांनी सुचविलेली कामे दुबार होत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या विकास आराखडा तयार करण्यास अडचणी येत असल्याचे चित्र आहे.

१५ व्या वित्त आयोगातून जिल्हा परिषदेला ३१ मार्चपर्यंत कोट्यवधी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. यातच विकास कामे करण्यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समित्यांनी विकास आराखडे तयार करून ग्रामपंचायतींनी तयार केलेल्या विकास आराखड्याव्यतिरिक्त कामांचा समावेश करावा अशा स्पष्ट सूचना सरकारने दिल्या आहेत. यामुळे ग्रामपंचायत विभागाने आराखड्यामध्ये समावेश असलेल्या कामांची यादी करून ती सदस्यांना उपलब्ध करून देणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात याकरिता आपल्या गटातील कामे सुचविण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार सदस्यांनी त्यांना कळलेल्या अर्थानुसार बंदित व अबंदित कामे सुचवणारी पत्रे जिल्हा परिषद प्रमुखांकडे सादर केली. त्यांनी पत्रात विभागातील ग्रामपंचायतकडून या कामांचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू असताना अनेक कामे चुकीची व काही दुबार असल्याचे लक्षात आले. सदस्यांनी सुचविलेली कामे यापूर्वीच ग्रामपंचायत, पंचायत समित्यांच्या आराखड्यात समाविष्ट केलेली आढळून आली आहेत. अनेक सदस्यांनी १५ वित्त आयोगाच्या निधीतून पाणी शुद्धीकरण प्रकल्प, पाणी एटीएमसारखे प्रकल्प सुचविले होते. ती कामे रद्द करीत ग्रामपंचायत विभागाने संबंधित सदस्यांकडून नवीन पत्रे मागविली आहेत.

बॉक्स

विकास आराखड्याचा उलटा प्रवास

कोणताही विकास आराखडा तयार करताना प्रशासनाने प्राधान्यानुसार व नियमानुसार कामांची यादी तयार करून आराखडा तयार करावा, उपलब्ध निधीतून सदस्यांनी त्या आराखड्यानुसार कामे सुचवावीत, असे सरकारला अपेक्षित आहे. मात्र, जिल्हा परिषदेच्या सर्वच आराखड्यांप्रमाणे १५ व्या वित्त आयोगाच्या विकास आराखड्याचाही उलटा प्रवास सुरू आहे. १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून जिल्हा स्तरावर विकास आराखडा तयार करताना जिल्हा परिषद अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली एक विकास आराखडा समिती स्थापन करून त्यानुसार आराखडा तयार व्हावा असे शासनाला अपेक्षित आहे.