शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी मस्क यांना झटका देण्यास केली सुरुवात; अमेरिकन सैन्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवली 'गोळी'
2
ऐकावं ते नवलंच... अचानक लोकप्रिय ब्रँडच्या बिअर दुकानांमधून झाल्या गायब, राजधानीत नक्की काय झालं?
3
हाफिज सईद पाकिस्तानात नाही? नेमका कुठे लपून बसलाय तोयबाचा म्होरक्या? 'या' व्यक्तव्यांमधून मिळाले मोठे संकेत
4
हृदयद्रावक! ११ महिन्यांच्या मुलीने गमावले आई-वडील, आजी; झाली अनाथ, डोळे पाणावणारा Video
5
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा ग्रॅज्युएट; तरीही करतोय फूड डिलिव्हरीचं काम, महिन्याला लाखोंची कमाई
6
५ जुलैला जपानवर कोणतेही संकट आलेच नाही? रिओ तात्सुकीची भविष्यवाणी फोल ठरली?
7
सुपरहिट सिनेमांचा साक्षीदार 'फिल्मीस्तान स्टुडिओ' अखेर विकला; फिल्म इंडस्ट्री भावुक
8
Chaturmas 2025: चातुर्मासात दारासमोर रोज दोन बोटं रांगोळी काढा आणि लक्ष्मीकृपा मिळवा!
9
भयंकर! दरोडेखोरांनी घरात घुसून पत्नी, मुलांसमोर केली इंजिनिअरची हत्या; पैसे, दागिने घेऊन पसार
10
अमेरिका-चीन व्यापार युद्धात अंबानींची एन्ट्री? बीजिंगला जाणारे गॅस जहाज आता थेट भारतात!
11
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ५ मूलांक लकी, विविध लाभच लाभ; यश-प्रगती-भरभराट, स्वामी कल्याण करतील!
12
कोणाच्याही दबावापुढे झुकणार नाही; अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर भारताची स्पष्टोक्ती
13
ऑपरेशन सिंदूरनंतर राफेल पाडल्याची अफवा पसरवण्यामागे होतं कोण? फ्रान्सच्या गोपनीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर
14
उत्तर प्रदेशात आंबा महोत्सवाचा फज्जा, प्रदर्शनस्थळी लोकांकडून लुटालूट, मिळेल त्यात भरून नेले आंबे (Watch Video)
15
पूजेचं निर्माल्य नदीत टाकलं, सेल्फीनंतर पतीसमोरच महिलेने पुलावरून मारली उडी; नागपूरमधील धक्कादायक घटना
16
Viral Video: सिंह पाळणं अंगलंट, व्हिडीओ पाहून कानाला लावाल हात!
17
"जबरदस्त चित्रपट! आमिर खानने केला असता तर ऑस्कर...", 'आता थांबायचं नाय'बद्दल संजय राऊतांची खंत, सरकारला सुनावलं
18
ज्योती मल्होत्राचं केरळ सरकारशी कनेक्शन उघड! राज्याचा पैसा वापरुन मुन्नार-कोची फिरली अन्... 
19
एकेकाळी दारुचे पाट वाहिलेल्या दिल्लीत, प्रचंड बिअर टंचाई; भलेभले ब्रँड शोधूनही सापडत नाहीत...
20
'Google' स्मार्टफोन युझर्संना देतंय ८५०० रुपये, तुम्हालाही मिळू शकतात 'हे' पैसे! कसं जाणून घ्या

विकास आराखड्यात दुबार कामांचा अडसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:12 IST

अमरावती : १५ व्या वित्त आयोगाच्या जिल्हा परिषदेला प्राप्त झालेल्या निधीतून कामांसाठी सदस्यांनी पत्रे दिली आहेत. मात्र, याच निधीतून ...

अमरावती : १५ व्या वित्त आयोगाच्या जिल्हा परिषदेला प्राप्त झालेल्या निधीतून कामांसाठी सदस्यांनी पत्रे दिली आहेत. मात्र, याच निधीतून यापूर्वी ग्रामपंचायत, पंचायत समिती पातळीवर आराखडे तयार करून त्यात कामे सुचविली आहेत. त्यामुळे बहुतांश सदस्यांनी सुचविलेली कामे दुबार होत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या विकास आराखडा तयार करण्यास अडचणी येत असल्याचे चित्र आहे.

१५ व्या वित्त आयोगातून जिल्हा परिषदेला ३१ मार्चपर्यंत कोट्यवधी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. यातच विकास कामे करण्यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समित्यांनी विकास आराखडे तयार करून ग्रामपंचायतींनी तयार केलेल्या विकास आराखड्याव्यतिरिक्त कामांचा समावेश करावा अशा स्पष्ट सूचना सरकारने दिल्या आहेत. यामुळे ग्रामपंचायत विभागाने आराखड्यामध्ये समावेश असलेल्या कामांची यादी करून ती सदस्यांना उपलब्ध करून देणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात याकरिता आपल्या गटातील कामे सुचविण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार सदस्यांनी त्यांना कळलेल्या अर्थानुसार बंदित व अबंदित कामे सुचवणारी पत्रे जिल्हा परिषद प्रमुखांकडे सादर केली. त्यांनी पत्रात विभागातील ग्रामपंचायतकडून या कामांचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू असताना अनेक कामे चुकीची व काही दुबार असल्याचे लक्षात आले. सदस्यांनी सुचविलेली कामे यापूर्वीच ग्रामपंचायत, पंचायत समित्यांच्या आराखड्यात समाविष्ट केलेली आढळून आली आहेत. अनेक सदस्यांनी १५ वित्त आयोगाच्या निधीतून पाणी शुद्धीकरण प्रकल्प, पाणी एटीएमसारखे प्रकल्प सुचविले होते. ती कामे रद्द करीत ग्रामपंचायत विभागाने संबंधित सदस्यांकडून नवीन पत्रे मागविली आहेत.

बॉक्स

विकास आराखड्याचा उलटा प्रवास

कोणताही विकास आराखडा तयार करताना प्रशासनाने प्राधान्यानुसार व नियमानुसार कामांची यादी तयार करून आराखडा तयार करावा, उपलब्ध निधीतून सदस्यांनी त्या आराखड्यानुसार कामे सुचवावीत, असे सरकारला अपेक्षित आहे. मात्र, जिल्हा परिषदेच्या सर्वच आराखड्यांप्रमाणे १५ व्या वित्त आयोगाच्या विकास आराखड्याचाही उलटा प्रवास सुरू आहे. १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून जिल्हा स्तरावर विकास आराखडा तयार करताना जिल्हा परिषद अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली एक विकास आराखडा समिती स्थापन करून त्यानुसार आराखडा तयार व्हावा असे शासनाला अपेक्षित आहे.