शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

जिल्हा परिषद बदली प्रक्रियेवर हरकतीचा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:13 IST

अमरावती : जिल्हा परिषदेत नुकत्याच पार पडलेल्या बदली प्रक्रियेवर ५० कर्मचाऱ्यांनी हरकती नोंदवल्या. त्यामुळे प्रशासनाची डोकेदूखी वाढणार आहे. ...

अमरावती : जिल्हा परिषदेत नुकत्याच पार पडलेल्या बदली प्रक्रियेवर ५० कर्मचाऱ्यांनी हरकती नोंदवल्या. त्यामुळे प्रशासनाची डोकेदूखी वाढणार आहे. यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी स्थापन केलेल्या तक्रार निवारण समितीकडे या कर्मचाऱ्यांनी न्यायासाठी धाव घेतली आहे.

२६ ते २८ असे तीन दिवस प्रशासनाकडून १० विभागातील २७६ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. प्रशासकीय, विनंती बदल्याचा यात समावेश होता. यातील ५० कर्मचारी हे नाराज असल्याने त्यांनी त्यावर हरकती नोंदविल्या आहेत. संबंधित कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेत गठित करण्यात आलेल्या तक्रार निवारण समितीकडे या तक्रारी दाखल केल्या आहेत. ३० जुलैपर्यंत ५० कर्मचाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदने दिलीत. आजार, कौटुंबिक कारण, अशंत: बदल करून देण्यासह विविध कारणे दाखल हरकतीत नमूद आहेत. त्यामुळे प्रशासनाची आता कसरत लागणार आहे.

बॉक्स

विभागनिहाय दाखल हरकती

पंचायत ६, आरोग्य २३, पशुसंवर्धन २, बांधकाम १, महिला व बालकल्याण १ शिक्षण विभाग ८, सामान्य प्रशासन ९ याप्रमाणे तक्रार निवारण समितीकडे हरकती दाखल केल्या आहेत.

कोट

बदली प्रक्रिया नियमानुसार घेण्यात आली आली निवेदनांची पडताळणी केली जाईल त्यानंतर पुढील कारवाई मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनात केली जाणार आहे.

- तुकाराम टेकाळे,

उपमुख्य कार्यकारी अधिकारी

सामान्य प्रशासन