शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

पोषण आहार कामगारांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा

By admin | Updated: January 31, 2015 23:11 IST

शालेय पोषण आहार कामगारांचे अनेक प्रश्न शासन व प्रशासनस्तरावर प्रलंबित आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना न्याय द्यावा, यासाठी शनिवारी इर्विन चौक येथून जिल्हा परिषदेवर शालेय

अमरावती : शालेय पोषण आहार कामगारांचे अनेक प्रश्न शासन व प्रशासनस्तरावर प्रलंबित आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना न्याय द्यावा, यासाठी शनिवारी इर्विन चौक येथून जिल्हा परिषदेवर शालेय पोषण आहार कर्मचारी संघटना (सीटू) च्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. मध्यान्ह भोजन या योजनेचे खासगीकरण करण्याचे धोरण शासनाने घेतले आहे. त्यामुळे जिल्ह्यात शालेय पोषण आहार कामगारांवर बेरोजगाराची कुऱ्हाड पडणार आहे. या धोरणाला विरोध करण्यासाठी तसेच सेंट्रल किचन पध्दतीच्या माध्यमाने शालेय पोषण आहाराचे खाजगीकरणाचे मागे घेण्यात यावे. शालेय पोषण आहार कामगारांना ४५ व्या श्रम संमेलनाने शिफारस केल्याप्रमाणे किमान वेतन १० हजार रु. देण्यात यावे. पंचायत समितीमार्फत कर्मचाऱ्यांचे मानधन थेट बँक खात्यात जमा करण्यात यावे. जिल्ह्यातील विना चौकशी कमी केलेल्या कामगारांना चौकशी समितीच्या अहवालानुसार कामगारांना कामावर परत घ्यावे, इंधन, भाजीपाला, पुरक आहार इत्यादी साहित्य आणण्याचा अधिकार कामगारांना द्यावा, मागील चार महिन्याचे मानधन त्वरित देण्यात यावे, आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. थाळी मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झालेल्याकामगारांनी शासनाविरोधात घोषणाबाजी करत मागण्यांकडे लक्ष वेधले. दरम्यान मागणीचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी व उपमुख्यकार्यकारी अधिकारी महिला बालकल्याण कैलास घोडके यांना देण्यात आले. मोर्चामध्ये जिल्हाध्यक्ष सुभाष पांडे, भूषण यावले, संगिता लांडगे, दिलीप छापामोहन, महादेव गारपवार, प्रफुल्ल कुकडे, अनिता बिसणे, कांता राईकवार, गीता कडू, रंजना बोबडे, सारीका घोरपडे, वैशाली जंगम आदींचा समावेश होता.