शहरं
Join us  
Trending Stories
1
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
2
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
3
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
4
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
5
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
6
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
7
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
8
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
9
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
10
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
11
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
12
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
13
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
14
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
15
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
16
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
17
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
18
भाजपाला मतदान केल्याने दलितांना मारहाण, आरजेडीवर आरोप, बिहारमधील गोपालगंज येथील घटना  
19
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
20
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

जिल्हा परिषदेत वाढली अभ्यागतांची वर्दळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:10 IST

अमरावती : जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदीचा नियम शिथिल केल्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यावर कार्यालयात १०० टक्के उपस्थितीचा आदेश १५ ...

अमरावती : जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदीचा नियम शिथिल केल्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यावर कार्यालयात १०० टक्के उपस्थितीचा आदेश १५ जून रोजी जारी केला. त्यानुसार शुक्रवारपासून जिल्हा परिषदेतील अभ्यागतांची वर्दळ पुन्हा वाढली आहे. मात्र सभा, बैठका ऑनलाईन पद्धतीनेच घेतल्या जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

जिल्ह्यात कोविड विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे संचारबंदीचे नियम कडक करण्यात आले होते. त्यामुळे शासकीय कार्यालयातील उपस्थितीवर मर्यादा घालण्यात आली होती. जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येणाऱ्या कार्यालयांमध्ये ५० टक्के कर्मचारी उपस्थितीचा आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जारी केला होता. यामधून आरोग्य व पंचायत आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांना वगळण्यात आले होते. त्यानंतर आता राज्य शासनाच्या नियमानुसार जिल्ह्यात संचारबंदीत शिथिलता देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी यासंदर्भात गुरुवारी आदेश जाहीर केला आहे. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी जिल्हा परिषदेच्या नियंत्रणाखाली कार्यालयातील कर्मचाऱ्यांना १६ जूनपासून कार्यालय १०० टक्के उपस्थित राहण्याचे आदेश जारी केले आहेत. काही दिवसांपासून जिल्हा परिषदेची वर्दळ कोरोनामुळे ओसरली होती. मात्र आता जिल्हा परिषदेतील उपस्थितीवरही असलेल्या मर्यादा हटविण्यात आल्यामुळे साहजिकच कामानिमित्त येणाऱ्या जिल्हा परिषदेतील अभ्यागतांची गर्दी वाढत असल्याचे चित्र शुक्रवारी मिनी मंत्रलायात दिसून आले.

बॉक्स

उपस्थितीचे निरीक्षण

कोरोना संसर्ग आटोक्यात आल्यानंतर कडक निर्बंधामध्ये शिथिलता देण्यात आली आहे. त्यानुसार झेडपीच्या अखत्यारितील विविध विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची शंभर टक्के उपस्थिती ठेवण्यात सीईओंनी आदेश १५ जून रोजीच जारी केले होते. त्यानुसार शुक्रवार, १६ जून रोजी या आदेशानुसार कार्यालयात उपस्थिती आहे का? याची पडताळणी सीईओंच्या मार्गदर्शनात करण्यात आली आहे. यात अनेक विभागात उपस्थिती कमी असल्याचे तपासणी चमूला दिसून आले.

कोट

कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. त्यामुळे कार्यालयात कर्मचाऱ्यांची शंभर टक्के उपस्थिती राहणार आहे. आवश्यक त्या ठिकाणी ऑनलाईन कामाला प्राधान्य दिले जाईल.

- अविश्यांत पंडा,

मुख्य कार्यकारी अधिकारी