शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
2
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
3
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! आतापर्यंत ३७ जणांना अटक
4
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
5
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
6
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
7
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
8
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
9
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
10
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
11
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
12
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
13
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
14
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
15
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
16
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
17
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
18
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
19
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
20
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार

रेल्वेची संख्या वाढली; थांबे मात्र वाढेना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:13 IST

सामान्य प्रवाशांना आर्थिक फटका, पॅसेंजर गाड्या केव्हा होणार सुरू? अमरावती : कोरोनाकाळात रेल्वे गाड्या बंद करण्यात आल्यामुळे याचा आर्थिक ...

सामान्य प्रवाशांना आर्थिक फटका, पॅसेंजर गाड्या केव्हा होणार सुरू?

अमरावती : कोरोनाकाळात रेल्वे गाड्या बंद करण्यात आल्यामुळे याचा आर्थिक फटका रेल्वे प्रशासनाला बसला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच काही विशेष, एक्सप्रेस रेल्वे सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, या रेल्वे गाड्यांना ठराविक स्थानकावर थांबे देण्यात आल्यामुळे सामान्य प्रवाशांना रेल्वेचा प्रवास दुर्लभ झाला आहे.

गतवर्षी मार्चमध्ये कोरोनाचे आगमन होताच मोजक्याच रेल्वे सुरू होत्या. पॅसेंजर गाड्या तेव्हापासून बंद असून, आजतागायत रुळावर त्या धावल्या नाहीत. गरीब, सामान्य प्रवाशांनी शटल अथवा पॅंसेजर गाड्या सुरू कराव्यात, अशी असली तरी कोरोनाचे भय कायम असल्याने मोजक्याच रेल्वे धावत आहेत. लहान-सहान रेल्वे स्थानकावर मेल, एक्स्प्रेस गाड्यांना थांबे नसल्याने ही रेल्वे स्थानके आता ओस पडू लागली आहेत.

---------------

सध्या सुरू असलेल्या रेल्वे

- अमरावती-मुंबई एक्स्प्रेस

- अमरावती-तिरूपती, पुणे

- नरखेड-सिकंदराबाद

- सिकंदराबाद-जयपूर

- हावडा-मुंबई मेल, एक्स्प्रेस, गितांजली

- गाेंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस

- गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस

--------------------

कोट

वरिष्ठांकडून पॅसेंजर अथवा शटल रेल्वे सुरू करण्याबाबत पत्र प्राप्त नाही. पॅसेंजर रेल्वे सुरू होतील, अशी केवळ चर्चा आहे. मात्र, बोर्डाकडून अधिकृत जाहीर झाल्यानंतरच त्या सुरू होतील.

- महेंद्र लोहकरे, स्टेशन प्रबंधक, अमरावती

-----------------

या ठिकाणी रेल्वे कधी थांबणार?

टिमटाळा, मालखेड, दीपोरी

कुरूम, माना, येऊलखेड,

गायगाव, पारस, नागझिरी

----------------

थांबा नसल्याने आम्हाला होतोय त्रास....

‘‘ हल्ली केवळ मेल, एक्सप्रेस रेल्वे सुरु आहे. या गाड्यांना छोट्या स्थानकावर थांबे नाहीत. त्यामुळे गावाहून शहर गाठायचे म्हटले की, बस अथवा खासगी वाहनांनीच येे-जा करावी लागते. हा प्रवास आर्थिकदृष्ट्या परवडणारा नाही.

- कमलेश नाईक, माना

--------------

काेट

टिमटाळा येथून बडनेरा ये-जा करण्यासाठी केवळ १० रुपयांत रेल्वेचा प्रवास हाेेतो. मात्र, कोरोनाकाळात रोजगार नाही. तरीही कामकाजानिमित्त बडनेरा शहरात ये-जा करावी लागते. आता बस किंवा ऑटोरिक्षाने प्रवास करावा लागताे. त्यामुळे प्रत्येक फेरीत ६० रुपये खर्च येतो.

- माधुरी नागपुरे, टिमटाळा.