शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्धबंदीवर ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न...! म्हणाले, पुतिन-झेलेन्स्की आधी समोरा-समोर बोलतील
2
मनोज जरांगे पाटील आता तरी मुंबई गाठणार की वेशीवरुनच ऐनवेळी माघारी फिरणार?; चर्चांना उधाण
3
Stock Markets Today: आठवड्याच्या अखेरच्या दिवशी शेअर बाजारात घसरण; निफ्टी २५,००० च्या खाली, Wipro, Tata Motors, BEL मध्ये तेजी
4
दक्षिण अमेरिकेत मोठा भूकंप; हादऱ्यांमुळे लोक घाबरले, ७.५ तीव्रता, त्सुनामीचा इशारा
5
लखपती बनण्याची मशीन आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ २२२ रुपयांत सुरू करा गुंतवणूक, पाहा कॅलक्युलेशन
6
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
7
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
8
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
9
लक्ष्याच्या लेकीचं व्यवसायात पाऊल! स्वानंदी बेर्डेने सुरू केलं 'कांतप्रिया', आई-वडिलांच्या नावावरुन ठेवलं ब्रँडचं नाव
10
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
11
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
12
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
13
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
14
'दूरस्थ'चे दोन महिन्यांत केवळ १०,१६९ प्रवेश; कोणत्या अभ्यासक्रमांना किती प्रवेश? जाणून घ्या
15
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
16
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
17
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
18
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
19
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
20
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे

रुग्णसंख्या वाढताच, मृत्यूदराचा टक्का माघारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:14 IST

अमरावती : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा ११ महिन्यानंतर मृत्यूदराचा आलेख माघारला आहे. आतापर्यंत हे प्रमाण दोन ते आठ टक्क्यांपर्यंत होते. ...

अमरावती : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा ११ महिन्यानंतर मृत्यूदराचा आलेख माघारला आहे. आतापर्यंत हे प्रमाण दोन ते आठ टक्क्यांपर्यंत होते. आता १.५४ टक्क्यांवर आलेले आहे. चाचण्यांमध्ये पॉझिटिव्हीचे सरासरी प्रमाण मात्र वाढतेच १४.२९ टक्क्यांवर पोहोचल्याने जिल्ह्याच्या चिंतेत भर पडली आहे.

जिल्ह्यात पहिल्या कोरोनाग्रस्ताची नोंद ४ एप्रिल रोजी झाली. हा रुग्ण ‘होमडेड’ होता. या महिन्यात जिल्ह्यात संक्रमितांचा मृत्यूदर राज्यात सर्वाधिक ६ ते ८ टक्क्यांपर्यत होता. त्यानंतर संशयित मृत व्यक्तीचे स्वॅब घेण्याऐवजी त्यांचे संपर्कातील हायरिस्कच्या व्यक्तीचे स्वॅब घेण्यात येऊ लागल्याने जिल्ह्याच्या मृत्यूदरात कमी आली. मात्र, संक्रमित रुग्णाचे तुलनेत मृत्यूदराचे प्रमाण ३ ते ४ टक्क्यांपर्यंत होते. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा ब्लास्ट झाला असता मृत्यूचे प्रमाण २ ते ३ टक्क्यांपर्यंत होते. अलीकडे ४ फेब्रुवारीपर्यत जिल्ह्याचा मृत्यूदर हा २ टक्क्यांवर स्थिरावला होता.

फेब्रुवारी महिन्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने संक्रमितांची संख्या वाढली. मात्र, कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचा ग्राफ माघारला. सध्या हे प्रमाण १.५६ टक्क्यांपर्यंत कमी आलेले आहे. जिल्ह्यात संसर्गाच्या काळातील सर्वात कमी हे प्रमाण माघारले असल्याने दिलासा मिळाला असता तरी कोरोनाग्रस्तांची संख्या वाढती असल्याने जिल्ह्याच्या चिंतेत मात्र, भर पडली आहे.

बॉक्स

चाचण्यांचे प्रमाणात वाढ

जिल्ह्यात कोरोना चाचण्यांचे प्रमाणात आता वाढ झालेली आहे. आतापर्यंत उच्चांकी ३,२१७ चाचण्यांची नोंद याच आठवड्यात झालेली आहे. यापूर्वी ४०० ते ६०० पर्यंत असे चाचण्यांचे प्रमाण होते. संसर्ग वाढल्यानंतर हे प्रमाण दीड हजार चाचण्यांपर्यंत गेले. आता शासनाचा प्रशासनावर दबाव वाढल्याने हे प्रमाण ३ हजारांपर्यत पोहोचले आहे. यामध्ये पॉझिटिव्हीचे प्रमाण सध्या १५ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.

बॉक्स

फेब्रुवारीमध्ये २२ दिवसांत ४७ मृत्यू

जिल्ह्यात पहिल्या संक्रमिताची नोंद ४ एप्रिल रोजी झाल्यानंतरच्या १ फेब्रुवारीपर्यंत ४१८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. मात्र, त्यानंतर फेब्रुवारी महिन्याच्या २२ दिवसांत तब्बल ४७ संक्रमितांचे मृत्यूची नोंद झालेली आहे. यामध्ये ३० ते ४० वयोगटातील पाच रुग्णांचा समावेश असल्याने चिंता वाढली आहे. अन्य मृतामध्ये ५० ते ७० वयोगटातील पुरुष-महिलांषा समावेश असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.