शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

एनआरएचएममध्ये सावळागोंधळ !

By admin | Updated: March 28, 2016 00:14 IST

जिल्ह्यातील मेळघाटातील साडेचारशे कंत्राटी कर्मचारी गेल्या सहा ते सात वर्षांपासून बदलीच्या प्रतीक्षेत असताना राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कार्यक्रम ...

सहा महिन्यांत महिला कर्मचाऱ्याची बदली : सीईओंना अंधारात ठेवून कामकाजअमरावती : जिल्ह्यातील मेळघाटातील साडेचारशे कंत्राटी कर्मचारी गेल्या सहा ते सात वर्षांपासून बदलीच्या प्रतीक्षेत असताना राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कार्यक्रम अधिकाऱ्यांनी केवळ एका महिला कर्मचाऱ्यावर विशेष कृपा दाखविली. सदर महिला कर्मचाऱ्यांना सर्व नियम धाब्यावर बसवून नियमबाह्य नियुक्ती व बदलीही दिली. त्यामुळे आरोग्य विभागात चर्चेला उधाण आले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, या महिला कर्मचाऱ्यांचा मूल्यांकन अहवाल दोन तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नकारात्मक दाखविला आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्ह्यात १८०० कंत्राटी कर्मचारी विविध पदांवर कार्यरत आहेत. त्यांच्याकडे आरोग्यातील अति महत्त्वाची जबाबदारी असताना त्यांना नियमित करणे तर सोडाच परंतु त्यांची बदलीदेखील केली जात नाही. इतर जिल्ह्यात त्यांच्या सोयीप्रमाणे बदली प्रक्रिया सुरू केली आहे. परंतु येथील अधिकाऱ्यांच्या अकार्यक्षमतेमुळे अमरावती अपवाद आहे. त्यामुळे आमदार, खासदार तर सोडाच परंतु पालकमंत्री यांच्या शिफारसीला अधिकारी बिनधास्तपणे बदलीकरिता नकार देतात. परंतु दिव्याखाली अंधार याप्रमाणे अधिकारी आपल्या मर्जीने कारभार चालवीत असल्याचे तालुका लेखापाल यांची नियुक्ती व बदलीवरून निष्पन्न झाले आहे. मीना राठोड यांच्यावर तत्कालीन सीईओ लांडगे यांनी कर्मचारी संघटनेच्या तक्रारीवरून त्यांची दर्यापूर येथे बदली केली होती. वर्षअखेर त्यांच्या विरोधात दोन्ही तालुका अधिकाऱ्यांनी नकारात्मक मूल्यांकन अहवाल दिला. रुग्ण कल्याण समिती अंजनगाव बारी येथे सन २००८-०९ मध्ये नियमबाह्य खरेदी केल्यामुळे सन २०१० मध्ये संचालक मुंबई यांच्या पत्रानुसार त्यांची एक वेतनवाढ रोखली आहे. अशा वारंवार तक्रारी असताना त्यांनी नियमबाह्य नियुक्ती देऊन पुन्हा दर्यापूरवरून अमरावती येथे केवळ सहा महिन्यांत बदली देण्यात आली. मूल्यांकन अहवाल नकारात्मक असल्याने दरवर्षी कित्येक कर्मचाऱ्यांना पाठविले जात असताना या एका कर्मचाऱ्यावर एनआरएचएम कृपादृष्टी का, असा प्रश्न जिल्ह्यातील १८०० कर्मचाऱ्यांना पडला आहे. राठोड यांच्या या बदलीवर हे एम्प्लॉईज फेडरेशनने आक्षेप देखील घेतला आहे. तरीदेखील सदर महिला कर्मचाऱ्याला अधिकाऱ्यांकडून वाचविले जात आहे. याप्रकरणाबाबत जिल्हा परिषद सीईओ सुनील पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)आमदार, खासदारांसह पालकमंत्र्यांच्या पत्राला मात्र केराची टोपलीकंत्राटी कर्मचाऱ्यांच्या किमान १० वर्षे बदल्या होत नाही, असा जणू आरोग्य विभागाने नियमच केला आहे. परंतु काही शहरांमध्ये तीन वर्षांनंतर बदली केली जात आहे. जिल्ह्यातील खासदार, आमदाराची शिफारस असो त्यांनाही येथे कारण दाखविल जाते. एका प्रकरणात जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांनी पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या पत्रावर नुकतेच बदलीचा हा नियम असल्याचे पत्राद्वारे सांगितले आहे. असे असताना राठोड यांच्या बाबतीत अधिकाऱ्यांना हा नियम लागू नव्हता काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यांचे मूल्यांकन नकारात्मक असताना नियुक्ती आणि तत्कालिन सीईओंनी नकार दिल्यानंतर नवीन सीईओंच्या माध्यमातून दर्यापूरवरुन अमरावती पुन्हा बदली करण्याचे कारण काय. अखेर त्यांना कुणाचे राजाश्रय आहे, कोण अधिकारी त्यांच्या पाठीशी आहे, असे तर्कवितर्क काढले जात आहे.