शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

एनआरएचएममध्ये सावळागोंधळ !

By admin | Updated: March 28, 2016 00:14 IST

जिल्ह्यातील मेळघाटातील साडेचारशे कंत्राटी कर्मचारी गेल्या सहा ते सात वर्षांपासून बदलीच्या प्रतीक्षेत असताना राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कार्यक्रम ...

सहा महिन्यांत महिला कर्मचाऱ्याची बदली : सीईओंना अंधारात ठेवून कामकाजअमरावती : जिल्ह्यातील मेळघाटातील साडेचारशे कंत्राटी कर्मचारी गेल्या सहा ते सात वर्षांपासून बदलीच्या प्रतीक्षेत असताना राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कार्यक्रम अधिकाऱ्यांनी केवळ एका महिला कर्मचाऱ्यावर विशेष कृपा दाखविली. सदर महिला कर्मचाऱ्यांना सर्व नियम धाब्यावर बसवून नियमबाह्य नियुक्ती व बदलीही दिली. त्यामुळे आरोग्य विभागात चर्चेला उधाण आले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, या महिला कर्मचाऱ्यांचा मूल्यांकन अहवाल दोन तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नकारात्मक दाखविला आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्ह्यात १८०० कंत्राटी कर्मचारी विविध पदांवर कार्यरत आहेत. त्यांच्याकडे आरोग्यातील अति महत्त्वाची जबाबदारी असताना त्यांना नियमित करणे तर सोडाच परंतु त्यांची बदलीदेखील केली जात नाही. इतर जिल्ह्यात त्यांच्या सोयीप्रमाणे बदली प्रक्रिया सुरू केली आहे. परंतु येथील अधिकाऱ्यांच्या अकार्यक्षमतेमुळे अमरावती अपवाद आहे. त्यामुळे आमदार, खासदार तर सोडाच परंतु पालकमंत्री यांच्या शिफारसीला अधिकारी बिनधास्तपणे बदलीकरिता नकार देतात. परंतु दिव्याखाली अंधार याप्रमाणे अधिकारी आपल्या मर्जीने कारभार चालवीत असल्याचे तालुका लेखापाल यांची नियुक्ती व बदलीवरून निष्पन्न झाले आहे. मीना राठोड यांच्यावर तत्कालीन सीईओ लांडगे यांनी कर्मचारी संघटनेच्या तक्रारीवरून त्यांची दर्यापूर येथे बदली केली होती. वर्षअखेर त्यांच्या विरोधात दोन्ही तालुका अधिकाऱ्यांनी नकारात्मक मूल्यांकन अहवाल दिला. रुग्ण कल्याण समिती अंजनगाव बारी येथे सन २००८-०९ मध्ये नियमबाह्य खरेदी केल्यामुळे सन २०१० मध्ये संचालक मुंबई यांच्या पत्रानुसार त्यांची एक वेतनवाढ रोखली आहे. अशा वारंवार तक्रारी असताना त्यांनी नियमबाह्य नियुक्ती देऊन पुन्हा दर्यापूरवरून अमरावती येथे केवळ सहा महिन्यांत बदली देण्यात आली. मूल्यांकन अहवाल नकारात्मक असल्याने दरवर्षी कित्येक कर्मचाऱ्यांना पाठविले जात असताना या एका कर्मचाऱ्यावर एनआरएचएम कृपादृष्टी का, असा प्रश्न जिल्ह्यातील १८०० कर्मचाऱ्यांना पडला आहे. राठोड यांच्या या बदलीवर हे एम्प्लॉईज फेडरेशनने आक्षेप देखील घेतला आहे. तरीदेखील सदर महिला कर्मचाऱ्याला अधिकाऱ्यांकडून वाचविले जात आहे. याप्रकरणाबाबत जिल्हा परिषद सीईओ सुनील पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)आमदार, खासदारांसह पालकमंत्र्यांच्या पत्राला मात्र केराची टोपलीकंत्राटी कर्मचाऱ्यांच्या किमान १० वर्षे बदल्या होत नाही, असा जणू आरोग्य विभागाने नियमच केला आहे. परंतु काही शहरांमध्ये तीन वर्षांनंतर बदली केली जात आहे. जिल्ह्यातील खासदार, आमदाराची शिफारस असो त्यांनाही येथे कारण दाखविल जाते. एका प्रकरणात जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांनी पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या पत्रावर नुकतेच बदलीचा हा नियम असल्याचे पत्राद्वारे सांगितले आहे. असे असताना राठोड यांच्या बाबतीत अधिकाऱ्यांना हा नियम लागू नव्हता काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यांचे मूल्यांकन नकारात्मक असताना नियुक्ती आणि तत्कालिन सीईओंनी नकार दिल्यानंतर नवीन सीईओंच्या माध्यमातून दर्यापूरवरुन अमरावती पुन्हा बदली करण्याचे कारण काय. अखेर त्यांना कुणाचे राजाश्रय आहे, कोण अधिकारी त्यांच्या पाठीशी आहे, असे तर्कवितर्क काढले जात आहे.