शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
3
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
4
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
6
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
7
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
8
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
9
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
10
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
11
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
12
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
13
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
14
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
15
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
16
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
17
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
18
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
19
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
20
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

आता संवेदनशील पोलीस ठाणे लक्ष्य

By admin | Updated: January 13, 2015 22:51 IST

शहरात दुसऱ्यांदा गोळीबार झाल्याचे प्रकरण अतिशय गंभीर आहे. गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी ‘इफेक्टीव्ह पोलिसिंग’चे निर्देश देण्यात आले आहे. विशेषत: जे पोलीस दप्तरी संवेदनशील ठाणे आहेत,

आढावा बैठक : गृहराज्यमंत्र्यांची माहिती, इफेक्टीव्ह पोलिसिंगवर भर, गुन्हेगारी रोखण्यासाठी कोम्बिंग आॅपरेशनअमरावती : शहरात दुसऱ्यांदा गोळीबार झाल्याचे प्रकरण अतिशय गंभीर आहे. गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी ‘इफेक्टीव्ह पोलिसिंग’चे निर्देश देण्यात आले आहे. विशेषत: जे पोलीस दप्तरी संवेदनशील ठाणे आहेत, अशा भागात विशेष लक्ष ठेवण्याची जबाबदारी वरिष्ठांवर सोपविली जाईल, अशी माहिती राज्याचे गृह व नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी येथे मंगळवारी दिली. ना.पाटील हे अमरावतीत आढावा बैठकीसाठी आले असता त्यांनी येथील शासकीय विश्रामगृहात प्रसारमाध्यमांशी अनौपचारिक चर्चा केली. ना.पाटील यांच्या मते अंबानगरी ही सांस्कृतिक, शैक्षणिक क्रीडानगरी म्हणून नावारुपास येत असताना गोळीबार, टोळीयुद्ध होणे ही बाब या शहरासाठी दु:खद आहे. सोमवारी झालेल्या गोळीबार प्रकरणात ११ आरोपी पोलिसांनी जेरबंद केले आहेत. या घटनेतील फिर्यादी नागपुरात उपचार घेत आहेत. मात्र गोळीबार प्रकरणी पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. शहरात देशी कट्टे मोठ्या प्रमाणावर येत असल्याच्या प्रश्नावर बोलताना नामदार पाटील यांनी पोलिसांना यासंदर्भात कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले आहे. ज्यांच्याकडे देशी कट्टे आढळले, हे देशी कट्टे कोठून आले, याच्या खोलात पोलिसांनी शिरुन याप्रकरणी मुख्य सूत्रधाराला शोधून काढण्याची जबाबदारी पोलीस आयुक्तांवर सोपविण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. संवेदनशील पोलीस ठाणे परिसरात गुन्हेगार, तडीपार यांना शोधून काढण्यासाठी कोम्बिंग आॅपरेशन राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जे पोलीस ठाणे संवेदनशील आहेत, त्या भागात मॉनेटरिंग प्रणाली लागू करुन अधिकारी, कर्मचारी असा समन्वय ठेवला जाणार आहे. जेणेकरुन गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासह अवैध धंद्यांवर पुर्णपणे लगाम लावता येईल, असे ते म्हणाले. दोनवेळा झालेल्या गोळीबार प्रकरणामुळे शहरात गुन्हेगारी वाढत असल्याचे स्पष्ट होत असले तरी पोलिसांना यासंदर्भात काही सूचना दिल्या आहेत. पोलीस सूचनांचे पालन करीत आहेत. मात्र गुन्हेगारीबाबत निकालासाठी काही कालावधी द्यावा लागेल, असे नामदार पाटील यांनी म्हणाले. यापुढे संवेदनशील ठाण्यात पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करताना त्यांच्या कर्तव्याचा रेकॉर्ड तपासला जाईल. अशा ठाण्यांमध्ये प्रभावी अंमलबजावणी आणि कर्तव्यदक्ष पोलिसांची नियुक्ती करण्याबाबतचे निर्देश वरिष्ठांना दिले जाणार आहे. पोलिसांच्या वेतनाचा प्रश्न, वसाहती, वेतन श्रेणी, प्रवास भत्ता अशा अनेक समस्या आहेत. मात्र या समस्यांचे निराकरण करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच निर्णय घेतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. यावेळी पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)सीमेवरील नाक्यांवर सुक्ष्म तपासणीपरप्रांतातून महाराष्ट्रात येणारे देशी कट्टे, पिस्तुल, तस्करी आदी बाबी रोखण्यासाठी राज्याच्या सिमेवरील नाक्यांवर पोलिसांकडून सुक्ष्म तपासणी केली जाणार आहे. काही महत्वाच्या नाक्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे धोरण गृहविभागाचे आहे. कायदा, सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी गृहविभाग आवश्यक त्या उपाययोजना करीत आहेत. विशेषत: मध्य प्रदेशातून महाराष्ट्राला जोडणाऱ्या सिमा नाक्यांवर पोलिसांना सजग राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.