शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

आता ‘पाणी साठवा, गाव वाचवा’ अभियान

By admin | Updated: June 19, 2014 23:37 IST

ग्रामीण भागातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रत्येक गावात पडणाऱ्या पावसाचे पाणी कसे साठवता येईल, यावर उपाययोजना म्हणून ग्रामविकास विभागाच्यावतीने पाणी अव्यवस्थापनासाठी आता पाणी

अमरावती : ग्रामीण भागातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रत्येक गावात पडणाऱ्या पावसाचे पाणी कसे साठवता येईल, यावर उपाययोजना म्हणून ग्रामविकास विभागाच्यावतीने पाणी अव्यवस्थापनासाठी आता पाणी साठवा आणि गाव वाचवा अभियान राबविण्यात येणार आहे. अभियानात काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पुरस्कार दिले जाणार आहेत. पाणी वाचवा, गाव वाचवा या अभियानाची निश्चित योजना तयार करण्यासाठी जलतज्ज्ञ, सेवाभावी संस्थांच्या सदस्य, कल्पक उपक्रमामध्ये काम करणाऱ्या संस्थेचे प्रतिनिधी व सरकारी अधिकारी यांची मदत घेतली जाणार आहे. ही योजना राबविण्यासाठी ग्रामपंचायतीचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे.या अभियानासंदर्भात गाव पातळीवर अस्तित्वात असलेल्या मातीची पाणी धरुन ठेवण्याची क्षमता, खडकाची पाणी पातळी व साठवण क्षमता याचे निश्चित नियोजन केले जाणार आहे. संबंधित गावातील तलाव, विहिरींच्या पाण्याच्या पातळीचे मोजमाप करुन पाणी स्त्रोताच्या पद्धतीचा अभ्यास केला जाणार आहे. या संपूर्ण घटकाच्या अभ्यास अहवालाचे नियोजन आराखडा या माध्यमातून तयार केला जाणार आहे.ज्या ग्रामपंचातींना उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी टँकरने पुरवठा केला जातो अशी गावे प्राधान्याने सहभागी व्हावीत यासाठी त्यांना प्रवृत्त केले जाणार आहेत. ग्रामीण भागातील पाणी टंचाई कायमची दूर करण्यासाठी हे अभियान महत्त्वाचे आहे. अंमलबजावणी काटेकोर होण्यासाठी राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय संनियंत्रण समिती स्थापन करण्यात येणार आहे. यामध्ये राज्यस्तरीय समितीने धोरण ठरवणे व वार्षिक आराखडा निश्चित करणे अपेक्षित आहे. जिल्हास्तरीय कार्यक्रमाची अंमलबजावणीची जबाबदारी ही मुख्य कार्यकारी अधिकारी व तालुक्यांची जबाबदारी पंचायत समितीचे बीडीओ यांची असणार आहे. नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची प्रत्येक टप्प्यावर कामांची तपासणी करुन शिफारस केलेल्या ग्रामपंचायतींना जिल्हा स्तरावर पुरस्कारासाठी निवडण्यात येणार आहेत. या अभियानाचा कालबाह्य कार्यक्रम १५ जून ते १५ आॅक्टोबर असा आहे. ३१ आॅक्टोबरपर्यंत ग्रामपंचायतींकडून तालुकास्तरावर पंचायत समितीकडे अर्ज पाठविण्याची मुदत देण्यात आली आहे. ३१ जानेवारी २०१५ पर्यंत जिल्हास्तरीय स्पर्धाकरिता उत्सुक व पात्र ग्रामपंचायतींचे अर्ज मुख्य कार्यकारी अधिकारी यांचाकडे पाठविण्याकरिता मुदत ठरविण्यात आली आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत जिल्हास्तरीय समितीच्या मान्यतेने जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी उत्कृष्ट ग्रामपंचायतींची निवड करणार आहेत. १० एप्रिल २०१५ रोजी पुस्कार वितरण होणार आहे. (प्रतिनिधी)