शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आता रस्त्यांवर पडणार नाहीत खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 23:49 IST

खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे, असे चित्र नेहमीच पहायला मिळते. नवीन रस्त्यालाही अल्पावधीतच खड्डे पडतात.

ठळक मुद्देशासन धोरण : कंत्राटदारावर सोपविली दोन वर्षे देखभाल, दुरूस्तीची जबाबदारी

आॅनलाईन लोकमतअमरावती : खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे, असे चित्र नेहमीच पहायला मिळते. नवीन रस्त्यालाही अल्पावधीतच खड्डे पडतात. रस्ते करण्यासाठी निधी खर्च होतो आणि पुन्हा या रस्त्यांवर खड्डे पडल्यानंतरही अतिरिक्त निधी खर्च केला जातो. पण आता ही पद्धत कालबाह्य झाली आहे. आता यापुढे रस्ते करणाऱ्या ठेकेदाराला संबंधित रस्त्याची दोन वर्षे देखभाल दुरूस्ती करावी लागेल तसेच खड्डे भरण्याच्या कामालाही दोन वर्षांचाच निकष राज्य शासनाने लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यापुढे होणाऱ्या रस्त्यांवर किमान खड्डे दिसणार नाहीत, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.रस्ते करणारे देयके कंत्राटदार आणि त्यावर पडलेले खड्डे भरणारे निराळे ठेकेदार, असे यापूर्वी चित्र होते. या पद्धतीमुळे एकाच रस्त्यासाठी दोनदा खर्च केला जात होता. परंतु आता सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबत गंभीर दखल घेऊन रस्त्यांच्या दर्जाबाबत परिपत्रक काढले आहे. रस्ते करणाऱ्या ठेकेदाराने दोन वर्षे या रस्त्याची देखभाल दुरूस्ती करण्याचा नियम करण्यात आला आहे. संबंधित ठेकेदाराने गांभीर्याने देखभाल दुरूस्ती करावी यासाठी बिलातील पाच टक्के रक्कम ठेवी म्हणून विभागाकडे राखीव राहणार आहे. यासह खड्डे भरण्याच्या कामालाही दर्जाचे निकष लागू केले आहे. खड्डा कसा भरावा यासाठी वापरल्या जाणाºया घटकांचे प्रमाण कसे असावे याचे नवे निकष सुचवले आहे. त्याचा दर्जाही वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यानी तपासावा, असे स्पष्ट केले आहे. कामात हयगय होता कामा नये, अशा स्वरुपाचा हा जीआर आहे. याचा अर्थ यापुढे नव्या कामांमध्ये दर्जा हा महत्त्वाचा घटक राहणार आहे. जरी रस्ता खराब झाला तर तत्काळ दुरूस्ती करण्याचा नियम करण्यात आला असल्याने यापुढे किमान पूर्वीचे खड्डेयुक्त रस्त्याचे चित्र राहणार नाही.हा चांगला निर्णय आहे. रस्ते खराब होण्याचे प्रमाण यापुढे निश्चित कमी होईल. दोन वर्षे देखभाल दुरूस्तीचे बंधन घातल्यामुळे संबंधित ठेकेदाराला जबाबदारीने काम करावे लागेल.- विवेक साळवे,अधीक्षक अभियंता, सा.बां.वि.