शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

आता बारावीच्या निकालसूत्राने उडविली विद्यार्थ्यांची झोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:10 IST

३०-३०-४० टक्क्यांचा फाॅर्म्यूला ठरला, ५ ऑगस्टपूर्वीच निकाल जाहीर होण्याचे संकेत अमरावती : शुक्रवारी दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता बारावीच्या ...

३०-३०-४० टक्क्यांचा फाॅर्म्यूला ठरला, ५ ऑगस्टपूर्वीच निकाल जाहीर होण्याचे संकेत

अमरावती : शुक्रवारी दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता बारावीच्या विद्यार्थ्यांनाही निकालाचे वेध लागले आहे. मात्र, दहावीप्रमाणेच बारावीच्या निकालासाठीही मागील वर्गाची कामगिरी लक्षात घेतली जाणार आहे. दहावीत मिळालेल्या गुणांना ३० टक्के, अकरावीत मिळालेल्या गुणांना ३० टक्के आणि बारावीतील कामगिरीसाठी ४० टक्के भारांक दिला जाणार आहे. मात्र, दहावीत काही कारणास्तव अनेकांना कमी गुण मिळाले. अकरावीत रेस्ट इअर मानले गेले. त्यामुळे या फाॅर्म्युल्याने बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये निकालाबाबत धाकधूक वाढली आहे. राज्य शिक्षण मंडळाने ५ ऑगस्टपूर्वीच निकाल जाहीर होण्याचे संकेत दिले आहेत.

कोट

विद्यार्थ्यांनी पुढील परीक्षांवर फोकस ठेवावा

आता निकालाचे नवीन सूत्र तयार आहे. पण दहावी, अकरावी आणि बारावीत त्याच विद्यार्थ्याचे प्रदर्शन वेगवेगळे असू शकते. दहावीत कमी गुण मिळवलेला विद्यार्थी बारावीत आवडीची शाखा घेऊन अधिक गुण मिळवू शकतो.

- नितीन तायडे, प्राध्यापक

कोट

शासनाच्या नियमानुसार बारावीचे मूल्यांकन होत आहे. पण काही कारणास्तव मागील वर्गात कमी गुण असलेल्या हुशार विद्यार्थ्यांच्या बारावीच्या निकालावर परिणाम होणार आहे. ही बाब यावेळी पालकांनी लक्षात घ्यावी.

-दीपक धोटे, प्राचार्य, ब्रजलाल बियाणी महाविद्यालय, अमरावती.

-----

कोट

३० टक्के सूत्र गणित बिघडविणार !

शिक्षकांनी प्रात्यक्षिक परीक्षा घेतली. अंतर्गत मूल्यमापन केले. पण दहावी, अकरावीचे गुण विचारात घेतले जाणार आहे. त्यामुळे मला निकालाविषयी धाकधूक वाटत आहे. कारण दहावीमध्ये कडक सेंटरवरून परीक्षा दिली होती.

- नेहा दिक्षीत, विद्यार्थिनी

दहावी आणि अकरावीचे गुण पकडून तुम्ही नक्कीच पास होणार, अशी खात्री शिक्षकांनी दिली आहे. पण थोडी काळजी वाटते. ज्यांनी अभ्यास केला नाही त्यांची मात्र मजा झाली. पास होण्याची गॅरंटी असूनही आनंद मात्र वाटत नाही.

- रितेश देशमुख, विद्यार्थी

-----------------

विभागात बारावीचे विद्यार्थी स्टेट बोर्ड १,३८,३६३

मुले: ७५०५९

मुली: ६३३०४