शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
3
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
4
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
5
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
6
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
7
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
8
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
9
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
10
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
11
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
13
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
14
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
15
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
16
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
17
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
18
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
19
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
20
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली

आता बारावीच्या निकालसूत्राने उडविली विद्यार्थ्यांची झोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:10 IST

३०-३०-४० टक्क्यांचा फाॅर्म्यूला ठरला, ५ ऑगस्टपूर्वीच निकाल जाहीर होण्याचे संकेत अमरावती : शुक्रवारी दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता बारावीच्या ...

३०-३०-४० टक्क्यांचा फाॅर्म्यूला ठरला, ५ ऑगस्टपूर्वीच निकाल जाहीर होण्याचे संकेत

अमरावती : शुक्रवारी दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता बारावीच्या विद्यार्थ्यांनाही निकालाचे वेध लागले आहे. मात्र, दहावीप्रमाणेच बारावीच्या निकालासाठीही मागील वर्गाची कामगिरी लक्षात घेतली जाणार आहे. दहावीत मिळालेल्या गुणांना ३० टक्के, अकरावीत मिळालेल्या गुणांना ३० टक्के आणि बारावीतील कामगिरीसाठी ४० टक्के भारांक दिला जाणार आहे. मात्र, दहावीत काही कारणास्तव अनेकांना कमी गुण मिळाले. अकरावीत रेस्ट इअर मानले गेले. त्यामुळे या फाॅर्म्युल्याने बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये निकालाबाबत धाकधूक वाढली आहे. राज्य शिक्षण मंडळाने ५ ऑगस्टपूर्वीच निकाल जाहीर होण्याचे संकेत दिले आहेत.

कोट

विद्यार्थ्यांनी पुढील परीक्षांवर फोकस ठेवावा

आता निकालाचे नवीन सूत्र तयार आहे. पण दहावी, अकरावी आणि बारावीत त्याच विद्यार्थ्याचे प्रदर्शन वेगवेगळे असू शकते. दहावीत कमी गुण मिळवलेला विद्यार्थी बारावीत आवडीची शाखा घेऊन अधिक गुण मिळवू शकतो.

- नितीन तायडे, प्राध्यापक

कोट

शासनाच्या नियमानुसार बारावीचे मूल्यांकन होत आहे. पण काही कारणास्तव मागील वर्गात कमी गुण असलेल्या हुशार विद्यार्थ्यांच्या बारावीच्या निकालावर परिणाम होणार आहे. ही बाब यावेळी पालकांनी लक्षात घ्यावी.

-दीपक धोटे, प्राचार्य, ब्रजलाल बियाणी महाविद्यालय, अमरावती.

-----

कोट

३० टक्के सूत्र गणित बिघडविणार !

शिक्षकांनी प्रात्यक्षिक परीक्षा घेतली. अंतर्गत मूल्यमापन केले. पण दहावी, अकरावीचे गुण विचारात घेतले जाणार आहे. त्यामुळे मला निकालाविषयी धाकधूक वाटत आहे. कारण दहावीमध्ये कडक सेंटरवरून परीक्षा दिली होती.

- नेहा दिक्षीत, विद्यार्थिनी

दहावी आणि अकरावीचे गुण पकडून तुम्ही नक्कीच पास होणार, अशी खात्री शिक्षकांनी दिली आहे. पण थोडी काळजी वाटते. ज्यांनी अभ्यास केला नाही त्यांची मात्र मजा झाली. पास होण्याची गॅरंटी असूनही आनंद मात्र वाटत नाही.

- रितेश देशमुख, विद्यार्थी

-----------------

विभागात बारावीचे विद्यार्थी स्टेट बोर्ड १,३८,३६३

मुले: ७५०५९

मुली: ६३३०४