शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

आता पावसाची नोंद होणार अपडेट

By admin | Updated: June 4, 2015 00:15 IST

एरवी पावसाळ्यातच पर्जन्यमानाची नोंद घेतली जाते. मात्र, आता नियमित वर्षभर पर्जन्यमान नोंदविले जाणार आहे.

९ जूनपासून वेबसाईटवर माहिती : मंडळ अधिकाऱ्यांवर जबाबदारीजितेंद्र दखने अमरावतीएरवी पावसाळ्यातच पर्जन्यमानाची नोंद घेतली जाते. मात्र, आता नियमित वर्षभर पर्जन्यमान नोंदविले जाणार आहे. याची जबाबदारी प्रत्येक मंडळ अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. कोणत्याही परिस्थितीत सकाळी ६.३० वाजता ही नोंद व्हायलाच हवी, असे बजावण्यात आले आहे. त्यामुळे आता राज्यातील सर्व ठिकाणचा पाऊस ९ जूनपासून निर्धारित संकेतस्थळांवर पहायला मिळणार आहे. सद्यस्थितीत पावसाळा सुरु झाल्यानंतर प्रत्येक तहसील कार्यालयातून सकाळी ८ वाजेपर्यंतची पावसाची आकडेवारी संकलित करून जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविली जाते. त्यानंतर तो डेटा शासनाकडे पाठविला जातो. परंतु आता ही माहिती शासकीय संकेतस्थळांकडे पाठविण्यासाठी पुणे येथील एनआयटी कार्यालयाकडे द्यावी लागेल. तेथून शासनाच्या संकेतस्थळावर प्रत्येक मंडळाच्या कार्यक्षेत्रानुसार ही माहिती प्रसिध्द केली जाणार आहे. ही माहिती एसएमएसच्या माध्यमातून दिली जाईल. फक्त पावसाळ्यासाठी ही यंत्रणा नसून वर्षभर पावसाची प्रत्येक दिवसाची नोंद ठेवली जाणार आहे, हे विशेष. यांच्यावर जबाबदारीप्रत्येक तहसीलचे तहसीलदार , मंडळ अधिकारी व तलाठी यांच्यावर जबाबदार मंडळ म्हणून काम सोपविले आहे. पर्जन्यमानाची नोंद आधीपासूनच घेतली जाते. संकलित करून ही माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविली जाते. आता वेबसाईट साठीही नोंद घ्यावी लागणार आहे. यामुळे प्रत्येक गावात पर्जन्यमानाबद्दल माहिती मिळणार आहे. पारदर्शकतेसाठी हा उपक्रम चांगला आहे.-विनोद अढाऊ , मंडळ अधिकारी, अंजनगाव सुर्जी