शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

आता पावसामुळे कानांना बुरशी, बॅक्टेरियाचा वाढला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:10 IST

वेदना अधिक होत असल्याने रुग्ण स्वत: डॉक्टरांकडे जातो. हा प्रकार थांबविण्यासाठी पावसात भिजू नये, यामुळे अशा प्रकारच्या आजाराला सहज ...

वेदना अधिक होत असल्याने रुग्ण स्वत: डॉक्टरांकडे जातो. हा प्रकार थांबविण्यासाठी पावसात भिजू नये, यामुळे अशा प्रकारच्या आजाराला सहज थांबविता येते. हा आजार म्युकरमायकोसिससारखा गंभी नसल्याचे कान, नाक, घसातज्ज्ञांनी सांगितले. मात्र, कानाच्या आतील पोकळ भागात बुरशी वाढल्यास खाज सुटते. तेव्हा कुठल्याही वस्तू कानात फिरविल्यास पडद्याला इजा होण्याची शक्यता असते. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. वारंवार कान फुटणाऱ्या आणि बुरशी होणाऱ्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार घेणे महत्त्वाचे ठरेल.

बॉक्स

ही घ्या काळजी

पावसाळ्यात डोके ओले झाल्यानंतर कानात पाणी जाते. कानात मळ असल्याने तेथे पाणी साचते. त्यापासून बुरशी तयार होऊन दुखने वाढते. यातून पिवळसर पाणी येऊ लागते. त्यावर उपाय म्हणून ओले झालेले डोके तत्काळ पुसून काढावे.

आंघोळीदरम्यान काहींना कानात पाणी टाकण्याची सवय जडलेली असते. ती धोक्याची ठरते. नैसर्गिकरीत्या कान स्वच्छ ठेवण्यासाठी आपले अवयव सक्षम असतात. मात्र पाणी टाकल्याने कानातील मळ निघतो, हा भ्रम अनेकांच्या मनात असतो.

--

पावसाळ्यात ओलाव्याचा परिणाम

१)दोन ऋतुच्या बदलाने कानात बुरशी वाढण्याचे प्रकार घडतात. पावसाळ्याच्या तोंडावर हा प्रकार प्रकर्षाने जाणवतो. यामुळे शक्यतो भिजताना कान सुरक्षित ठेवण्याची काळजी घ्यावी. शिवाय दमा आणि सर्दीचा आजार असलेले व्यक्ती ओल्यापासून दूर रहावे. खबरदारी हाच उत्तम उपाय आहे.

२)शुगर असलेल्या व्यक्तींना बुरशीजन्य आजाराची बाधा होण्याची भीती असते. तसेच कोविडमुळे रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्याने अशा आजाराची लक्षण दिसू शकतात. मात्र, यात घाबरण्यासारखे काहीच नाही. सर्दीदरम्यान जोराने शिंकू नये, यामुळे कानाच्या पडद्याला धोका वाढतो.

कोट

पावसाळ्यात डोके ओले होतच असते. त्यापासून फारच तर सर्दी, पडसा होऊ शकतो. मात्र, म्युकरमायकोसिसचा धोका नाही. त्यामुळे घाबरण्याचे काहीच कारण नाही. मात्र, ओले झाल्यानंतर डोक तत्काळ पुसून काढण्याची तसदी घ्यावी.

- डॉ. के.बी. देशमुख,जिल्हा सामान्य रुग्णालय

ज्यांना कानाचे आजार आहे अशांना बुरशीजन्य विकाराचा धोका असतो. मधुमेहींनाही बुरशीजन्य आजाराचा धोका असतो. कानात कापसाचे बोळे लावावे. थंड हवेपासून बचाव करावा. सर्दी झाल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावा.

- डॉ. गणेश काळे,