शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
3
“बेस्ट निवडणूक बॅलेट पेपरवर, तरी ठाकरे ब्रँडचा बॅन्ड वाजला, मुंबईकरांनी…”; कुणी केली टीका?
4
Airtel चा ग्राहकांना धक्का! सर्वात स्वस्त प्लान बंद, आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार
5
IT सेक्टर धोक्यात; ८० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले, नवीन भरतीही कमी झाले; कारण...
6
Donald Trump Tariff On India: ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
7
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
8
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
9
मुंबई महापालिकेची रंगीत तालीम! ठाकरे ब्रँडची ‘बेस्ट’ युती; ‘असा’ फिरला गेम, नेमके काय घडलं?
10
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
11
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
12
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
13
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
14
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
15
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
16
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
17
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
18
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
19
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
20
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना

आता पावसामुळे कानांना बुरशी, बॅक्टेरियाचा वाढला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:10 IST

वेदना अधिक होत असल्याने रुग्ण स्वत: डॉक्टरांकडे जातो. हा प्रकार थांबविण्यासाठी पावसात भिजू नये, यामुळे अशा प्रकारच्या आजाराला सहज ...

वेदना अधिक होत असल्याने रुग्ण स्वत: डॉक्टरांकडे जातो. हा प्रकार थांबविण्यासाठी पावसात भिजू नये, यामुळे अशा प्रकारच्या आजाराला सहज थांबविता येते. हा आजार म्युकरमायकोसिससारखा गंभी नसल्याचे कान, नाक, घसातज्ज्ञांनी सांगितले. मात्र, कानाच्या आतील पोकळ भागात बुरशी वाढल्यास खाज सुटते. तेव्हा कुठल्याही वस्तू कानात फिरविल्यास पडद्याला इजा होण्याची शक्यता असते. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. वारंवार कान फुटणाऱ्या आणि बुरशी होणाऱ्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार घेणे महत्त्वाचे ठरेल.

बॉक्स

ही घ्या काळजी

पावसाळ्यात डोके ओले झाल्यानंतर कानात पाणी जाते. कानात मळ असल्याने तेथे पाणी साचते. त्यापासून बुरशी तयार होऊन दुखने वाढते. यातून पिवळसर पाणी येऊ लागते. त्यावर उपाय म्हणून ओले झालेले डोके तत्काळ पुसून काढावे.

आंघोळीदरम्यान काहींना कानात पाणी टाकण्याची सवय जडलेली असते. ती धोक्याची ठरते. नैसर्गिकरीत्या कान स्वच्छ ठेवण्यासाठी आपले अवयव सक्षम असतात. मात्र पाणी टाकल्याने कानातील मळ निघतो, हा भ्रम अनेकांच्या मनात असतो.

--

पावसाळ्यात ओलाव्याचा परिणाम

१)दोन ऋतुच्या बदलाने कानात बुरशी वाढण्याचे प्रकार घडतात. पावसाळ्याच्या तोंडावर हा प्रकार प्रकर्षाने जाणवतो. यामुळे शक्यतो भिजताना कान सुरक्षित ठेवण्याची काळजी घ्यावी. शिवाय दमा आणि सर्दीचा आजार असलेले व्यक्ती ओल्यापासून दूर रहावे. खबरदारी हाच उत्तम उपाय आहे.

२)शुगर असलेल्या व्यक्तींना बुरशीजन्य आजाराची बाधा होण्याची भीती असते. तसेच कोविडमुळे रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्याने अशा आजाराची लक्षण दिसू शकतात. मात्र, यात घाबरण्यासारखे काहीच नाही. सर्दीदरम्यान जोराने शिंकू नये, यामुळे कानाच्या पडद्याला धोका वाढतो.

कोट

पावसाळ्यात डोके ओले होतच असते. त्यापासून फारच तर सर्दी, पडसा होऊ शकतो. मात्र, म्युकरमायकोसिसचा धोका नाही. त्यामुळे घाबरण्याचे काहीच कारण नाही. मात्र, ओले झाल्यानंतर डोक तत्काळ पुसून काढण्याची तसदी घ्यावी.

- डॉ. के.बी. देशमुख,जिल्हा सामान्य रुग्णालय

ज्यांना कानाचे आजार आहे अशांना बुरशीजन्य विकाराचा धोका असतो. मधुमेहींनाही बुरशीजन्य आजाराचा धोका असतो. कानात कापसाचे बोळे लावावे. थंड हवेपासून बचाव करावा. सर्दी झाल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावा.

- डॉ. गणेश काळे,