शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

आता कैद्यांनाही मांडता येणार मनातील व्यथा !

By admin | Updated: September 2, 2016 00:11 IST

उत्तुंग चार भिंतींच्या आत सूर्योदय ते सूर्यास्त अशी दिनचर्या असलेल्या कैद्यांना आता आपल्या व्यथा मांडता येणार आहेत.

पाच समस्यांवर मंथन : अमरावती कारागृहात बंदीसुधार अभियान प्रारंभअमरावती : उत्तुंग चार भिंतींच्या आत सूर्योदय ते सूर्यास्त अशी दिनचर्या असलेल्या कैद्यांना आता आपल्या व्यथा मांडता येणार आहेत. याच पार्श्वभूमिवर अमरावती मध्यवर्ती कारागृहात बंदीसुधार अभियानाला प्रारंभ करण्यात आला आहे. सोमवारी कैद्यांनी मांडलेल्या व्यथांनी कारागृहाच्या भिंती देखील द्रवल्या.अमरावती मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक भाईदास ढोले यांनी बंदीसुधारणा व पुनर्वसनांतर्गत विविध सामाजिक संघटना, महिला व बालकल्याण विभागाच्या सहकार्याने कैद्यांचे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे पाषाण भिंतींच्या आत हातून कळत, नकळत झालेल्या चुकांचे प्रायश्चित शिक्षेच्या रुपात भोगत असलेल्या कैद्यांना त्यांच्या व्यथा, वेदना मांडण्याची संधी बंदीसुधार अभियानातून मिळाली आहे. खरे तर कारागृहातील दिनचर्या ठरलेलीच. परंतु सामाजिक जाण असलेले अधिकारी असले की, वर्षानुवर्षे खितपत पडलेल्या समस्या, प्रश्न क्षणात मार्गी लावता येतात. याची प्रचिती कारागृह अधीक्षक ढोले यांनी बंदीसुधार अभियानामुळे आली. सोमवारी पार पडलेल्या कार्यशाळेत कैद्यांना जेल प्रशासनाने पाच विषयांवर बोलते केले. यात बंदीसमस्या, कारागृह स्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती अभियान, मानसिक रुग्ण असलेल्या कैद्यांचे सर्वोच्च व उच्च न्यायालयात अपील तसेच वैद्यकीय उपचार या विषयांचा समावेश होता. अभियानात सुमारे ६०० कैद्यांनी सहभाग घेतला. पहिल्यांदाच कैद्यांना त्यांच्या मनात दडलेल्या भावना मांडण्याची संधी मिळाल्याने अनेक कैदी गहिवरून गेले होते. एरवी जेलर दंडुक्याचा धाक दाखवित कारागृहात नियमांचे धडे देत असतात. कैद्यांना त्याची सवय झाली असते. या चाकोरीबद्ध जीवनात अचानक कैद्यांना त्यांच्या समस्या, प्रश्न मांडण्याची संधी दिल्याने कैद्यांना आश्चर्य तर वाटलेच पण सुखद धक्काही बसला. कारागृहातील खुल्या पटांगणात एकत्र येऊन ‘मनातील व्यथा नि:संकोचपणे मांडा’, असे कारागृह अधीक्षक ढोले यांनी सांगताच अनेकांना गहिवरून आले. हळूहळू कैद्यांच्या मनातील भीती दूर झाली. बहुतांश कैद्यांनी नातेवाईकांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. मनोरुग्ण कैद्यांनी सर्वोच्च व उच्च न्यायालयात अपील दाखल करण्याबाबतची व्यथा मांडली. कारागृहात मनोरुग्ण कैद्यांना वेगळ्या बराकीत ठेवले जाते. मात्र, कारागृह अधीक्षकांनी मनोरुग्ण कैद्यांच्याही समस्या ऐकून घेतल्यात. मनोरूग्ण कैदी देखील माणसेच आहेत. त्यामुळे त्यांच्या मदतीसाठी कारागृह प्रशासन सदैव तत्पर राहिल, असे अभिवचन त्यांनी कैद्यांना दिले. कैद्यांचे प्रश्न, समस्या खुल्या मनाने कारागृह प्रशासन ऐकत असल्याने अनेक बंदीजनांच्या चेहऱ्यावर वेगळा आनंद झळकला. दरम्यान चार कैद्यांनी व्यसनमुक्तीचा निर्धार केला. शिक्षा पूर्ण झाल्यानंतर समाजात परत जाताना गुन्हेगार आणि व्यसनाचा कलंक पुसून टाकण्याची शपथ चार बंद्यांनी घेतली. या अभिनव कार्यक्रमाला कारागृह अधीक्षक भाईदास ढोले, महिला व बालकल्याण अधिकारी चवरे, वऱ्हाड संस्थेचे नागदिवे, प्रमोद मेश्राम, अवेअरनेस संस्थेचे अमित शहाळकर, वरिष्ठ तुरुंगाधिकारी अशोक जाधव, मंडळ तुरूंगाधिकारी सदांशिव, मोडकर, सुभेदार तिवस्कर, पांडे, सांस्कृतिक कार्यक्रम अधिकारी भूषण कांबळे, अंमलदार दाबेराव, वैद्यकीय अधिकारी गणोरकर आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.