शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
2
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
3
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
4
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
5
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
6
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
7
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
8
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
9
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
10
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
11
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
12
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
13
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
14
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
15
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
16
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
17
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
18
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
19
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
20
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

आता पोलीस बंदोबस्तात काठेवाडी गुरांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 22:52 IST

जंगलाचे संरक्षण आणि राखीव वनांत काठेवाडी गुरांकडून होणारी अवैध चराई रोखण्यासाठी आता पोलीस बंदोबस्तात काठेवाडींविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा ंिनर्णय वनविभागाने घेतला आहे. त्यासाठी उपवनसंरक्षक हेमंत मिणा यांनी पोलीस आयुक्तांकडे बंदोबस्त मिळण्यासाठी पत्रव्यवहार चालविला आहे.

ठळक मुद्देवनविभागाचे कठोर पाऊल : राखीव वनांत अवैध चराई रोखण्यासाठी उपाययोजना

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जंगलाचे संरक्षण आणि राखीव वनांत काठेवाडी गुरांकडून होणारी अवैध चराई रोखण्यासाठी आता पोलीस बंदोबस्तात काठेवाडींविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा ंिनर्णय वनविभागाने घेतला आहे. त्यासाठी उपवनसंरक्षक हेमंत मिणा यांनी पोलीस आयुक्तांकडे बंदोबस्त मिळण्यासाठी पत्रव्यवहार चालविला आहे.शहरानजीक राखीव वनांना काठेवाडी पशुपालक, मेंढपाळांनी लक्ष्य केले आहे. त्याचवेळी राज्य शासनाच्या १३ कोटी वृक्षलागवड उपक्रमांतर्गत या राखीव वनांत मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्यात आली आहे. काठेवाडी गुरांच्या चराईमुळे राखीव वनांमध्ये लावण्यात आलेल्या रोपांना हानी पोहोचत आहे तसेच राखीव वनांतील गवतदेखील काठेवाडी गुरे फस्त करीत आहेत. काठेवाडी गुरे, तर धनगर मेंढ्यांसह खासगी जागेवर राहुटी करून वास्तव्यास आहेत. यात अंजनगाव बारी, कोंडेश्वर, चिरोडी, पोहरा, बडनेरा, अमरावती व भानखेडा आदी जंगलशेजारील गावांचा समावेश आहे. गत दोन दिवसांपासून डीएफओ मीणा यांनी अवैध चराई रोखण्यासाठी कारवाईचा बडगा उगारला. शनिवारी पोहरा जंगलात दोन काठेवाडी गुरे ताब्यात घेण्याची कारवाई करण्यात आली. मात्र, वनविभागाकडे तोकडे मनुष्यबळ असल्याने काठेवाडींना अवैध गुरे चराईपासून रोखणे हे आव्हानच आहे. त्यामुळे पोलीस बंदोबस्तात चराई करणाऱ्यांविरोधात कारवाईचा निर्णय घेतला आहे. वनकर्मचारी आणि पोलीस संयुक्तपणे राखीव वनांच्या संरक्षणासाठी परिसर पिंजून काढणार आहेत.इन कॅमेरा होणार कारवाईराखीख वने आणि अतिसंरक्षित वनक्षेत्रात काठेवाडी गुरे आढळल्यास इन कॅमेरा कारवाई केली जाणार आहे. अगोदर ड्रोन कॅमेºयांनी अवैध चराईचे छायाचित्रण घेतले जाईल. त्यानंतर काठेवाडी गुरे, मेंढ्या ताब्यात घेऊन पशुमालकांवर वनसंवर्धन अधिनियमानुसार कारवाई केली जाणार आहे. उपवनसंरक्षक, सहायक वनसंरक्षक, वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल आणि वनरक्षक अशी फळी अवैध चराई रोखण्यासाठी कामी लागली आहे.राखीव वनांत काठेवाडी गुरे, मेंढ्यांच्या अवैध चराईमुळे बुलडाणा, वाशिम जिल्ह्यातील वनक्षेत्र, वनसंवर्धनाचे काय हाल झाले, हे सर्वांना माहिती आहे. रोजगार मिळविणे आणि व्यवसाय करण्यास कोणालाही मनाई नाही. मात्र, जंगल सुरक्षित ठेवण्यासाठी कठोर उपाययोजना करणे ही काळाची गरज आहे.- हेमंत मिणाउपवनसंरक्षक, अमरावती.