शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
2
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
3
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
4
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
5
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
6
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
7
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
8
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
9
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
10
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
11
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
12
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
13
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
14
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
15
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
16
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
17
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
18
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
19
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
20
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!

आता पोलीस बंदोबस्तात काठेवाडी गुरांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 22:52 IST

जंगलाचे संरक्षण आणि राखीव वनांत काठेवाडी गुरांकडून होणारी अवैध चराई रोखण्यासाठी आता पोलीस बंदोबस्तात काठेवाडींविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा ंिनर्णय वनविभागाने घेतला आहे. त्यासाठी उपवनसंरक्षक हेमंत मिणा यांनी पोलीस आयुक्तांकडे बंदोबस्त मिळण्यासाठी पत्रव्यवहार चालविला आहे.

ठळक मुद्देवनविभागाचे कठोर पाऊल : राखीव वनांत अवैध चराई रोखण्यासाठी उपाययोजना

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जंगलाचे संरक्षण आणि राखीव वनांत काठेवाडी गुरांकडून होणारी अवैध चराई रोखण्यासाठी आता पोलीस बंदोबस्तात काठेवाडींविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा ंिनर्णय वनविभागाने घेतला आहे. त्यासाठी उपवनसंरक्षक हेमंत मिणा यांनी पोलीस आयुक्तांकडे बंदोबस्त मिळण्यासाठी पत्रव्यवहार चालविला आहे.शहरानजीक राखीव वनांना काठेवाडी पशुपालक, मेंढपाळांनी लक्ष्य केले आहे. त्याचवेळी राज्य शासनाच्या १३ कोटी वृक्षलागवड उपक्रमांतर्गत या राखीव वनांत मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्यात आली आहे. काठेवाडी गुरांच्या चराईमुळे राखीव वनांमध्ये लावण्यात आलेल्या रोपांना हानी पोहोचत आहे तसेच राखीव वनांतील गवतदेखील काठेवाडी गुरे फस्त करीत आहेत. काठेवाडी गुरे, तर धनगर मेंढ्यांसह खासगी जागेवर राहुटी करून वास्तव्यास आहेत. यात अंजनगाव बारी, कोंडेश्वर, चिरोडी, पोहरा, बडनेरा, अमरावती व भानखेडा आदी जंगलशेजारील गावांचा समावेश आहे. गत दोन दिवसांपासून डीएफओ मीणा यांनी अवैध चराई रोखण्यासाठी कारवाईचा बडगा उगारला. शनिवारी पोहरा जंगलात दोन काठेवाडी गुरे ताब्यात घेण्याची कारवाई करण्यात आली. मात्र, वनविभागाकडे तोकडे मनुष्यबळ असल्याने काठेवाडींना अवैध गुरे चराईपासून रोखणे हे आव्हानच आहे. त्यामुळे पोलीस बंदोबस्तात चराई करणाऱ्यांविरोधात कारवाईचा निर्णय घेतला आहे. वनकर्मचारी आणि पोलीस संयुक्तपणे राखीव वनांच्या संरक्षणासाठी परिसर पिंजून काढणार आहेत.इन कॅमेरा होणार कारवाईराखीख वने आणि अतिसंरक्षित वनक्षेत्रात काठेवाडी गुरे आढळल्यास इन कॅमेरा कारवाई केली जाणार आहे. अगोदर ड्रोन कॅमेºयांनी अवैध चराईचे छायाचित्रण घेतले जाईल. त्यानंतर काठेवाडी गुरे, मेंढ्या ताब्यात घेऊन पशुमालकांवर वनसंवर्धन अधिनियमानुसार कारवाई केली जाणार आहे. उपवनसंरक्षक, सहायक वनसंरक्षक, वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल आणि वनरक्षक अशी फळी अवैध चराई रोखण्यासाठी कामी लागली आहे.राखीव वनांत काठेवाडी गुरे, मेंढ्यांच्या अवैध चराईमुळे बुलडाणा, वाशिम जिल्ह्यातील वनक्षेत्र, वनसंवर्धनाचे काय हाल झाले, हे सर्वांना माहिती आहे. रोजगार मिळविणे आणि व्यवसाय करण्यास कोणालाही मनाई नाही. मात्र, जंगल सुरक्षित ठेवण्यासाठी कठोर उपाययोजना करणे ही काळाची गरज आहे.- हेमंत मिणाउपवनसंरक्षक, अमरावती.