शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
3
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
4
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
5
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
6
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
7
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
8
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
9
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
10
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
11
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
12
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
13
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
14
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
15
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
16
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
17
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
20
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   

आता पोलीस बंदोबस्तात काठेवाडी गुरांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 22:52 IST

जंगलाचे संरक्षण आणि राखीव वनांत काठेवाडी गुरांकडून होणारी अवैध चराई रोखण्यासाठी आता पोलीस बंदोबस्तात काठेवाडींविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा ंिनर्णय वनविभागाने घेतला आहे. त्यासाठी उपवनसंरक्षक हेमंत मिणा यांनी पोलीस आयुक्तांकडे बंदोबस्त मिळण्यासाठी पत्रव्यवहार चालविला आहे.

ठळक मुद्देवनविभागाचे कठोर पाऊल : राखीव वनांत अवैध चराई रोखण्यासाठी उपाययोजना

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जंगलाचे संरक्षण आणि राखीव वनांत काठेवाडी गुरांकडून होणारी अवैध चराई रोखण्यासाठी आता पोलीस बंदोबस्तात काठेवाडींविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा ंिनर्णय वनविभागाने घेतला आहे. त्यासाठी उपवनसंरक्षक हेमंत मिणा यांनी पोलीस आयुक्तांकडे बंदोबस्त मिळण्यासाठी पत्रव्यवहार चालविला आहे.शहरानजीक राखीव वनांना काठेवाडी पशुपालक, मेंढपाळांनी लक्ष्य केले आहे. त्याचवेळी राज्य शासनाच्या १३ कोटी वृक्षलागवड उपक्रमांतर्गत या राखीव वनांत मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्यात आली आहे. काठेवाडी गुरांच्या चराईमुळे राखीव वनांमध्ये लावण्यात आलेल्या रोपांना हानी पोहोचत आहे तसेच राखीव वनांतील गवतदेखील काठेवाडी गुरे फस्त करीत आहेत. काठेवाडी गुरे, तर धनगर मेंढ्यांसह खासगी जागेवर राहुटी करून वास्तव्यास आहेत. यात अंजनगाव बारी, कोंडेश्वर, चिरोडी, पोहरा, बडनेरा, अमरावती व भानखेडा आदी जंगलशेजारील गावांचा समावेश आहे. गत दोन दिवसांपासून डीएफओ मीणा यांनी अवैध चराई रोखण्यासाठी कारवाईचा बडगा उगारला. शनिवारी पोहरा जंगलात दोन काठेवाडी गुरे ताब्यात घेण्याची कारवाई करण्यात आली. मात्र, वनविभागाकडे तोकडे मनुष्यबळ असल्याने काठेवाडींना अवैध गुरे चराईपासून रोखणे हे आव्हानच आहे. त्यामुळे पोलीस बंदोबस्तात चराई करणाऱ्यांविरोधात कारवाईचा निर्णय घेतला आहे. वनकर्मचारी आणि पोलीस संयुक्तपणे राखीव वनांच्या संरक्षणासाठी परिसर पिंजून काढणार आहेत.इन कॅमेरा होणार कारवाईराखीख वने आणि अतिसंरक्षित वनक्षेत्रात काठेवाडी गुरे आढळल्यास इन कॅमेरा कारवाई केली जाणार आहे. अगोदर ड्रोन कॅमेºयांनी अवैध चराईचे छायाचित्रण घेतले जाईल. त्यानंतर काठेवाडी गुरे, मेंढ्या ताब्यात घेऊन पशुमालकांवर वनसंवर्धन अधिनियमानुसार कारवाई केली जाणार आहे. उपवनसंरक्षक, सहायक वनसंरक्षक, वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल आणि वनरक्षक अशी फळी अवैध चराई रोखण्यासाठी कामी लागली आहे.राखीव वनांत काठेवाडी गुरे, मेंढ्यांच्या अवैध चराईमुळे बुलडाणा, वाशिम जिल्ह्यातील वनक्षेत्र, वनसंवर्धनाचे काय हाल झाले, हे सर्वांना माहिती आहे. रोजगार मिळविणे आणि व्यवसाय करण्यास कोणालाही मनाई नाही. मात्र, जंगल सुरक्षित ठेवण्यासाठी कठोर उपाययोजना करणे ही काळाची गरज आहे.- हेमंत मिणाउपवनसंरक्षक, अमरावती.