शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

महिला बालकल्याणची आता मिशन वात्सल्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:27 IST

अमरावती : कोरोनाचा प्रादुर्भाव दोन वर्षापासून मोठ्या प्रमाणात जाणवला. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत अनेक नागरिकांचे निधन झाले. त्यासाठी ...

अमरावती : कोरोनाचा प्रादुर्भाव दोन वर्षापासून मोठ्या प्रमाणात जाणवला. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत अनेक नागरिकांचे निधन झाले. त्यासाठी शासन आपल्या दारी या संकल्पनेनुसार मिशन वात्सल्य ही योजना महिला व बालकल्याण विभागामार्फत जिल्ह्यात राबविली जाणार आहे.

या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामस्तरीय व वार्डस्तरीय पथकांनी स्थापना करण्यात आली आहे. कोरोनामुळे बहुतांश ठिकाणी एकाच कुटुंबातील आई आणि वडील अशा दोन्ही पालकांचे निधन झाल्याने ० ते १८ वयोगटातील बालके अनाथ झालीत. घरातील कर्त्या पुरुषाचे निधन होऊन अनेक महिला विधवा झाल्या आहेत. कोविडमुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देऊन त्यांचे यथायोग्य संगोपन करणे तसेच घरातील कर्त्या पुरुषाचे निधन होऊन एकल विधवा महिलांचे योग्य पुनर्वसन करून त्यांचा आर्थिक व सामाजिक विकास साधून भविष्याविषयी त्यांना आश्वस्त करणे आणि त्यांंना समाजात मानाचे स्थान प्राप्त करून देणे हे शासनाचे नैतिक कर्तव्य आहे. दोन्ही पालक गमावून निधन झालेल्या बालकांना एकरकमी ५ लाख अर्थसहाय्य उपलब्ध करून देणे तसेच बालसंगोपन योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी शासनास्तरावर प्रयत्न सुरू आहेत. एकल विधवा महिला आणि अनाथ बालकांच्या कुटुंबीयांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या पुनर्वसनासाठी शासनाकडून योजनेचा लाभ संबंधितांना देण्यासाठी शासन आपल्या दारी या संकल्पनेवर आधारित मिशन वात्सल्य उपक्रम आहे.

बाॅक्स

तालुकास्तरावर समिती गठित

मिशन वात्सल्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तालुकास्तरावर समन्वय समिती गठित करण्यात येत आहे. तहसीलदार हे समितीचे अध्यक्ष आहेत. बीडीओ, बीईओ, तालुका विधी सेवा प्राधिकरण, नगर परिषद सीईओ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, टीएमओ, विस्तार अधिकारी, समाज कल्याण, पशुसंवर्धन अधिकारी प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास, तालुका संरक्षण अधिकारी, विधवा महिला व अनाथ बालकांचे पुनर्वसन क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंमसेवी संस्थेचे प्रतिनिधी हे सदस्य, तर बालविकास प्रकल्प अधिकारी सचिव राहणार आहेत.

बॉक्स

विविध योजनेतून लाभ

कुटुंब निवृत्तीवेतन योजना, शिधापत्रिका, वारस, प्रमाणपत्र, एलआयसी किंवा इतर विमा पॉलिसीचा लाभ, बँक खाते, आधार कार्ड, जन्म-मृत्यू दाखला, जातीचे दाखले, मालमत्ता विषयक हक्क, संजय गांधी निराधार योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, अनाथ बालकांचे शालेय प्रवेश फी, घरकुल आदी योजनांचा लाभ मिळून दिला जाणार आहे.