शहरं
Join us  
Trending Stories
1
AirStrike on Pakistan: मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
3
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
6
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
7
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
8
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
9
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
10
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
11
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
12
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
13
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
14
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
15
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
16
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
17
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
18
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
19
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
20
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  

महिला बालकल्याणची आता मिशन वात्सल्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:27 IST

अमरावती : कोरोनाचा प्रादुर्भाव दोन वर्षापासून मोठ्या प्रमाणात जाणवला. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत अनेक नागरिकांचे निधन झाले. त्यासाठी ...

अमरावती : कोरोनाचा प्रादुर्भाव दोन वर्षापासून मोठ्या प्रमाणात जाणवला. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत अनेक नागरिकांचे निधन झाले. त्यासाठी शासन आपल्या दारी या संकल्पनेनुसार मिशन वात्सल्य ही योजना महिला व बालकल्याण विभागामार्फत जिल्ह्यात राबविली जाणार आहे.

या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामस्तरीय व वार्डस्तरीय पथकांनी स्थापना करण्यात आली आहे. कोरोनामुळे बहुतांश ठिकाणी एकाच कुटुंबातील आई आणि वडील अशा दोन्ही पालकांचे निधन झाल्याने ० ते १८ वयोगटातील बालके अनाथ झालीत. घरातील कर्त्या पुरुषाचे निधन होऊन अनेक महिला विधवा झाल्या आहेत. कोविडमुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देऊन त्यांचे यथायोग्य संगोपन करणे तसेच घरातील कर्त्या पुरुषाचे निधन होऊन एकल विधवा महिलांचे योग्य पुनर्वसन करून त्यांचा आर्थिक व सामाजिक विकास साधून भविष्याविषयी त्यांना आश्वस्त करणे आणि त्यांंना समाजात मानाचे स्थान प्राप्त करून देणे हे शासनाचे नैतिक कर्तव्य आहे. दोन्ही पालक गमावून निधन झालेल्या बालकांना एकरकमी ५ लाख अर्थसहाय्य उपलब्ध करून देणे तसेच बालसंगोपन योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी शासनास्तरावर प्रयत्न सुरू आहेत. एकल विधवा महिला आणि अनाथ बालकांच्या कुटुंबीयांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या पुनर्वसनासाठी शासनाकडून योजनेचा लाभ संबंधितांना देण्यासाठी शासन आपल्या दारी या संकल्पनेवर आधारित मिशन वात्सल्य उपक्रम आहे.

बाॅक्स

तालुकास्तरावर समिती गठित

मिशन वात्सल्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तालुकास्तरावर समन्वय समिती गठित करण्यात येत आहे. तहसीलदार हे समितीचे अध्यक्ष आहेत. बीडीओ, बीईओ, तालुका विधी सेवा प्राधिकरण, नगर परिषद सीईओ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, टीएमओ, विस्तार अधिकारी, समाज कल्याण, पशुसंवर्धन अधिकारी प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास, तालुका संरक्षण अधिकारी, विधवा महिला व अनाथ बालकांचे पुनर्वसन क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंमसेवी संस्थेचे प्रतिनिधी हे सदस्य, तर बालविकास प्रकल्प अधिकारी सचिव राहणार आहेत.

बॉक्स

विविध योजनेतून लाभ

कुटुंब निवृत्तीवेतन योजना, शिधापत्रिका, वारस, प्रमाणपत्र, एलआयसी किंवा इतर विमा पॉलिसीचा लाभ, बँक खाते, आधार कार्ड, जन्म-मृत्यू दाखला, जातीचे दाखले, मालमत्ता विषयक हक्क, संजय गांधी निराधार योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, अनाथ बालकांचे शालेय प्रवेश फी, घरकुल आदी योजनांचा लाभ मिळून दिला जाणार आहे.