शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

महिला बालकल्याणची आता मिशन वात्सल्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:27 IST

अमरावती : कोरोनाचा प्रादुर्भाव दोन वर्षापासून मोठ्या प्रमाणात जाणवला. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत अनेक नागरिकांचे निधन झाले. त्यासाठी ...

अमरावती : कोरोनाचा प्रादुर्भाव दोन वर्षापासून मोठ्या प्रमाणात जाणवला. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत अनेक नागरिकांचे निधन झाले. त्यासाठी शासन आपल्या दारी या संकल्पनेनुसार मिशन वात्सल्य ही योजना महिला व बालकल्याण विभागामार्फत जिल्ह्यात राबविली जाणार आहे.

या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामस्तरीय व वार्डस्तरीय पथकांनी स्थापना करण्यात आली आहे. कोरोनामुळे बहुतांश ठिकाणी एकाच कुटुंबातील आई आणि वडील अशा दोन्ही पालकांचे निधन झाल्याने ० ते १८ वयोगटातील बालके अनाथ झालीत. घरातील कर्त्या पुरुषाचे निधन होऊन अनेक महिला विधवा झाल्या आहेत. कोविडमुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देऊन त्यांचे यथायोग्य संगोपन करणे तसेच घरातील कर्त्या पुरुषाचे निधन होऊन एकल विधवा महिलांचे योग्य पुनर्वसन करून त्यांचा आर्थिक व सामाजिक विकास साधून भविष्याविषयी त्यांना आश्वस्त करणे आणि त्यांंना समाजात मानाचे स्थान प्राप्त करून देणे हे शासनाचे नैतिक कर्तव्य आहे. दोन्ही पालक गमावून निधन झालेल्या बालकांना एकरकमी ५ लाख अर्थसहाय्य उपलब्ध करून देणे तसेच बालसंगोपन योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी शासनास्तरावर प्रयत्न सुरू आहेत. एकल विधवा महिला आणि अनाथ बालकांच्या कुटुंबीयांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या पुनर्वसनासाठी शासनाकडून योजनेचा लाभ संबंधितांना देण्यासाठी शासन आपल्या दारी या संकल्पनेवर आधारित मिशन वात्सल्य उपक्रम आहे.

बाॅक्स

तालुकास्तरावर समिती गठित

मिशन वात्सल्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तालुकास्तरावर समन्वय समिती गठित करण्यात येत आहे. तहसीलदार हे समितीचे अध्यक्ष आहेत. बीडीओ, बीईओ, तालुका विधी सेवा प्राधिकरण, नगर परिषद सीईओ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, टीएमओ, विस्तार अधिकारी, समाज कल्याण, पशुसंवर्धन अधिकारी प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास, तालुका संरक्षण अधिकारी, विधवा महिला व अनाथ बालकांचे पुनर्वसन क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंमसेवी संस्थेचे प्रतिनिधी हे सदस्य, तर बालविकास प्रकल्प अधिकारी सचिव राहणार आहेत.

बॉक्स

विविध योजनेतून लाभ

कुटुंब निवृत्तीवेतन योजना, शिधापत्रिका, वारस, प्रमाणपत्र, एलआयसी किंवा इतर विमा पॉलिसीचा लाभ, बँक खाते, आधार कार्ड, जन्म-मृत्यू दाखला, जातीचे दाखले, मालमत्ता विषयक हक्क, संजय गांधी निराधार योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, अनाथ बालकांचे शालेय प्रवेश फी, घरकुल आदी योजनांचा लाभ मिळून दिला जाणार आहे.