शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
3
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
4
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
5
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
6
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
7
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
8
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
9
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
10
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
11
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
12
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
13
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
14
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
15
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
16
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
17
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
18
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
19
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
20
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  

आता छोटे व्यावसायिकही मालगाडीने पाठविणार माल

By admin | Updated: April 18, 2016 00:06 IST

छोट्या व्यावसायिकांना थेट मालगाडीने माल पाठविता यावा, यासाठी मध्य रेल्वे भुसावळ विभागाने ही सोय उपलब्ध करून दिली आहे.

३१ मे पर्यंत बुकिंग : उत्पन्नवाढीसाठी रेल्वेचा पुढाकारअमरावती : छोट्या व्यावसायिकांना थेट मालगाडीने माल पाठविता यावा, यासाठी मध्य रेल्वे भुसावळ विभागाने ही सोय उपलब्ध करून दिली आहे. त्याकरिता देशाच्या कानाकोपऱ्यात माल पाठविण्यासाठी ३१ मेपर्यंत बुकींग करणे अनिवार्य असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे. उत्पन्न वाढीसाठी हा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.रेल्वेत मालगाडीने माल पाठविण्याकरिता मोठे व्यापारी धजावतात. मात्र मालगाडीने माल पाठवायचे झाल्यास लहान, सहान व्यावसायिक पुढाकार घेत नाही. परंतु आता छोट्या व्यावसायिकांना व्यापार वृद्धिंगत करण्याची संधी रेल्वे प्रशासनाने उपलब्ध करून दिली आहे. मालगाडीच्या एका वॅगनमध्ये ६४ टन माल पाठविता येतो. त्यानुसार ३१ मेपर्यंत माल, बूक करण्यात आल्यास तो व्यावसायिकांना ठरावीक ठिकाणी पाठविता येईल. त्याकरिता संपूर्ण मालगाडी बूक करण्याची गरज भासणार नाही, असे रेल्वे विभागाने स्पष्ट केले आहे. रेल्वे सेवेशी लहान, सहान व्यावसायिक जोडलो जावेत, हा यामागील मुख्य उद्देश असून भुसावळ विभागातून माल पाठविण्यासाठी ३१ मेपर्यंत माल पाठविण्यासाठी बुकिंग झाल्यास संबंधित व्यापाऱ्यांचा माल निश्चित ठिकाणी रेल्वे पोहोचवेल. या उपक्रमाचा मुख्य उद्देश केवळ रेल्वे प्रशासनाचे उत्पन्नात वाढ करणे होय. छोट्या व्यावसायिकांना रेल्वेने मालवाहतूक करणे फारच त्रासदायक राहते. कारण संपूर्ण मालगाडी रॅक बुकिंग करणे छोट्या व्यापाऱ्यांना परवडणारे ठरत नाही. मात्र रेल्वेने छोट्या व्यापाऱ्यांचा माल निश्चित ठिकाणी पाठविण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.रेल्वे प्रशासनाने उत्पन्न वाढीसाठी रिकाम्या जागांवर बीओटी तत्त्वावर व्यापारी संकुलाची निर्मिती करण्याचा संकल्प घेतला आहे. रेल्वेत अनेक उपक्रम राबवून तिजोरी भरली जात असताना मालवाहतुकीतही आमूलाग्र बदल करण्यात आला आहे. भुसावळ विभागातील रेल्वे स्थानकावर बुकिंगछोट्या व्यापाऱ्यांना मालगाडीने माल पाठविण्याची संधी रेल्वे प्रशासनाने उपलब्ध करून दिली आहे. या उपक्रमांतर्गत भुसावळ मध्य रेल्वे विभागातील मुख्य रेल्वे स्थानकावर माल पाठविण्यासंदर्भात बुकिंग केली जाईल. यात जंक्शन असलेल्या रेल्वे स्थानकावर ही सुविधा उपलब्ध असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच छोट्या व्यापाऱ्यांना त्यांचा माल पाठविण्याची सोय करून देण्यात आली आहे. ही बाब निश्चितच व्यापाऱ्यांसाठी लाभदायक ठरणारी आहे. लहान व्यापाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे, यामागील मूळ उद्देश आहे. - व्ही. डी. कुंभारे,वाणिज्य निरीक्षक, अमरावती रेल्वे स्थानक