शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

राज्यात आता २३ व्या वर्षांपर्यत अनाथालयात वास्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:11 IST

(गणेश वासनिक) महिला व बालकल्याण विभागाचा निर्णय, हा निर्णय घेणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य. अमरावती : अनाथ मुले १८ ...

(गणेश वासनिक)

महिला व बालकल्याण विभागाचा निर्णय, हा निर्णय घेणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य.

अमरावती : अनाथ मुले १८ वर्षांची झाली की, त्यांना ते राहत असलेल्या अनाथ आश्रमात राहू दिले जात नाही. या वयात ही मुले-मुली आपल्या पायांवर उभीदेखील झालेली नसतात. यामुळे अनाथ मुला-मुलींचे वय २३ वर्षे पूर्ण होईपर्यंत त्यांना आश्रमात राहता येईल, असा निर्णय राज्याच्या महिला व बाल कल्याण विभागाने घेतला. हा क्रांतिकारी निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.

अनाथ मुला-मुलींना वयाच्या २३ व्या वर्षांपर्यंत राहू द्यावे, अशी मागणी अनेक सामाजिक संघटनांची होती. त्याअनुषंगाने राज्य शासनाने सकारात्मक निर्णय घेत अनाथ मुला-मुलींना न्याय देण्याची भूमिका घेतली आहे. या निर्णयामुळे अनाथालय संचालित करणाऱ्या चालकांना मोठा दिलासा मानला जात आहे.

कोविड-१९ आजारामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देऊन त्यांचे यथायोग्य संरक्षण, संगोपन यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कृती दल गठित करण्याचा निर्णय महिला व बालकल्याण विभागाने घेतला आहे. राज्यात कोविडमुळे आतापर्यंत १९५ मुले अनाथ झाली आहेत, आई व वडील गमावलेली १०८ बालके, तर एक पालक गमावलेली ८७ बालके आहेत.

-------------------

कोविडमुळे एकूण अनाथ

१९५ मुले

एक पालक गमावलेली - ८७ मुले

दोन्ही पालक गमावलेली - १०८ मुले

--------------------

सगळ्यात जास्त अनाथ मुले -

नंदुरबार - ९३

हिंगोली - १८

जालना - १६

गोंदिया - १२

ठाणे - ११

-----------------

या जिल्ह्यातही अनाथ झाली मुले

पालघर - ०२

रत्नागिरी - ०२

परभणी - ०४

सिंधुदुर्ग - ०२

पुणे - ०४

धुळे - ०३

जळगाव - ०७

अहमदनगर - ०८

वाशिम - ०२

यवतमाळ - ०१

बुलडाणा - ०३

नागपूर - ०७

-------------------------

कोविडच्या काळात मुले, महिलांचे प्रचंड हाल झाले. काही मुलांच्या डोक्यावरून आई-वडिलांचे छत्र हरविले. त्यामुळे अशा मुलांचे जिल्हास्तरावर टास्क फोर्सच्या माध्यमातून संगोपन, समुपदेशन करण्यात येणार आहे. अनाथालयात २३ वर्षांपर्यंत मुले राहू शकतील, असा निर्णय घेतला आहे.

- यशेामती ठाकूर, महिला व बाल कल्याण मंत्री,