शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

राज्यात आता २३ व्या वर्षांपर्यत अनाथालयात वास्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:11 IST

(गणेश वासनिक) महिला व बालकल्याण विभागाचा निर्णय, हा निर्णय घेणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य. अमरावती : अनाथ मुले १८ ...

(गणेश वासनिक)

महिला व बालकल्याण विभागाचा निर्णय, हा निर्णय घेणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य.

अमरावती : अनाथ मुले १८ वर्षांची झाली की, त्यांना ते राहत असलेल्या अनाथ आश्रमात राहू दिले जात नाही. या वयात ही मुले-मुली आपल्या पायांवर उभीदेखील झालेली नसतात. यामुळे अनाथ मुला-मुलींचे वय २३ वर्षे पूर्ण होईपर्यंत त्यांना आश्रमात राहता येईल, असा निर्णय राज्याच्या महिला व बाल कल्याण विभागाने घेतला. हा क्रांतिकारी निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.

अनाथ मुला-मुलींना वयाच्या २३ व्या वर्षांपर्यंत राहू द्यावे, अशी मागणी अनेक सामाजिक संघटनांची होती. त्याअनुषंगाने राज्य शासनाने सकारात्मक निर्णय घेत अनाथ मुला-मुलींना न्याय देण्याची भूमिका घेतली आहे. या निर्णयामुळे अनाथालय संचालित करणाऱ्या चालकांना मोठा दिलासा मानला जात आहे.

कोविड-१९ आजारामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देऊन त्यांचे यथायोग्य संरक्षण, संगोपन यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कृती दल गठित करण्याचा निर्णय महिला व बालकल्याण विभागाने घेतला आहे. राज्यात कोविडमुळे आतापर्यंत १९५ मुले अनाथ झाली आहेत, आई व वडील गमावलेली १०८ बालके, तर एक पालक गमावलेली ८७ बालके आहेत.

-------------------

कोविडमुळे एकूण अनाथ

१९५ मुले

एक पालक गमावलेली - ८७ मुले

दोन्ही पालक गमावलेली - १०८ मुले

--------------------

सगळ्यात जास्त अनाथ मुले -

नंदुरबार - ९३

हिंगोली - १८

जालना - १६

गोंदिया - १२

ठाणे - ११

-----------------

या जिल्ह्यातही अनाथ झाली मुले

पालघर - ०२

रत्नागिरी - ०२

परभणी - ०४

सिंधुदुर्ग - ०२

पुणे - ०४

धुळे - ०३

जळगाव - ०७

अहमदनगर - ०८

वाशिम - ०२

यवतमाळ - ०१

बुलडाणा - ०३

नागपूर - ०७

-------------------------

कोविडच्या काळात मुले, महिलांचे प्रचंड हाल झाले. काही मुलांच्या डोक्यावरून आई-वडिलांचे छत्र हरविले. त्यामुळे अशा मुलांचे जिल्हास्तरावर टास्क फोर्सच्या माध्यमातून संगोपन, समुपदेशन करण्यात येणार आहे. अनाथालयात २३ वर्षांपर्यंत मुले राहू शकतील, असा निर्णय घेतला आहे.

- यशेामती ठाकूर, महिला व बाल कल्याण मंत्री,