शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

आता गाव पातळीवरही खरीप हंगामाचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:11 IST

चांदूरबाजार : तालुका कृषी विभागाने मे महिन्याच्या सुरवातीला तालुक्यातल्या २०२१-२०२२ च्या खरीप हंगामाचे नियोजन केले आहे. आजतागायत हे नियोजन ...

चांदूरबाजार : तालुका कृषी विभागाने मे महिन्याच्या सुरवातीला तालुक्यातल्या २०२१-२०२२ च्या खरीप हंगामाचे नियोजन केले आहे. आजतागायत हे नियोजन फक्त तालुकास्तरावर मर्यादित होते. दरवर्षीप्रमाणे कृषी विभाग यावर्षी एवढ्यावरच थांबला नाही. शेतकऱ्यांना कमी खर्चात अधिक उत्पन्न कसे घेता येईल, याचा विचार करून तालुका कृषी विभागाने आता गाव पातळीवरही खरीप हंगामाचे नियोजन असा उपक्रम सुरू केला आहे.

या उपक्रमांतर्गत प्रत्यक्ष गावात जाऊन गावनिहाय शेतकऱ्यांच्या बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे. या बैठकांमध्ये शेतकऱ्यांना पीकनिहाय, पेरणीपूर्व व पेरणीपश्चात तंत्रज्ञानाची माहिती देण्यात येत आहे. तसेच शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर १० टक्क्यांनी कमी करावा, यावर भर दिला जात आहे. कृषी विभागाच्या मंडळनिहाय शेतकऱ्यांच्या, खरीप हंगामपूर्व बैठक घेण्यात येत आहे. यात पहिल्या टप्प्यात हैदतपूर वडाळा, थुगाव पिंपरी, करजगाव खेल चौधर, पांढरी याठिकाणी गाव पातळीवरही खरीप नियोजनाच्या शेतकऱ्यांसोबत बैठकीत घेण्यात आल्या.

खरिपाच्या गावनिहाय नियोजनातून नैसर्गिक आपत्ती वगळता, तांत्रिकदृष्ट्या शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाया जाणार नाही, याची पुरेपूर काळजी कृषी विभाग घेत असल्याचे दिसून येते. या नियोजन बैठकांमध्ये शेतकऱ्यांना मुख्यत्वे करून, कापूस व सोयाबीन पिकासंदर्भात पेरणीपूर्व व पेरणीपश्चात तंत्रज्ञानाची माहिती देण्यात आली. प्रथम बियाणे व खते खरेदी करताना घ्यावयाची काळजी, यासंबंधीची सविस्तर माहिती शेताकऱ्यांना देण्यात आली.

गाव पातळीवरही खरीप हंगामाच्या नियोजन बैठकीप्रसंगी पहिल्या टप्प्यातील बैठकांना तालुका कृषी अधिकारी अंकुश जोगदंड, मंडळ कृषी अधिकारी एस.पी.दांडेगावकर, कृषी सहायक एस. एस. सांगळे, कृषिमित्र संतोष नागापूरे, कृषीतज्ज्ञ मेघा जामोदकर उपस्थित होते.