शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

आता गाव पातळीवरही खरीप हंगामाचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:11 IST

चांदूरबाजार : तालुका कृषी विभागाने मे महिन्याच्या सुरवातीला तालुक्यातल्या २०२१-२०२२ च्या खरीप हंगामाचे नियोजन केले आहे. आजतागायत हे नियोजन ...

चांदूरबाजार : तालुका कृषी विभागाने मे महिन्याच्या सुरवातीला तालुक्यातल्या २०२१-२०२२ च्या खरीप हंगामाचे नियोजन केले आहे. आजतागायत हे नियोजन फक्त तालुकास्तरावर मर्यादित होते. दरवर्षीप्रमाणे कृषी विभाग यावर्षी एवढ्यावरच थांबला नाही. शेतकऱ्यांना कमी खर्चात अधिक उत्पन्न कसे घेता येईल, याचा विचार करून तालुका कृषी विभागाने आता गाव पातळीवरही खरीप हंगामाचे नियोजन असा उपक्रम सुरू केला आहे.

या उपक्रमांतर्गत प्रत्यक्ष गावात जाऊन गावनिहाय शेतकऱ्यांच्या बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे. या बैठकांमध्ये शेतकऱ्यांना पीकनिहाय, पेरणीपूर्व व पेरणीपश्चात तंत्रज्ञानाची माहिती देण्यात येत आहे. तसेच शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर १० टक्क्यांनी कमी करावा, यावर भर दिला जात आहे. कृषी विभागाच्या मंडळनिहाय शेतकऱ्यांच्या, खरीप हंगामपूर्व बैठक घेण्यात येत आहे. यात पहिल्या टप्प्यात हैदतपूर वडाळा, थुगाव पिंपरी, करजगाव खेल चौधर, पांढरी याठिकाणी गाव पातळीवरही खरीप नियोजनाच्या शेतकऱ्यांसोबत बैठकीत घेण्यात आल्या.

खरिपाच्या गावनिहाय नियोजनातून नैसर्गिक आपत्ती वगळता, तांत्रिकदृष्ट्या शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाया जाणार नाही, याची पुरेपूर काळजी कृषी विभाग घेत असल्याचे दिसून येते. या नियोजन बैठकांमध्ये शेतकऱ्यांना मुख्यत्वे करून, कापूस व सोयाबीन पिकासंदर्भात पेरणीपूर्व व पेरणीपश्चात तंत्रज्ञानाची माहिती देण्यात आली. प्रथम बियाणे व खते खरेदी करताना घ्यावयाची काळजी, यासंबंधीची सविस्तर माहिती शेताकऱ्यांना देण्यात आली.

गाव पातळीवरही खरीप हंगामाच्या नियोजन बैठकीप्रसंगी पहिल्या टप्प्यातील बैठकांना तालुका कृषी अधिकारी अंकुश जोगदंड, मंडळ कृषी अधिकारी एस.पी.दांडेगावकर, कृषी सहायक एस. एस. सांगळे, कृषिमित्र संतोष नागापूरे, कृषीतज्ज्ञ मेघा जामोदकर उपस्थित होते.