शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
7
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
8
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
9
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
10
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
11
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
12
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
13
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
14
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
15
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
16
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
17
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
18
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
19
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
20
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?

आता गाव पातळीवरही खरीप हंगामाचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:11 IST

चांदूरबाजार : तालुका कृषी विभागाने मे महिन्याच्या सुरवातीला तालुक्यातल्या २०२१-२०२२ च्या खरीप हंगामाचे नियोजन केले आहे. आजतागायत हे नियोजन ...

चांदूरबाजार : तालुका कृषी विभागाने मे महिन्याच्या सुरवातीला तालुक्यातल्या २०२१-२०२२ च्या खरीप हंगामाचे नियोजन केले आहे. आजतागायत हे नियोजन फक्त तालुकास्तरावर मर्यादित होते. दरवर्षीप्रमाणे कृषी विभाग यावर्षी एवढ्यावरच थांबला नाही. शेतकऱ्यांना कमी खर्चात अधिक उत्पन्न कसे घेता येईल, याचा विचार करून तालुका कृषी विभागाने आता गाव पातळीवरही खरीप हंगामाचे नियोजन असा उपक्रम सुरू केला आहे.

या उपक्रमांतर्गत प्रत्यक्ष गावात जाऊन गावनिहाय शेतकऱ्यांच्या बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे. या बैठकांमध्ये शेतकऱ्यांना पीकनिहाय, पेरणीपूर्व व पेरणीपश्चात तंत्रज्ञानाची माहिती देण्यात येत आहे. तसेच शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर १० टक्क्यांनी कमी करावा, यावर भर दिला जात आहे. कृषी विभागाच्या मंडळनिहाय शेतकऱ्यांच्या, खरीप हंगामपूर्व बैठक घेण्यात येत आहे. यात पहिल्या टप्प्यात हैदतपूर वडाळा, थुगाव पिंपरी, करजगाव खेल चौधर, पांढरी याठिकाणी गाव पातळीवरही खरीप नियोजनाच्या शेतकऱ्यांसोबत बैठकीत घेण्यात आल्या.

खरिपाच्या गावनिहाय नियोजनातून नैसर्गिक आपत्ती वगळता, तांत्रिकदृष्ट्या शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाया जाणार नाही, याची पुरेपूर काळजी कृषी विभाग घेत असल्याचे दिसून येते. या नियोजन बैठकांमध्ये शेतकऱ्यांना मुख्यत्वे करून, कापूस व सोयाबीन पिकासंदर्भात पेरणीपूर्व व पेरणीपश्चात तंत्रज्ञानाची माहिती देण्यात आली. प्रथम बियाणे व खते खरेदी करताना घ्यावयाची काळजी, यासंबंधीची सविस्तर माहिती शेताकऱ्यांना देण्यात आली.

गाव पातळीवरही खरीप हंगामाच्या नियोजन बैठकीप्रसंगी पहिल्या टप्प्यातील बैठकांना तालुका कृषी अधिकारी अंकुश जोगदंड, मंडळ कृषी अधिकारी एस.पी.दांडेगावकर, कृषी सहायक एस. एस. सांगळे, कृषिमित्र संतोष नागापूरे, कृषीतज्ज्ञ मेघा जामोदकर उपस्थित होते.