शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
3
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
4
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
5
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
6
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
7
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
8
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
9
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
10
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
11
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
12
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
13
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात
14
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
15
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
16
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
17
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
18
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
19
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
20
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

रमाई आवास योजनेसाठी आता केंद्राकडून निधी

By admin | Updated: October 11, 2016 00:15 IST

देशासह राज्यातील अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकांच्या वस्तींचा सुधार करून त्यांना हक्काचे घर मिळावे, ...

रामदास आठवले : विलासनगरात बुद्ध महोत्सवाचे थाटात उद्घाटनअमरावती : देशासह राज्यातील अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकांच्या वस्तींचा सुधार करून त्यांना हक्काचे घर मिळावे, यासाठी रमाई आवास योजना राबविली जात आहे. या योजनेचा लाभ प्रत्येक गोर-गरीब कुटुंबास मिळावा व त्यांचे जीवनमान सुधारावे, यासाठी केंद्र सरकारकडून भरीव निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही केंद्रीय सामाजिक न्याय व सबलीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे रविवारी दिली.स्थानिक विलासनगरच्या विशाल प्रांगणात आयोजित बुध्द महोत्सव २०१६ निमित्त बुध्दगया येथील महाबोधी विहाराचा शिल्पकृती देखावा तयार करण्यात आला. याप्रसंगी ना. आठवले यांचे हस्ते भगवान गौतम बुध्दांच्या मूर्तीला हारार्पण करून महाबोधी विहाराच्या शिल्पकृतीचे थाटात उद्घाटन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील, आ. सुनील देशमुख, आ. रवि राणा, माजी आमदार अनिल गोंडाणे, बुध्द महोत्सवाचे आयोजक तथा नगरसेवक प्रदीप दंदे, रामेश्वर अभ्यंकर, प्रकाश बनसोड, भीमराव वाघमारे, महेंद्र भालेकर, ओमप्रकाश बनसोड आदी उपस्थित होते.ना. आठवले म्हणाले की, जगातील विषमतेवर समतेचे विचार सांगून समाजाला सर्वधर्म समभावाची शिकवण भगवान गौतम बुध्दांनी दिली आहे. त्यांचे आदर्श व आचार-विचार आपल्यात रुजवून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोषित, पीडितांच्या उध्दारासाठी संपूर्ण जीवन वाहून दिले. १४ आॅक्टोंबर १९५६ रोजी डॉ. आंबेडकरांनी बौध्द धम्माची दीक्षा घेऊन समस्त मानव जातीला एका आदर्श आचरणाची मुहर्तमेढ लावून दिली. आज त्या घटनेला ६० वर्षे पूर्ण झाली आहे. त्यानिमित्त आज आपण सारेजण धम्मचक्र प्रर्वतनाचा हिरक महोत्सव बुध्द महोत्साच्या रुपाने साजरा करीत आहोत. राज्य शासन डॉ. आंबेडकर यांचे १२५ वे जयंतीवर्ष साजरे करीत आहे. लंडन येथे वास्तव केलेल्या बाबासाहेबांचे घर सुमारे ४१ कोटी रुपये खर्चून शासनाने ताब्यात घेतले आहे. ज्याठिकाणी बाबासाहेब शिकले त्या कोलंबिया युनिर्व्हसिटी त्यांचे दाखले व अनुभव कथन सचित्र लावण्यात आले आहे, अशी माहिती ना. आठवले यांनी दिली. बुद्ध महोत्सव २०१६ निमित्त बुध्दगया येथील भगवान गौतम बुध्द यांची शिल्पकृतीचा देखावा तयार करण्यात आली. ही शिल्पकृती १२ दिवसांत तयार करण्यात आली असून यासाठी मंगेश ढेपे व पवन आसोपा या शिल्पकारांनी परीश्रम घेतले आहे, असे प्रास्ताविकात प्रदीप दंदे यांनी सांगितले. मागेल त्याला घर, मागेल त्याला काम -पालकमंत्री पालकमंत्री प्रविण पोटे आपल्या भाषणात म्हणाले की, आयोजक प्रदीप दंदे यांनी उत्कृष्ठ बुध्दगया ची शिल्पकृती तयार करुन जिल्हयातील जनतेला तथागत गौतम बुध्दांचे दर्शन घडविले आहे. राज्य शासनाव्दारे २०१५-२०१६ हे वर्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंतीवर्ष म्हणून साजरे करीत आहे. या माध्यमातून बाबासाहेबांच्या स्मृती व भव्य स्मारक इंदू मिलच्या ठिकाणी निर्माण करण्यात येत आहे. आगामी काळात सन २०२२ पर्यंत ‘मागेल त्याला घर, मागेल त्याला काम’ ही संकल्पना राबवून प्रत्येक गोर, गरीबास राहण्यासाठी घर व हाताकरीता काम देण्यात येणार आहे, असे पोटे यांनी सांगितले.