शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
4
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
5
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
6
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
7
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
8
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
9
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
10
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
11
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
12
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
13
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
14
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
15
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
16
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
17
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
18
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
19
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
20
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र

- आता कोरोनामुळे डोळाही निकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:09 IST

फोटो - २८एएमपीएच०८, २८एएमपीएच०९ लोकमत विशेष गणेश देशमुख अमरावती - ‘एनिथिंग कॅन हॅपन इन कोराना एक्सेप्ट प्रेग्नंसी अँड फ्रॅक्चर’ ...

फोटो - २८एएमपीएच०८, २८एएमपीएच०९

लोकमत विशेष

गणेश देशमुख

अमरावती - ‘एनिथिंग कॅन हॅपन इन कोराना एक्सेप्ट प्रेग्नंसी अँड फ्रॅक्चर’ - कोराेनावर उपचार करणारी येथील डाॅक्टर मंडळी आपसात बोलताना विनोदाने हे वाक्य उच्चारतात. अमरावतीत ते तंतोतंत खरे ठरते आहे. काेरोनामुळे आता एक डोळा कायमचा निकामी होत असल्याची धडकी भरविणारी अनेक प्रकरणे अमरावतीत समोर येत आहेत.

वैद्यकीय सूत्रांनुसार, हा बुरशीपासून होणारा दुर्मीळ, पण अत्यंत घातक संसर्ग आहे. या आजाराला ‘म्युकरमायकाॅसिस’ म्हणतात. हा शब्द काहीसा परिचित असला तरी त्यातून डोळा गमविल्याची प्रकरणे नवी आहेत. दुसऱ्या लाटेत ती चिंताजनकरीत्या पुढे येऊ लागली आहेत. काेरोना होऊन गेलेल्यांना हा आजार होतो. कोराेनाकाळात कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती हे त्याचे मुख्य कारण. सायनसमधून संक्रमण सुरू होते. पुढे ते तोंडाच्या आतून वरचा जबडा, डोळा आणि मेंदूपर्यंत पोहोचते. डोळा कायमचा निकामी होतो. पॅरालिसिस आणि मृत्यूही ओढवतो. मृत्यूदर ६० टक्क्यांपर्यंत आहे.

सर्जरीसाठी तज्ज्ञांच्या चमूची गरज

संक्रमणानंतर सर्जरी गरजेची ठरते. त्यासाठी ईएनटी, डोळे, दातांचे शल्यचिकित्सक आणि मेंदूविकारतज्ज्ञ यांची चमू आवश्यक आहे. आयसीयू सेटअपमध्ये सर्जरी करावी लागते. यशस्वी सर्जरीनंतरही ३०-४० टक्के रुग्ण उपचाराला प्रतिसाद देत नाहीत.

अमरावतीत ३०० रुग्ण

या रुग्णांची स्वतंत्र आकडेवारी शासनाकडे उपलब्ध नाही. तज्ज्ञ डाॅक्टरांशी केलेल्या चर्चेनुसार, अमरावतीत २० नेत्रतज्ज्ञ आहेत. आठवड्यात प्रत्येकाकडे १०-१२ रुग्ण येताहेत. २२ ईएनटी सर्जन आहेत. त्यातील १५ खासगी प्रॅक्टिस करतात. आठवड्याला प्रत्येकाकडे पाच-सहा रुग्ण येतात. या अंदाजानुसार दुसऱ्या लाटेत सरासरी ३०० रुग्ण आढळून आले आहेत.

लक्षणे काय?

वरच्या पापणीला सूज, ती खाली येणे, डोळा पुढे आल्यासारखा वाटणे, डोळ्यांभोवतीची त्वचा काळसर होणे, डोळ्यांची हालचाल मंदावणे, वस्तू दोन दिसणे, नाकावर सूज, नाक बुजणे, चेहऱ्यावर एका बाजूने सूज, दातांमध्ये, डोळ्यांमध्ये वेदना ही या आजाराची लक्षणे आहेत.

- तर संक्रमण नियंत्रण शक्य

संक्रमण सुरुवातीलाच थांबविले जाऊ शकते. परंतु, आरंभकाळातील लक्षणे नेहमी जाणविणारी डोकेदुखीसारखी सामान्य लक्षणे असल्याने ती रुग्णांच्या लक्षात येत नाहीत. तपासणीला आलेल्यांबाबत डाॅक्टरांना शंका आल्यास एन्डोस्कापी, सीटी स्कॅन, एमआरआय चाचण्यांतून संक्रमण शोधता येऊ शकते; तथापि ती पद्धती खर्चीक असल्याने सरसकट उपयोगात आणता येत नाही, अशी अडचण डाॅक्टरांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केली.

----------

यांना अधिक धोका

रोगप्रतिकारशक्ती मुळात कमी असणाऱ्यांना, एचआयव्ही, कर्करोग, अनियंत्रित मधुमेह असलेल्यांना धोका अधिक आहे. कोरोना वाढल्यास अँन्टिव्हायरल आणि स्टेराॅईड द्यावेच लागतात. या औषधींनी रोगप्रतिकारशक्ती कमी होते. कोरानानंतर त्यामुळे हे संक्रमण होते.

----

कोट

२५ वर्षांत मी या आजाराचा एकही रुग्ण बघितला नाही. दुसऱ्या लाटेत १०-१२ रुग्ण तपासून झाले. डोळ्यांपर्यंत हे संक्रमण पोहोचते त्यावेळी डोळा वाचविणे अशक्य असते. दोन्ही डोळे गेलेले रुग्णही मी बघितले.

- डाॅ मनीष तोटे, नेत्रशल्यचिकित्सक, अमरावती.

-----------

कोट

संक्रमण वाढलेल्या अवस्थेत बुलडाण्याहून आमच्याकडे दाखल झालेल्या एका कोविड रुग्णाचा डोळा निकामी झाला. या आजाराला ‘ब्लॅक फंगल डिसिज’ही म्हणतात. घातक आजाराचा यात मृत्युदर ६० टक्क्यांपर्यंत आहे.

- डाॅ. रोहिणी यादगिरे, आयसीयू तज्ज्ञ, अमरावती

--------

कोट

पहिल्या लाटेत हे रुग्ण नव्हते. दुसऱ्या लाटेत अचानक प्रमाण वाढले. आठवड्यातून ५-६ रुग्ण मी तपासतो. अनेकांना सर्जरीची गरज पडली. पूर्वी हे रुग्ण क्वचितच दिसायचे. आता ते विदर्भभरात आहेत.

- डाॅ. बबन बेलसरे, ईएनटी सर्जन, अमरावती

----------

कोट

एक्स्पर्ट टीमच्या उपस्थित अलीकडे ‘म्युकरमायकाॅसिस’च्या आठ सर्जरी सिव्हिल हाॅस्पिटलमध्ये केल्या. अमरावतीत खासगी डाॅक्टरांच्या मिळून ६०-७० सर्जरी झाल्या आहेत. आता हे रुग्ण सर्वत्र आढळताहेत.

- डाॅ. श्रीकांत महल्ले, ईएनटी सर्जन, सिव्हिल हाॅस्पिटल, अमरावती

--------