शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

आता मांत्रिकालाही मिळणार शंभर रुपये! आरोग्य यंत्रणा भूमकांच्या दारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2023 20:54 IST

Amravati News एक जीव लाखमोलाचा असून, प्रत्येक रुग्णाला वाचविण्यासाठी आरोग्य खात्याला मेळघाटात थेट मांत्रिकाच्या दारी जावे लागत असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.

नरेंद्र जावरे

अमरावती : पुरोगामी राज्याच्या दिशेने वाटचाल करीत असलेल्या महाराष्ट्रात आदिवासी रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोहोचविण्यासाठी खुद्द आरोग्य यंत्रणेला भोंदूबाबा मांत्रिकांची मदत घ्यावी लागत आहे. एक जीव लाखमोलाचा असून, प्रत्येक रुग्णाला वाचविण्यासाठी आरोग्य खात्याला मेळघाटात थेट मांत्रिकाच्या दारी जावे लागत असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. मांत्रिकाला या भागात भूमका असे म्हटले जात असून, आता रुग्णांना रुग्णालयात रेफर करण्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा, यासाठी मंगळवारपासून दोनदिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन धारणी आणि चिखलदरा तालुक्यात करण्यात आले आहे. रुग्ण कल्याण समितीच्यावतीने भूमकांना एका रुग्णापोटी शंभर रुपये मानधन दिले जाणार आहे.

मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यात कुपोषणावर आरोग्य यंत्रणेच्यावतीने दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. असे असले तरी कुपोषण, माता- बालमृत्यू कायम आहे. आठ वर्षांपूर्वी प्रशासनाने मेळघाटातील भूमकांची मदत घेऊन आदिवासींना उपचारांसाठी रुग्णालयात येण्याचे आवाहन केले होते. मात्र, कुठलाही आर्थिक मोबदला मिळत नसल्याने भूमकांनी प्रतिसाद दिला नव्हता. त्यामुळे आता पुन्हा मंगळवारपासून धारणी व चिखलदरा तालुक्यात तज्ज्ञ डॉक्टर त्यांना प्रशिक्षण देणार आहेत.

भूमकांची संख्या सहाशेच्या घरात

मेळघाटच्या धारणीत ३१५, तर चिखलदरा तालुक्यात २८६ असे एकूण ६०१ भूमिका आहेत. संपूर्ण गावावर भूमकाचा पगडा अद्याप कायम असल्यामुळे मेळघाटातील आदिवासी उपचारासाठी सर्वप्रथम त्यांच्या दारी जातात त्यानंतरच आवश्यकतेनुसार रुग्णालयात दाखल होतात. तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते आणि रुग्ण दगावतात. अनेकदा उपचाराच्या नावावर बाळाला चुलीवरच्या धगधगत्या निखाऱ्यावर विळा तापवून त्याचे चटके दिल्याच्या संतापजनक घटना घडल्या आहेत.

प्रसूतीसाठी दाईला चारशे रुपये

मेळघाटात मोठ्या प्रमाणात घरीच प्रसूती होते. त्यामुळे बाळ आणि माता दोघांचेही आरोग्य धोक्यात येऊ नये, यासाठी मातेला रुग्णालयात प्रसूतीसाठी आणल्यास दाईला चारशे रुपये दिले जातात. आता मांत्रिकालाही प्रति रुग्णापोटी शंभर रुपये मिळणार आहेत.

 

मेळघाटातील आदिवासी रुग्णाचा एक जीव जरी वाचला तरी तो लाखमोलाचा ठरेल. याच चांगल्या हेतूने आरोग्य विभागाच्यावतीने भूमकांसाठी दोन दिवस प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.

- दिलीप रणमले

जिल्हा आरोग्य अधिकारी अमरावती.

टॅग्स :Governmentसरकार