शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

आता ‘ई-रिक्षा’ने गल्लीबोळातील कचरा उचलणार

By admin | Updated: November 2, 2015 00:29 IST

गल्लीबोळातून घंटी कटल्याद्वारे कचरा उचलण्याच्या पारंपरिक पद्धतीला फाटा देत आता महानगरातील कचरा ‘ई-रिक्षा’ने उचलला जाणार आहे.

स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल : नगरसेवक प्रदीप हिवसे यांचा पुढाकारअमरावती : गल्लीबोळातून घंटी कटल्याद्वारे कचरा उचलण्याच्या पारंपरिक पद्धतीला फाटा देत आता महानगरातील कचरा ‘ई-रिक्षा’ने उचलला जाणार आहे. शहराचा ‘स्मार्ट सिटी’ उपक्रमात समावेश झाल्यानंतर कचरा उचलण्याची ‘स्मार्ट’ प्रणाली नगरसेवक प्रदीप हिवसे यांच्या पुढाकाराने समोर आली आहे. प्रदूषणमुक्त ‘ई-रिक्षा’ला आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनीदेखील संमती दर्शविली आहे.महानगरात कचरा उचलणे, वहन करणे, कम्पोस्ट डेपोवर पोहचविणे आदी बाबी आरोग्य विभागाच्या देखरेखीत सुरु आहे. गल्लीबोळातून घराघरातून निघणारा कचरा हा घंटी कटल्याद्वारे गोळा केला जातो. ही व्यवस्था ४३ प्रभागातही सुरू आहे. घंटी कटल्याचे व्यवस्थापन हे सफाई कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात आले आहे. मात्र घंटी कटल्यातून वहन होणारा कचरा ठिकठिकाणी रस्त्यावर पडत असल्याचे चित्र आहे. घंटी कटल्याला साजेसे पण कमी वेळेत जास्त काम होण्याची हमी असलेला ‘ई-रिक्षा’ने कचरा उचलण्याची प्रणाली सुरु केल्यास ती सुकर होईल. ‘ई- रिक्शा’ हा बॅटरीवर चालणारा असून शासनाने मान्यता प्राप्त केल्याची बाब नगरसेवक प्रदीप हिवसे यांनी आयुक्तांचा लक्षात आणून दिली. अमरावती शहर हे ‘स्मार्ट’ होण्याच्या दिशेने वाटचाल करीत असताना कचरा उचलण्याची प्रक्रिया देखील ‘स्मार्ट’ होणे काळाची गरज असल्याचे नगरसेवक प्रदीप हिवसे यांचे मत आहे. कचरा उचलण्यासाठी ‘ई-रिक्षा’चा वापर केला गेल्यास इंधन खर्चही लागणार नाही, हे वास्तव आहे. कमी खर्चात जास्त सेवा हे ‘ई-रिक्षा’चे वैशिष्ट्य आहे. बॅटरी चार्र्जींग करण्यासाठी १० ते १२ रुपये लागत असून ७९ ते ८० किलोमिटरपर्यत तो चालू शकते. घंटी कटल्यात कचरा गोळा केल्यानंतर तो तुंबून ओढताना सफाई कर्मचाऱ्यांची जी घालमेल होते, ती ‘ई-रिक्षा’ वापराने थांबेल, असे प्रशासनाचे म्हणने आहे. (प्रतिनिधी)