शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
3
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
4
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
5
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
6
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
7
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
8
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
9
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
10
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
11
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
12
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
13
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
14
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
15
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
16
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
17
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
18
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
19
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
20
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

आता ‘ई-रिक्षा’ने गल्लीबोळातील कचरा उचलणार

By admin | Updated: November 2, 2015 00:29 IST

गल्लीबोळातून घंटी कटल्याद्वारे कचरा उचलण्याच्या पारंपरिक पद्धतीला फाटा देत आता महानगरातील कचरा ‘ई-रिक्षा’ने उचलला जाणार आहे.

स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल : नगरसेवक प्रदीप हिवसे यांचा पुढाकारअमरावती : गल्लीबोळातून घंटी कटल्याद्वारे कचरा उचलण्याच्या पारंपरिक पद्धतीला फाटा देत आता महानगरातील कचरा ‘ई-रिक्षा’ने उचलला जाणार आहे. शहराचा ‘स्मार्ट सिटी’ उपक्रमात समावेश झाल्यानंतर कचरा उचलण्याची ‘स्मार्ट’ प्रणाली नगरसेवक प्रदीप हिवसे यांच्या पुढाकाराने समोर आली आहे. प्रदूषणमुक्त ‘ई-रिक्षा’ला आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनीदेखील संमती दर्शविली आहे.महानगरात कचरा उचलणे, वहन करणे, कम्पोस्ट डेपोवर पोहचविणे आदी बाबी आरोग्य विभागाच्या देखरेखीत सुरु आहे. गल्लीबोळातून घराघरातून निघणारा कचरा हा घंटी कटल्याद्वारे गोळा केला जातो. ही व्यवस्था ४३ प्रभागातही सुरू आहे. घंटी कटल्याचे व्यवस्थापन हे सफाई कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात आले आहे. मात्र घंटी कटल्यातून वहन होणारा कचरा ठिकठिकाणी रस्त्यावर पडत असल्याचे चित्र आहे. घंटी कटल्याला साजेसे पण कमी वेळेत जास्त काम होण्याची हमी असलेला ‘ई-रिक्षा’ने कचरा उचलण्याची प्रणाली सुरु केल्यास ती सुकर होईल. ‘ई- रिक्शा’ हा बॅटरीवर चालणारा असून शासनाने मान्यता प्राप्त केल्याची बाब नगरसेवक प्रदीप हिवसे यांनी आयुक्तांचा लक्षात आणून दिली. अमरावती शहर हे ‘स्मार्ट’ होण्याच्या दिशेने वाटचाल करीत असताना कचरा उचलण्याची प्रक्रिया देखील ‘स्मार्ट’ होणे काळाची गरज असल्याचे नगरसेवक प्रदीप हिवसे यांचे मत आहे. कचरा उचलण्यासाठी ‘ई-रिक्षा’चा वापर केला गेल्यास इंधन खर्चही लागणार नाही, हे वास्तव आहे. कमी खर्चात जास्त सेवा हे ‘ई-रिक्षा’चे वैशिष्ट्य आहे. बॅटरी चार्र्जींग करण्यासाठी १० ते १२ रुपये लागत असून ७९ ते ८० किलोमिटरपर्यत तो चालू शकते. घंटी कटल्यात कचरा गोळा केल्यानंतर तो तुंबून ओढताना सफाई कर्मचाऱ्यांची जी घालमेल होते, ती ‘ई-रिक्षा’ वापराने थांबेल, असे प्रशासनाचे म्हणने आहे. (प्रतिनिधी)