शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

आता ‘ई-रिक्षा’ने गल्लीबोळातील कचरा उचलणार

By admin | Updated: November 2, 2015 00:29 IST

गल्लीबोळातून घंटी कटल्याद्वारे कचरा उचलण्याच्या पारंपरिक पद्धतीला फाटा देत आता महानगरातील कचरा ‘ई-रिक्षा’ने उचलला जाणार आहे.

स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल : नगरसेवक प्रदीप हिवसे यांचा पुढाकारअमरावती : गल्लीबोळातून घंटी कटल्याद्वारे कचरा उचलण्याच्या पारंपरिक पद्धतीला फाटा देत आता महानगरातील कचरा ‘ई-रिक्षा’ने उचलला जाणार आहे. शहराचा ‘स्मार्ट सिटी’ उपक्रमात समावेश झाल्यानंतर कचरा उचलण्याची ‘स्मार्ट’ प्रणाली नगरसेवक प्रदीप हिवसे यांच्या पुढाकाराने समोर आली आहे. प्रदूषणमुक्त ‘ई-रिक्षा’ला आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनीदेखील संमती दर्शविली आहे.महानगरात कचरा उचलणे, वहन करणे, कम्पोस्ट डेपोवर पोहचविणे आदी बाबी आरोग्य विभागाच्या देखरेखीत सुरु आहे. गल्लीबोळातून घराघरातून निघणारा कचरा हा घंटी कटल्याद्वारे गोळा केला जातो. ही व्यवस्था ४३ प्रभागातही सुरू आहे. घंटी कटल्याचे व्यवस्थापन हे सफाई कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात आले आहे. मात्र घंटी कटल्यातून वहन होणारा कचरा ठिकठिकाणी रस्त्यावर पडत असल्याचे चित्र आहे. घंटी कटल्याला साजेसे पण कमी वेळेत जास्त काम होण्याची हमी असलेला ‘ई-रिक्षा’ने कचरा उचलण्याची प्रणाली सुरु केल्यास ती सुकर होईल. ‘ई- रिक्शा’ हा बॅटरीवर चालणारा असून शासनाने मान्यता प्राप्त केल्याची बाब नगरसेवक प्रदीप हिवसे यांनी आयुक्तांचा लक्षात आणून दिली. अमरावती शहर हे ‘स्मार्ट’ होण्याच्या दिशेने वाटचाल करीत असताना कचरा उचलण्याची प्रक्रिया देखील ‘स्मार्ट’ होणे काळाची गरज असल्याचे नगरसेवक प्रदीप हिवसे यांचे मत आहे. कचरा उचलण्यासाठी ‘ई-रिक्षा’चा वापर केला गेल्यास इंधन खर्चही लागणार नाही, हे वास्तव आहे. कमी खर्चात जास्त सेवा हे ‘ई-रिक्षा’चे वैशिष्ट्य आहे. बॅटरी चार्र्जींग करण्यासाठी १० ते १२ रुपये लागत असून ७९ ते ८० किलोमिटरपर्यत तो चालू शकते. घंटी कटल्यात कचरा गोळा केल्यानंतर तो तुंबून ओढताना सफाई कर्मचाऱ्यांची जी घालमेल होते, ती ‘ई-रिक्षा’ वापराने थांबेल, असे प्रशासनाचे म्हणने आहे. (प्रतिनिधी)