शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
2
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
3
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
4
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
5
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
6
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
7
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
8
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
9
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
10
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
11
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
12
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
13
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
14
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
15
Maharashtra HSC Result 2025: बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
16
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
17
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण
18
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
19
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
20
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू

आता कृषी केंद्राची ‘क्रॉस चेकिंग’

By admin | Updated: May 2, 2015 00:33 IST

खतांचा काळाबाजार, साठवण आणि उगवणशक्ती असलेले बियाण्यांची विक्री होत आहे की नाही, ....

पुस्तकावर शिक्के : पालकमंत्र्यांची खरीप आढावा बैठकीनंतर पत्रपरिषदअमरावती: खतांचा काळाबाजार, साठवण आणि उगवणशक्ती असलेले बियाण्यांची विक्री होत आहे की नाही, याच्या तपासणीसाठी आता कृषी केंद्राची ‘क्रॉस चेकिंग’ केली जाईल. आॅनलाईन खरेदीची सत्यता, पावती पुस्तकावर शिक्के मारण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान काही उणीवा आढळल्यास ते कृषी केंद्र कायमचे बंद करण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी येथे शुक्रवारी पत्रपरिषदेत दिली.येथील विभागीय आयुक्त कार्यालयात महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आयोजित खरीप हंगाम आढावा बैठकीनंतर त्यांनी सविस्तर माहिती दिली. ना. पोटे यांनी शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यावर आढावा बैठकीत भर देण्यात आला आहे. त्यांना वेळीच बियाणे, खत उपलब्ध करुन देण्यासाठीचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. खरीप हंगामापूर्वी माती परीक्षण, बियाण्यांची उगवणशक्ती तपासणे आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याच्या सूचना कृषी विभागाला देण्यात आल्या आहेत. पेरणीपूर्वी शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी हीदेखील प्रसिद्ध केले जाणार आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार बियाणे, खतांचा पुरवठा केला जाईल. जिल्ह्यासाठी १६ मॅट्रिक टन युरियाची मागणी केली जात असून ती नक्कीच पूर्ण होईल, अशी श्वावती पोटे यांनी दिली. मातीचा पोत तपासूनच पेरणी करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.खरीप हंगामात कृषी केंद्रावर काही भानगडी अथवा शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यास कृषी अधिकाऱ्यांची खैर राहणार नाही, अशी तंबी त्यांनी दिली. कृषी केंद्राच्या तपासणीकरीता तालुकानिहाय तपासणी पथक असून हे पथक अधिक गतीमान कसे होईल, यावर सर्वाधिक भर देण्याचा सूचना करण्यात आल्या आहेत.बनावट बियाण्यांची विक्री करण्याचा गोरखधंदा रोखण्यासाठी पावती पुस्तक लक्ष्य करण्यात आले असून या पुस्तकावर कृषी विभागाचा शिक्का असल्याशिवाय ते ग्राह्य धरले जाणार नाही, असे ते म्हणाले. पावतीशिवाय बियाण्यांची खरेदी करु नयेकृषी केंद्रातून बियाणे अथवा खत खरेदी करताना पावती घेतल्याशिवाय ते खरेदी करुन नये, असे आवाहन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी समस्त शेतकऱ्यांना केले आहे. एकाद्या वेळी बियाण्यांची उगवण झाली नाही तर त्या कृषी केंद्रावर शासन स्तरावर कारवाई करणे अशक्य होते. त्यामुळे कृषी केंद्रातून साहित्याची खरेदी करताना बीलाची पावती घेवूनच ते दुकान सोडावे, असे ते कडकडीचे आवाहन त्यांनी केले.बियाणे खरेदीची सक्ती केल्यास परवाने रद्द करुदरवर्षी कृषी केंद्राचे संचालक अमूक बियाणे खरेदी करण्याची सक्ती शेतकऱ्यांना करतात. लिंकिंग पद्धतीने ते खरेदी करावेच लागते, अशा भूलथापा देऊन निकृष्ट दर्जाचे बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारतात. मात्र, यंदा असा प्रकार निदर्शनास आल्यास त्या कृषी केंद्राचा परवाना कायमस्वरुपी बंद करु, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली. सोयाबीन बियाणे चांगल्या दर्जाचे असल्याची माहिती त्यांनी दिली.