शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

आता कृषी केंद्राची ‘क्रॉस चेकिंग’

By admin | Updated: May 2, 2015 00:33 IST

खतांचा काळाबाजार, साठवण आणि उगवणशक्ती असलेले बियाण्यांची विक्री होत आहे की नाही, ....

पुस्तकावर शिक्के : पालकमंत्र्यांची खरीप आढावा बैठकीनंतर पत्रपरिषदअमरावती: खतांचा काळाबाजार, साठवण आणि उगवणशक्ती असलेले बियाण्यांची विक्री होत आहे की नाही, याच्या तपासणीसाठी आता कृषी केंद्राची ‘क्रॉस चेकिंग’ केली जाईल. आॅनलाईन खरेदीची सत्यता, पावती पुस्तकावर शिक्के मारण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान काही उणीवा आढळल्यास ते कृषी केंद्र कायमचे बंद करण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी येथे शुक्रवारी पत्रपरिषदेत दिली.येथील विभागीय आयुक्त कार्यालयात महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आयोजित खरीप हंगाम आढावा बैठकीनंतर त्यांनी सविस्तर माहिती दिली. ना. पोटे यांनी शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यावर आढावा बैठकीत भर देण्यात आला आहे. त्यांना वेळीच बियाणे, खत उपलब्ध करुन देण्यासाठीचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. खरीप हंगामापूर्वी माती परीक्षण, बियाण्यांची उगवणशक्ती तपासणे आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याच्या सूचना कृषी विभागाला देण्यात आल्या आहेत. पेरणीपूर्वी शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी हीदेखील प्रसिद्ध केले जाणार आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार बियाणे, खतांचा पुरवठा केला जाईल. जिल्ह्यासाठी १६ मॅट्रिक टन युरियाची मागणी केली जात असून ती नक्कीच पूर्ण होईल, अशी श्वावती पोटे यांनी दिली. मातीचा पोत तपासूनच पेरणी करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.खरीप हंगामात कृषी केंद्रावर काही भानगडी अथवा शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यास कृषी अधिकाऱ्यांची खैर राहणार नाही, अशी तंबी त्यांनी दिली. कृषी केंद्राच्या तपासणीकरीता तालुकानिहाय तपासणी पथक असून हे पथक अधिक गतीमान कसे होईल, यावर सर्वाधिक भर देण्याचा सूचना करण्यात आल्या आहेत.बनावट बियाण्यांची विक्री करण्याचा गोरखधंदा रोखण्यासाठी पावती पुस्तक लक्ष्य करण्यात आले असून या पुस्तकावर कृषी विभागाचा शिक्का असल्याशिवाय ते ग्राह्य धरले जाणार नाही, असे ते म्हणाले. पावतीशिवाय बियाण्यांची खरेदी करु नयेकृषी केंद्रातून बियाणे अथवा खत खरेदी करताना पावती घेतल्याशिवाय ते खरेदी करुन नये, असे आवाहन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी समस्त शेतकऱ्यांना केले आहे. एकाद्या वेळी बियाण्यांची उगवण झाली नाही तर त्या कृषी केंद्रावर शासन स्तरावर कारवाई करणे अशक्य होते. त्यामुळे कृषी केंद्रातून साहित्याची खरेदी करताना बीलाची पावती घेवूनच ते दुकान सोडावे, असे ते कडकडीचे आवाहन त्यांनी केले.बियाणे खरेदीची सक्ती केल्यास परवाने रद्द करुदरवर्षी कृषी केंद्राचे संचालक अमूक बियाणे खरेदी करण्याची सक्ती शेतकऱ्यांना करतात. लिंकिंग पद्धतीने ते खरेदी करावेच लागते, अशा भूलथापा देऊन निकृष्ट दर्जाचे बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारतात. मात्र, यंदा असा प्रकार निदर्शनास आल्यास त्या कृषी केंद्राचा परवाना कायमस्वरुपी बंद करु, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली. सोयाबीन बियाणे चांगल्या दर्जाचे असल्याची माहिती त्यांनी दिली.